शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

पपई उत्पादनातून शेतकऱ्यांसमोर ठेवला आदर्श

By admin | Updated: December 15, 2015 23:43 IST

प्रसाद आर्वीकर, परभणी शेतकऱ्यांच्या हक्कासाठी वर्षभर शासनासोबत दोन हात करणाऱ्या कॉ़ विलास बाबर यांनी स्वत:च्या शेतीत अभ्यासपूर्ण बदल करीत शेतकऱ्यांसमोर एक परिपाठ निर्माण केला आहे़

प्रसाद आर्वीकर, परभणी शेतकऱ्यांच्या हक्कासाठी वर्षभर शासनासोबत दोन हात करणाऱ्या कॉ़ विलास बाबर यांनी स्वत:च्या शेतीत अभ्यासपूर्ण बदल करीत शेतकऱ्यांसमोर एक परिपाठ निर्माण केला आहे़ सरकार आणि निसर्ग दोघेही साथ देत नाही, अशा वेळेला स्वत: खंबीर होऊन सक्षम बनावे, असा सल्ला त्यांनी यानिमित्ताने दिला़ कॉ़ विलास बाबर हे तालुक्यातील सुरपिंपरी येथील शेतकरी़ डाळींब, ऊस ही पिके पाणी नसल्याने पिके पूर्णत: मोडून काढली आणि यावर्षी निर्माण झालेल्या वातावरणाचा अभ्यास करीत पपईचे उत्पादन घेण्याचा निर्णय घेतला़ तैवान ७८६ या वाणाच्या पपईची तीन एकरात लागवड केली़ विहिरींचे पाणी कमी झाल्याने शेततळे घेऊन पपईसाठी संरक्षित पाणीसाठा उपलब्ध केला़ सर्वसाधारणपणे पपईचे एकरी ४० टन उत्पन्न मिळते. मात्र आपण योग्य नियोजन केल्याने एकरी ५० टन उत्पन्न मिळेल, अशी आशा त्यांना आहे़ सध्या ६० टन पपई मुंबईच्या बाजारपेठेत विक्रीसाठी पाठविली आहे़ पपई हे सर्वात नाजूक पीक आहे़ लवकर रोगाचा प्रादुर्भाव होतो़ त्यामुळे प्रत्येक वेळी या पिकाची निगा राखत रोग होऊ नये, याची काळजी घेतली़ परिणामी आज दर्जेदार उत्पादन निघाले आहे आणि बाजारात चांगली मागणी मिळाली़ तज्ज्ञांचा सल्ला घेतला जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी बांधवांवर संकटांची मालिका सुरू आहे़ अशा स्थितीत शेतकऱ्यांनी खर्च न वाढविता पिकांचे उत्पादन घ्यावे़ बाजारपेठेचा अभ्यास करावा़ आपल्याकडे कृषी विद्यापीठ आहे़ काही शेतकऱ्यांनी चांगले बदल करीत प्रयोगशीलता जोपासली आहे़ अशा तज्ज्ञांशी संपर्कात रहावे आणि संपूर्ण नियोजन करून पीक घ्यावे़ मी देखील हे बदल केले आहेत़ -कॉ़ विलास बाबर