शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
3
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
4
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
5
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
6
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
7
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
8
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
9
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
10
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
11
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
12
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
13
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
14
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
15
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
16
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
17
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
18
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
19
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
20
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."

शहरातील गुन्हेगारांची सीपींसमोर ‘परेड’

By admin | Updated: September 10, 2016 00:24 IST

औरंगाबाद : गणेशोत्सवादरम्यानच ईद साजरी होत आहे. शिवाय मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचा कार्यक्रम मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होत आहे

औरंगाबाद : गणेशोत्सवादरम्यानच ईद साजरी होत आहे. शिवाय मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचा कार्यक्रम मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होत आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील ‘उचापती’खोर गुन्हेगारांना बोलावून त्यांची थेट पोलीस आयुक्तांसमोर परेड घेतली जात आहे. चार दिवसांमध्ये आतापर्यंत बारा गुन्हेगारांना आयुक्तांसमोर हजर करण्यात आले आहे.गणेशोत्सवाच्या काळात शहरात शांतता राहावी, यासाठी पोलिसांनी शहरातील उचापतीखोर आणि रेकॉर्डवरील ७०० जणांची यादी तयार केली. या लोकांविरोधात दंगा करणे, दहशत निर्माण करणे, तलवार, चाकूसारखे शस्त्र घेऊन फिरणे, मारहाण करणे, लुटमार करणे आदी स्वरुपाचे गुन्हे यापूर्वी दाखल आहेत. उत्सवाला गालबोट लागू नये, यासाठी पोलीस प्रशासनाने या गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे आदेश प्रत्येक पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांना दिले. त्यानुसार प्रत्येक ठाण्यातील पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगारांना पकडून सहायक पोलीस आयुक्तांसमोर उभे करीत आहेत. त्याने व एका प्रतिष्ठित व्यक्तीने चांगल्या वागणुकीची हमी दिल्यानंतरच मुक्त केले जात आहे. खून, खुनाच्या प्रयत्नासह दहशत निर्माण करणाऱ्या २५ गुन्हेगारांना हजर करण्याचे आदेश आयुक्तांनी गुन्हे शाखेला दिले आहेत. त्यानुसार आतापर्यंत १० ते १२ जणांची पोलीस आयुक्तांनी आपल्या पद्धतीने ओळख परेड करून घेतली. शिवाय उर्वरित गुन्हेगारांना रोज उचलून आणले जात असल्याची माहिती पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांनी दिली. आतापर्यंत १५० हून अधिक गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केल्याचे त्यांनी सांगितले.दिवसभर बसवून ठेवल्यामुळे चांगलीच जरब...आरोपीला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी उचलून आणल्यानंतर त्यास गुन्हे शाखेतील एका खोलीत बसण्यास सांगितले जाते. यावेळी तो साहेब माझी काय चूक आहे ? मी अत्यंत शांत राहत असून, उचापती करणे सोडून दिले आहे, असे तो सांगत असतो. त्यावेळी पोलीस आयुक्त साहेबांनी तुला बोलावले आहे. साहेब सांगतील तेव्हा तुला त्यांच्यासमोर हजर केले जाईल. त्यानंतरच तुला येथे ठेवायचे अथवा सोडून द्यायचे याबाबत निर्णय होईल, असे सांगितले जाते. बसविल्यानंतर सायंकाळी त्यास आयुक्तांसमोर हजर केले जाते.