शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

‘समांतर’ने घातला मनपाला गंडा

By admin | Updated: July 30, 2016 01:01 IST

औरंगाबाद : औरंगाबाद वॉटर युटिलिटी कंपनीच्या फसवणुकीचे प्रकार आता उघडकीस येत असून, मनपा हद्दीच्या बाहेर नागरिकांकडून अभय योजनेंतर्गत लाखो रुपये जमा केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला

औरंगाबाद : समांतर जलवाहिनीचा ठेका घेतलेल्या औरंगाबाद वॉटर युटिलिटी कंपनीच्या फसवणुकीचे प्रकार आता उघडकीस येत असून, मनपा हद्दीच्या बाहेर नागरिकांकडून अभय योजनेंतर्गत लाखो रुपये जमा केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, महापालिकेने कंपनीविरुद्ध फसवणूक, पैशांचा अपहार केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. महापालिकेने १ सप्टेंबर २०१४ रोजी महापालिका हद्दीतील संपूर्ण पाणीपुरवठ्याचा भार औरंगाबाद वॉटर युटिलिटी कंपनीकडे सोपविला. कंपनीला फक्त मनपा हद्दीत काम करण्याचे अधिकार मनपाने दिले. कंपनीने मनपाच्या हद्दीत नसलेल्या अब्रार कॉलनी, शहानगर, बीड बायपास भागातील अनेक वसाहतींमध्ये अनधिकृत नळ अधिकृत करून देण्याची योजना आखली. सातारा परिसरात या वसाहतींचा समावेश असतानाही कंपनीने नागरिकांकडून लाखो रुपये जमा केले. अलीकडेच सातारा परिसराचा मनपा हद्दीत समावेश करण्यात आला आहे. कंपनीने मनपा हद्दीबाहेर जाऊन काम केले. ज्या नागरिकांकडून पैसे घेण्यात आले होते, त्यांना कस्टमर क्रमांकही दिला नाही. नागरिकांकडून जमा केलेले पैसे मनपाच्या तिजोरीतही जमा केले नाही. ज्या नागरिकांनी कंपनीला नळ अधिकृत करण्यासाठी पैसे दिले होते, ते नागरिक मनपा कार्यालयांमध्ये यावर्षीचे पैसे भरण्यासाठी येत आहेत. मनपाकडे त्यांचे नळ अधिकृत केल्याचे कोणतेही रेकॉर्ड नाही. मनपाने चौकशी केली असता कंपनीचे पितळ उघडे पडले. उपअभियंत्याच्या तक्रारीवरून साताऱ्यात गुन्हा महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता आय. बी. खाजा यांनी सातारा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीत कंपनीने १ सप्टेंबर २०१४ ते २८ जुलै २०१६ पर्यंत अनेक नागरिकांकडून अभय योजनेत पैसे जमा केले. कंपनीचे संचालक ऋषभ सुशील सेठी यांनी रक्कम मनपाकडे जमा केलीच नाही. कंपनीने महापालिकेची फसवणूक केल्याची तक्रार देण्यात आली. पोलिसांनी फसवणूक आणि पैशांचा अपहार केल्याबद्दल सेठी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.