शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

नवीन विकासकामांवर गंडांतर!

By admin | Updated: August 12, 2014 02:01 IST

औरंगाबाद : महापालिकेतील विद्यमान १०४ नगरसेवकांचे सत्तेतील ७ महिने शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त कामे करून २०१५ च्या निवडणुकांना

औरंगाबाद : महापालिकेतील विद्यमान १०४ नगरसेवकांचे सत्तेतील ७ महिने शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त कामे करून २०१५ च्या निवडणुकांना सामोरे जाण्याच्या तयारीत असलेल्या नगरसेवकांच्या मनसुब्यांवर प्रशासनाने आज पाणी फेरले. जुन्यांपैकी ज्या कामांना प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे, तीच कामे पूर्ण होतील. ज्या नगरसेवकांचे कुठलेही काम बजेटमध्ये नाही. त्यांचे ३० लाख रुपयांपर्यंतचे काम करण्याची तरतूद केली जाईल. नवीन विकासकामे होणे अशक्य आहे, असे स्पष्टीकरण आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी आज सभागृहात दिले. मनपाच्या अर्थकारणाचे वास्तव त्यांनी सभागृहात मांडल्यामुळे नगरसेवकांनी स्पील ओव्हरच्या (शिल्लक कामे) कामांमुळे आक्रमकपणे उपसलेली तलवार नगरसेवकांनी म्यान केली. महापौर कला ओझा यांनी आदेश दिले की, आचारसंहितेपूर्वी नगरसेवकांच्या प्रलंबित संचिकांवर प्रशासनाने तातडीने स्वाक्षऱ्या कराव्यात. ही तर नागरिकांची थट्टाशहरात काही ठिकाणी खड्डे पडले आहेत. ड्रेनेज चोक अप आहेत, पाणीपुरवठा सुरळीत होत नाही, अशी नागरिकांची थट्टा सुरू आहे. मनपाने भूमिका बदलली नाहीतर सभागृह चालू देणार नाही, असा इशारा नगरसेवक मुजीब खान यांनी दिला. प्रशासन कुठे चालले आहे, ते चालविणारे कुठे चालले आहेत, नगरसेवकांना स्पील ओव्हरची कामे होणार नाहीत एवढे सांगितले जात आहे. महापौरांनी त्यांच्या वॉर्डात कोट्यवधींची कामे टाकून घेतली. काही वॉर्डांमध्ये ४ कोटींची कामे तर कुठे एकही काम नाही. ही सावत्र वागणूक दिली गेली आहे. १०० कोटींच्या पथदिव्यांच्या योजनेची निविदा काढली जात आहे. ती रक्कम कुठून देणार हा प्रश्न आहे, असेही ते म्हणाले.महापौरांकडून दुरुपयोगसभागृहाने महापौरांना बजेटमध्ये तरतुदी करण्याचे अधिकार दिले होते. मात्र, महापौरांनी त्या अधिकाराचा दुरुपयोग केल्याचे स्पष्ट झाल्याचा आरोप नगरसेवक प्रमोद राठोड यांनी केला. कोणती कामे होणार ते सांगापथदिव्यांचे १०० कोटींचे कंत्राट दिले जाणार आहे, भूमिगत गटार योजना मार्गी लागली आहे. समांतरचे काम सुरू होणार आहे. वॉटर, गटार, मीटरचा प्रश्न संपला असेल तर मनपा यापुढे कोणती कामे करणारे ते सांगावे, असे नगरसेवक त्र्यंबक तुपे म्हणाले. नगरसेवक संजय केनेकर म्हणाले, लोकसभा निवडणुकीपासून कामे थांबलेली आहेत. विकासकामे कधी होणार हे प्रशासनाने स्पष्ट करावे. खासदार व पदाधिकाऱ्यांमध्ये स्पील ओव्हरच्या कामांवरू न चार वेळा बैठका झाल्या तरीही काही परिणाम होत नाही.