शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
2
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
3
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
4
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
5
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
6
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
7
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
8
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
9
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
10
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
11
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
12
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले
13
सौरभची हत्या करणाऱ्या मुस्कान-साहिलने हात जोडले; जेलमध्ये ढसाढसा रडले अन् म्हणाले...
14
आई, वडील आयटी प्रोफेशनल; काळजावर दगड ठेवत अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला दिला जैन धर्माचा संथारा, कहाणी ऐकून व्हाल भावूक...
15
Gold Rates 2 May : सोन्याच्या किंमतीत जोरदार घसरण, ७८ हजारांपर्यंत येऊ शकतो १० ग्रॅम सोन्याचा दर?
16
अधिकाधिक हिंदू तरुणींवर बलात्कार करण्याचं होतं लक्ष्य, भोपाळ लव्ह जिहाद प्रकरणातील आरोपीचा धक्कादायक दावा 
17
पहलगाम हल्ल्याचा दणका! भारताकडून पाकिस्तानचा ऑलिम्पिक विजेता अर्शद नदीम BLOCK!!
18
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर दिल्ली पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
19
Waves Summit 2025: "भारतात पुरेसे सिनेमागृहच नाहीत..." आमिर खानने व्यक्त केली खंत
20
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!

परभणी-गंगाखेड रस्त्याचा निर्णय खड्ड्यातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 23:43 IST

जिल्ह्यात सर्वाधिक वर्दळ असलेल्या व दुरवस्थेचा कळस गाठलेल्या परभणी-गंगाखेड या रस्त्याच्या कामाला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने पहिल्या टप्प्यातून वगळल्याने याबाबतचा निर्णय खड्ड्यात गेला असून, या रस्त्यावरील खड्डे भरण्याला कंत्राटदारांनीही नकार दिल्याने या रस्त्यावरून प्रवास करणाºयांच्या मागे लागलेली साडेसाती पाठ सोडायला तयार नाही़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यात सर्वाधिक वर्दळ असलेल्या व दुरवस्थेचा कळस गाठलेल्या परभणी-गंगाखेड या रस्त्याच्या कामाला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने पहिल्या टप्प्यातून वगळल्याने याबाबतचा निर्णय खड्ड्यात गेला असून, या रस्त्यावरील खड्डे भरण्याला कंत्राटदारांनीही नकार दिल्याने या रस्त्यावरून प्रवास करणाºयांच्या मागे लागलेली साडेसाती पाठ सोडायला तयार नाही़परभणी जिल्ह्यात ढालेगाव बंधारा ते मानवतपर्यंत राष्ट्रीय महामार्ग २२२ चा एकमेव रस्ता सोडला तर कोठेही चांगल्या दर्जाचे रस्ते नाहीत़ बहुतांश रस्ते हे खड्डेमय झाले असून, परभणी शहरामध्ये येणाºया प्रत्येक रस्त्याचा प्रवास खड्ड्यातूनच होत असल्याने परभणीवासिय वैतागले आहेत़ विशेषत: परभणी ते गंगाखेड या रस्त्यावरून प्रवास करणे म्हणजे एक प्रकारे शिक्षाच वाटू लागली आहे़ या ४० किमीच्या रस्त्यावर १०० मीटरचाही रस्ता असा नाही जेथे खड्डे नाहीत़ त्यामुळे गंगाखेड-परभणी व परभणी- गंगाखेड ये-जा करणाºया प्रवाशांची हाडे खिळखिळी झाली आहेत़ त्यामुळे या रस्त्यावरून वाहनाने प्रवास करण्याऐवजी रेल्वेने प्रवास करणे अनेकांनी पसंत केले आहे़ काही दिवसांपूर्वी उपहासातून शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी या रस्त्याला ‘नरेंद्र मोदी बुलेट एक्सप्रेस हायवे’ असे नामकरण केले होते़ तरीही प्रशासकीय पातळीवरील सुत्रे हालली नसल्याची बाब समोर आली आहे़केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी २९ जुलै रोजी जालना जिल्ह्यातील वाटूर फाटा येथे परभणी लोकसभा मतदार संघातील ५ हजार कोटी रुपयांच्या रस्ता कामाचे उद्घाटन केले होते़ त्यामध्ये परभणी ते गंगाखेड या रस्त्याचा समावेश होता़ विशेष म्हणजे राज्य मार्ग असलेला हा रस्ता राष्ट्रीय महामार्गात घेण्यात आल्याने गेल्या १५ वर्षांपासून दुरवस्था झालेल्या या रस्त्याचे भाग्य उजळेल, अशी अपेक्षा होती़ परंतु, ही अपेक्षा आता फोल ठरली आहे़ राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने पहिल्या टप्प्यात जिंतूर ते परभणीपर्यंतच्या रस्त्याचे काम करण्याचा निर्णय घेतला आहे़ पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर दुसºया टप्प्यात परभणी ते गंगाखेड या रस्त्याचे काम हाती घेण्यात येणार आहे़ तशी माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या नांदेड येथील सूत्रांकडून मिळाली़ आता पहिला टप्पाच सुरू झालेला नाही़, तेव्हा दुसºया टप्प्याचा विचारच न केलेला बरा़ त्यामुळे परभणी-गंगाखेड या रस्त्याचे तातडीने नव्याने काम होण्याची शक्यता तूर्तास तरी मावळली आहे़ परिणामी या रस्त्यावरून ये-जा करणाºया वाहनधारकांच्या मागे लागलेली खड्ड्यांची साडेसाती पाठ सोडण्याचे नाव घेत नाही़ त्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करणाºयांना ‘अच्छे दिन’ची प्रतीक्षा करावी लागणार आहे़