शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

समांतरचा फास युतीच्या गळ्याला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2016 00:48 IST

औरंगाबाद : समांतर जलवाहिनीचे काम करणाऱ्या औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीला करार रद्द करण्यासाठी मनपाने ५ एप्रिल रोजी नोटीस पाठविली होती.

औरंगाबाद : समांतर जलवाहिनीचे काम करणाऱ्या औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीला करार रद्द करण्यासाठी मनपाने ५ एप्रिल रोजी नोटीस पाठविली होती. मागील आठवड्यात कंपनीने मनपाला उत्तरही दिले. आता करार रद्द करण्याचा निर्णय सर्वसाधारण सभेला घ्यावा लागणार आहे. शिवसेना थेट करार रद्द करण्यास तयार नाही. शहरातील पाण्याचा प्रश्न आपल्या अंगलट येईल म्हणून भाजपही सावध भूमिका घेत आहे.शासनादेशानुसार ५ एप्रिल रोजी मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी कंपनीला करार रद्द का करण्यात येऊ नये, अशा आशयाची नोटीस पाठविली. मागील आठवड्यात ३९ पानांचे उत्तर कंपनीने मनपाला दिले आहे. या उत्तरावर मनपा प्रशासन कोणतेही भाष्य करायला तयार नाही. कारण समांतर जलवाहिनीचा करार सर्वसाधारण सभेने केला आहे. करार रद्द करा, असा प्रस्ताव मनपा प्रशासन सर्वसाधारण सभेत ठेवणार नाही. कंपनीचे उत्तर आणि शासनाने दिलेले निर्देश सर्वसाधारण सभेसमोर ठेवण्यात येतील. त्यावर योग्य तो निर्णय घ्यावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात येणार आहे. शिवसेना थेट करार रद्द करण्यास तयार नाही. भाजपही सावध भूमिका घेत आहे. त्यामुळे सर्वसाधारण सभेच्या कोर्टात चेंडू आहे.