शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
3
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
4
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
5
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
6
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
7
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
8
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
9
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
10
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
11
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
12
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
13
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
14
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
15
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
16
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
17
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
18
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
19
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
20
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या

नवीन विकासकामांवर गंडांतर!

By admin | Updated: August 12, 2014 02:01 IST

औरंगाबाद : महापालिकेतील विद्यमान १०४ नगरसेवकांचे सत्तेतील ७ महिने शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त कामे करून २०१५ च्या निवडणुकांना

औरंगाबाद : महापालिकेतील विद्यमान १०४ नगरसेवकांचे सत्तेतील ७ महिने शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त कामे करून २०१५ च्या निवडणुकांना सामोरे जाण्याच्या तयारीत असलेल्या नगरसेवकांच्या मनसुब्यांवर प्रशासनाने आज पाणी फेरले. जुन्यांपैकी ज्या कामांना प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे, तीच कामे पूर्ण होतील. ज्या नगरसेवकांचे कुठलेही काम बजेटमध्ये नाही. त्यांचे ३० लाख रुपयांपर्यंतचे काम करण्याची तरतूद केली जाईल. नवीन विकासकामे होणे अशक्य आहे, असे स्पष्टीकरण आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी आज सभागृहात दिले. मनपाच्या अर्थकारणाचे वास्तव त्यांनी सभागृहात मांडल्यामुळे नगरसेवकांनी स्पील ओव्हरच्या (शिल्लक कामे) कामांमुळे आक्रमकपणे उपसलेली तलवार नगरसेवकांनी म्यान केली. महापौर कला ओझा यांनी आदेश दिले की, आचारसंहितेपूर्वी नगरसेवकांच्या प्रलंबित संचिकांवर प्रशासनाने तातडीने स्वाक्षऱ्या कराव्यात. ही तर नागरिकांची थट्टाशहरात काही ठिकाणी खड्डे पडले आहेत. ड्रेनेज चोक अप आहेत, पाणीपुरवठा सुरळीत होत नाही, अशी नागरिकांची थट्टा सुरू आहे. मनपाने भूमिका बदलली नाहीतर सभागृह चालू देणार नाही, असा इशारा नगरसेवक मुजीब खान यांनी दिला. प्रशासन कुठे चालले आहे, ते चालविणारे कुठे चालले आहेत, नगरसेवकांना स्पील ओव्हरची कामे होणार नाहीत एवढे सांगितले जात आहे. महापौरांनी त्यांच्या वॉर्डात कोट्यवधींची कामे टाकून घेतली. काही वॉर्डांमध्ये ४ कोटींची कामे तर कुठे एकही काम नाही. ही सावत्र वागणूक दिली गेली आहे. १०० कोटींच्या पथदिव्यांच्या योजनेची निविदा काढली जात आहे. ती रक्कम कुठून देणार हा प्रश्न आहे, असेही ते म्हणाले.महापौरांकडून दुरुपयोगसभागृहाने महापौरांना बजेटमध्ये तरतुदी करण्याचे अधिकार दिले होते. मात्र, महापौरांनी त्या अधिकाराचा दुरुपयोग केल्याचे स्पष्ट झाल्याचा आरोप नगरसेवक प्रमोद राठोड यांनी केला. कोणती कामे होणार ते सांगापथदिव्यांचे १०० कोटींचे कंत्राट दिले जाणार आहे, भूमिगत गटार योजना मार्गी लागली आहे. समांतरचे काम सुरू होणार आहे. वॉटर, गटार, मीटरचा प्रश्न संपला असेल तर मनपा यापुढे कोणती कामे करणारे ते सांगावे, असे नगरसेवक त्र्यंबक तुपे म्हणाले. नगरसेवक संजय केनेकर म्हणाले, लोकसभा निवडणुकीपासून कामे थांबलेली आहेत. विकासकामे कधी होणार हे प्रशासनाने स्पष्ट करावे. खासदार व पदाधिकाऱ्यांमध्ये स्पील ओव्हरच्या कामांवरू न चार वेळा बैठका झाल्या तरीही काही परिणाम होत नाही.