शहरं
Join us  
Trending Stories
1
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
2
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
3
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
4
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
5
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
6
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
7
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
8
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
9
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
10
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
11
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
12
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
13
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
14
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
15
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
16
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
17
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
18
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
19
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष
20
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल

नवीन विकासकामांवर गंडांतर!

By admin | Updated: August 12, 2014 02:01 IST

औरंगाबाद : महापालिकेतील विद्यमान १०४ नगरसेवकांचे सत्तेतील ७ महिने शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त कामे करून २०१५ च्या निवडणुकांना

औरंगाबाद : महापालिकेतील विद्यमान १०४ नगरसेवकांचे सत्तेतील ७ महिने शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त कामे करून २०१५ च्या निवडणुकांना सामोरे जाण्याच्या तयारीत असलेल्या नगरसेवकांच्या मनसुब्यांवर प्रशासनाने आज पाणी फेरले. जुन्यांपैकी ज्या कामांना प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे, तीच कामे पूर्ण होतील. ज्या नगरसेवकांचे कुठलेही काम बजेटमध्ये नाही. त्यांचे ३० लाख रुपयांपर्यंतचे काम करण्याची तरतूद केली जाईल. नवीन विकासकामे होणे अशक्य आहे, असे स्पष्टीकरण आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी आज सभागृहात दिले. मनपाच्या अर्थकारणाचे वास्तव त्यांनी सभागृहात मांडल्यामुळे नगरसेवकांनी स्पील ओव्हरच्या (शिल्लक कामे) कामांमुळे आक्रमकपणे उपसलेली तलवार नगरसेवकांनी म्यान केली. महापौर कला ओझा यांनी आदेश दिले की, आचारसंहितेपूर्वी नगरसेवकांच्या प्रलंबित संचिकांवर प्रशासनाने तातडीने स्वाक्षऱ्या कराव्यात. ही तर नागरिकांची थट्टाशहरात काही ठिकाणी खड्डे पडले आहेत. ड्रेनेज चोक अप आहेत, पाणीपुरवठा सुरळीत होत नाही, अशी नागरिकांची थट्टा सुरू आहे. मनपाने भूमिका बदलली नाहीतर सभागृह चालू देणार नाही, असा इशारा नगरसेवक मुजीब खान यांनी दिला. प्रशासन कुठे चालले आहे, ते चालविणारे कुठे चालले आहेत, नगरसेवकांना स्पील ओव्हरची कामे होणार नाहीत एवढे सांगितले जात आहे. महापौरांनी त्यांच्या वॉर्डात कोट्यवधींची कामे टाकून घेतली. काही वॉर्डांमध्ये ४ कोटींची कामे तर कुठे एकही काम नाही. ही सावत्र वागणूक दिली गेली आहे. १०० कोटींच्या पथदिव्यांच्या योजनेची निविदा काढली जात आहे. ती रक्कम कुठून देणार हा प्रश्न आहे, असेही ते म्हणाले.महापौरांकडून दुरुपयोगसभागृहाने महापौरांना बजेटमध्ये तरतुदी करण्याचे अधिकार दिले होते. मात्र, महापौरांनी त्या अधिकाराचा दुरुपयोग केल्याचे स्पष्ट झाल्याचा आरोप नगरसेवक प्रमोद राठोड यांनी केला. कोणती कामे होणार ते सांगापथदिव्यांचे १०० कोटींचे कंत्राट दिले जाणार आहे, भूमिगत गटार योजना मार्गी लागली आहे. समांतरचे काम सुरू होणार आहे. वॉटर, गटार, मीटरचा प्रश्न संपला असेल तर मनपा यापुढे कोणती कामे करणारे ते सांगावे, असे नगरसेवक त्र्यंबक तुपे म्हणाले. नगरसेवक संजय केनेकर म्हणाले, लोकसभा निवडणुकीपासून कामे थांबलेली आहेत. विकासकामे कधी होणार हे प्रशासनाने स्पष्ट करावे. खासदार व पदाधिकाऱ्यांमध्ये स्पील ओव्हरच्या कामांवरू न चार वेळा बैठका झाल्या तरीही काही परिणाम होत नाही.