शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
2
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
3
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
4
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
5
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
6
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
7
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
8
Jara Hatke: टक्कल पडू नये म्हणून 'या' मंदिरात देवाला अर्पण करतात केसांची बट
9
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
10
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
11
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
12
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
13
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
14
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
15
Kapil Dev On Gautam Gambhir : गौतम गंभीर कोच नव्हे मॅनेजर! कपिल देव यांनी संदर्भासह दिलं स्पष्टीकरण
16
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
17
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
18
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
19
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
Daily Top 2Weekly Top 5

समांतरचा फास सैल

By admin | Updated: July 14, 2015 00:41 IST

औरंगाबाद : पाणी प्रश्नावर आयोजित महानगरपालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत सोमवारी सर्वपक्षीय नगरसेवकांनी सिटी वॉटर युटिलिटी कंपनीच्या कारभारावर सडकून टीका केली

औरंगाबाद : पाणी प्रश्नावर आयोजित महानगरपालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत सोमवारी सर्वपक्षीय नगरसेवकांनी सिटी वॉटर युटिलिटी कंपनीच्या कारभारावर सडकून टीका केली. तसेच आधी पाणी द्या, मगच नळांना मीटर बसवा, अशी भूमिका नगरसेवकांनी घेतली. साडेसहा तास चाललेल्या सभेत सेनेच्या नगरसेवकांनीही भाजप नगरसेवकांच्या सुरात सूर मिसळत कंपनीच्या त्रासाचा पाढा वाचला. शेवटी महापौरांनी तूर्तास घरगुती नळांना मीटर बसवू नये, पाणीपट्टीची वसुली पूर्वीप्रमाणे मनपा कर्मचाऱ्यांकडूनच करण्यात यावी आणि नागरिकांना मीटर बाहेरून खरेदी करण्याची मुभा देण्यात यावी, असे आदेश दिले. भाजप नगरसेवकांच्या मागणीवरून आज विस्कळीत पाणीपुरवठा आणि मीटरच्या विषयावर विशेष सर्वसाधारण सभा बोलविण्यात आली होती. महापौर त्र्यंबक तुपे यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी १०.३० वाजता सभेला सुरुवात झाली. बैठकीच्या सुरुवातीला दिवंगत उर्दू शायर बशर नवाज यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. समांतरचे कंत्राट घेतलेल्या वॉटर युटिलिटी कंपनीकडे शहराचा पाणीपुरवठा हस्तांतरित होऊन दहा महिने झाले. या काळात पाणीपुरवठा सुधारण्याऐवजी बिघडला आहे. सहा-सहा दिवस पाणी येत नाही. तक्रार केली तरी कंपनीचे अधिकारी दखल घेत नाहीत, अशी तक्रार बापू घडामोडे, राजू शिंदे, अब्दुल नाईकवाडी, कीर्ती शिंदे, अंकिता विधाते, माधुरी अदवंत, वॉटर युटिलिटीकडून शहरात मीटरच्या नावाखाली नागरिकांची लूट सुरू आहे. लोकमतने गेल्या काही दिवसांपासून विविध वृत्तातून त्यावर प्रकाश टाकला. कंपनीचे मीटर पाण्याऐवजी हवेचेही रीडिंग दाखवीत असल्याचे आणि बाराशे रुपयांच्या मीटरसाठी ३६०० रुपये आकारले जात असल्याचेही लोकमतने समोर आणले. ४या वृत्ताच्या प्रती नगरसेविका कीर्ती शिंदे यांनी झळकावल्या. तर नगरसेविका सत्यभामा शिंदे यांनी पाणी प्रश्नावरील आंदोलनाचे वृत्त असलेले अंक दाखवीत कंपनीने नगरसेवकांवर अशी वेळ आणल्याचा आरोप केला. हवेवर फिरणाऱ्या मीटरचा सभागृहातच डेमो वॉटर युटिलिटी कंपनीकडून शहरात नळांना बसविण्यात येणारे मीटर नुसत्या हवेवरही फिरत आहेत. नळाला पाणी येण्याआधी हवा आली तरी मीटरचे रीडिंग बदलत आहे. भाजपच्या नगरसेवकांनी सभागृहात याचे प्रात्यक्षिकच करून दाखविले. त्यासाठी सभागृहात मीटर आणण्यात आले होते. बापू घडामोडे, राज वानखेडे, राजू शिंदे यांनी या मीटरला जोडलेल्या नळाच्या पाईपमध्ये हवा फुकून दाखविली. सभागृहात चर्चेदरम्यान सभागृह नेते राजेंद्र जंजाळ यांनी औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा केला. त्याला एमआयएमच्या नगरसेवकांनी आक्षेप घेतला. त्यावर महापौरांनी त्यांना जे म्हणायचे ते म्हणू द्या, तुम्हाला जे म्हणायचे ते म्हणा असे म्हटले. ४त्यानंतर संतापलेल्या एमआयएमच्या नगरसेवकांनी सभागृहात अल्लाहो अकबर, नारा ए तकदीरच्या घोषणा देण्यास सुरुवात केली. हे पाहून मग सेनेच्या नगरसेवकांनीही जयभवानी जयशिवाजीच्या घोषणा सुरू केल्या. त्यामुळे सभागृहात एकच गोंधळ झाला. महापौरांनी सर्वांना शांत राहण्याचे आवाहन केल्यानंतर थोड्याच वेळात वातावरण निवळले. पाणीपट्टी वसुली आणि मीटरबाबत महापौर आदेश देत असतानाच मनपा आयुक्त प्रकाश महाजन यांनी त्यास आपल्या जागेवर उठून विरोध दर्शविला. समांतरचा करार करताना काही अटी मान्य करण्यात आल्या आहेत. सभागृहाने त्याला मान्यताही दिलेली आहे. त्यामुळे अशा पद्धतीने निर्णय घेणे चुकीचे आहे, असे त्यांनी सांगितले.