शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

शहरातील गुन्हेगारांची सीपींसमोर ‘परेड’

By admin | Updated: September 10, 2016 00:24 IST

औरंगाबाद : गणेशोत्सवादरम्यानच ईद साजरी होत आहे. शिवाय मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचा कार्यक्रम मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होत आहे

औरंगाबाद : गणेशोत्सवादरम्यानच ईद साजरी होत आहे. शिवाय मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचा कार्यक्रम मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होत आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील ‘उचापती’खोर गुन्हेगारांना बोलावून त्यांची थेट पोलीस आयुक्तांसमोर परेड घेतली जात आहे. चार दिवसांमध्ये आतापर्यंत बारा गुन्हेगारांना आयुक्तांसमोर हजर करण्यात आले आहे.गणेशोत्सवाच्या काळात शहरात शांतता राहावी, यासाठी पोलिसांनी शहरातील उचापतीखोर आणि रेकॉर्डवरील ७०० जणांची यादी तयार केली. या लोकांविरोधात दंगा करणे, दहशत निर्माण करणे, तलवार, चाकूसारखे शस्त्र घेऊन फिरणे, मारहाण करणे, लुटमार करणे आदी स्वरुपाचे गुन्हे यापूर्वी दाखल आहेत. उत्सवाला गालबोट लागू नये, यासाठी पोलीस प्रशासनाने या गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे आदेश प्रत्येक पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांना दिले. त्यानुसार प्रत्येक ठाण्यातील पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगारांना पकडून सहायक पोलीस आयुक्तांसमोर उभे करीत आहेत. त्याने व एका प्रतिष्ठित व्यक्तीने चांगल्या वागणुकीची हमी दिल्यानंतरच मुक्त केले जात आहे. खून, खुनाच्या प्रयत्नासह दहशत निर्माण करणाऱ्या २५ गुन्हेगारांना हजर करण्याचे आदेश आयुक्तांनी गुन्हे शाखेला दिले आहेत. त्यानुसार आतापर्यंत १० ते १२ जणांची पोलीस आयुक्तांनी आपल्या पद्धतीने ओळख परेड करून घेतली. शिवाय उर्वरित गुन्हेगारांना रोज उचलून आणले जात असल्याची माहिती पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांनी दिली. आतापर्यंत १५० हून अधिक गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केल्याचे त्यांनी सांगितले.दिवसभर बसवून ठेवल्यामुळे चांगलीच जरब...आरोपीला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी उचलून आणल्यानंतर त्यास गुन्हे शाखेतील एका खोलीत बसण्यास सांगितले जाते. यावेळी तो साहेब माझी काय चूक आहे ? मी अत्यंत शांत राहत असून, उचापती करणे सोडून दिले आहे, असे तो सांगत असतो. त्यावेळी पोलीस आयुक्त साहेबांनी तुला बोलावले आहे. साहेब सांगतील तेव्हा तुला त्यांच्यासमोर हजर केले जाईल. त्यानंतरच तुला येथे ठेवायचे अथवा सोडून द्यायचे याबाबत निर्णय होईल, असे सांगितले जाते. बसविल्यानंतर सायंकाळी त्यास आयुक्तांसमोर हजर केले जाते.