शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

समांतरचा फास सैल

By admin | Updated: July 14, 2015 00:41 IST

औरंगाबाद : पाणी प्रश्नावर आयोजित महानगरपालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत सोमवारी सर्वपक्षीय नगरसेवकांनी सिटी वॉटर युटिलिटी कंपनीच्या कारभारावर सडकून टीका केली

औरंगाबाद : पाणी प्रश्नावर आयोजित महानगरपालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत सोमवारी सर्वपक्षीय नगरसेवकांनी सिटी वॉटर युटिलिटी कंपनीच्या कारभारावर सडकून टीका केली. तसेच आधी पाणी द्या, मगच नळांना मीटर बसवा, अशी भूमिका नगरसेवकांनी घेतली. साडेसहा तास चाललेल्या सभेत सेनेच्या नगरसेवकांनीही भाजप नगरसेवकांच्या सुरात सूर मिसळत कंपनीच्या त्रासाचा पाढा वाचला. शेवटी महापौरांनी तूर्तास घरगुती नळांना मीटर बसवू नये, पाणीपट्टीची वसुली पूर्वीप्रमाणे मनपा कर्मचाऱ्यांकडूनच करण्यात यावी आणि नागरिकांना मीटर बाहेरून खरेदी करण्याची मुभा देण्यात यावी, असे आदेश दिले. भाजप नगरसेवकांच्या मागणीवरून आज विस्कळीत पाणीपुरवठा आणि मीटरच्या विषयावर विशेष सर्वसाधारण सभा बोलविण्यात आली होती. महापौर त्र्यंबक तुपे यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी १०.३० वाजता सभेला सुरुवात झाली. बैठकीच्या सुरुवातीला दिवंगत उर्दू शायर बशर नवाज यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. समांतरचे कंत्राट घेतलेल्या वॉटर युटिलिटी कंपनीकडे शहराचा पाणीपुरवठा हस्तांतरित होऊन दहा महिने झाले. या काळात पाणीपुरवठा सुधारण्याऐवजी बिघडला आहे. सहा-सहा दिवस पाणी येत नाही. तक्रार केली तरी कंपनीचे अधिकारी दखल घेत नाहीत, अशी तक्रार बापू घडामोडे, राजू शिंदे, अब्दुल नाईकवाडी, कीर्ती शिंदे, अंकिता विधाते, माधुरी अदवंत, वॉटर युटिलिटीकडून शहरात मीटरच्या नावाखाली नागरिकांची लूट सुरू आहे. लोकमतने गेल्या काही दिवसांपासून विविध वृत्तातून त्यावर प्रकाश टाकला. कंपनीचे मीटर पाण्याऐवजी हवेचेही रीडिंग दाखवीत असल्याचे आणि बाराशे रुपयांच्या मीटरसाठी ३६०० रुपये आकारले जात असल्याचेही लोकमतने समोर आणले. ४या वृत्ताच्या प्रती नगरसेविका कीर्ती शिंदे यांनी झळकावल्या. तर नगरसेविका सत्यभामा शिंदे यांनी पाणी प्रश्नावरील आंदोलनाचे वृत्त असलेले अंक दाखवीत कंपनीने नगरसेवकांवर अशी वेळ आणल्याचा आरोप केला. हवेवर फिरणाऱ्या मीटरचा सभागृहातच डेमो वॉटर युटिलिटी कंपनीकडून शहरात नळांना बसविण्यात येणारे मीटर नुसत्या हवेवरही फिरत आहेत. नळाला पाणी येण्याआधी हवा आली तरी मीटरचे रीडिंग बदलत आहे. भाजपच्या नगरसेवकांनी सभागृहात याचे प्रात्यक्षिकच करून दाखविले. त्यासाठी सभागृहात मीटर आणण्यात आले होते. बापू घडामोडे, राज वानखेडे, राजू शिंदे यांनी या मीटरला जोडलेल्या नळाच्या पाईपमध्ये हवा फुकून दाखविली. सभागृहात चर्चेदरम्यान सभागृह नेते राजेंद्र जंजाळ यांनी औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा केला. त्याला एमआयएमच्या नगरसेवकांनी आक्षेप घेतला. त्यावर महापौरांनी त्यांना जे म्हणायचे ते म्हणू द्या, तुम्हाला जे म्हणायचे ते म्हणा असे म्हटले. ४त्यानंतर संतापलेल्या एमआयएमच्या नगरसेवकांनी सभागृहात अल्लाहो अकबर, नारा ए तकदीरच्या घोषणा देण्यास सुरुवात केली. हे पाहून मग सेनेच्या नगरसेवकांनीही जयभवानी जयशिवाजीच्या घोषणा सुरू केल्या. त्यामुळे सभागृहात एकच गोंधळ झाला. महापौरांनी सर्वांना शांत राहण्याचे आवाहन केल्यानंतर थोड्याच वेळात वातावरण निवळले. पाणीपट्टी वसुली आणि मीटरबाबत महापौर आदेश देत असतानाच मनपा आयुक्त प्रकाश महाजन यांनी त्यास आपल्या जागेवर उठून विरोध दर्शविला. समांतरचा करार करताना काही अटी मान्य करण्यात आल्या आहेत. सभागृहाने त्याला मान्यताही दिलेली आहे. त्यामुळे अशा पद्धतीने निर्णय घेणे चुकीचे आहे, असे त्यांनी सांगितले.