शहरं
Join us  
Trending Stories
1
Gambhira Bridge Collapse : भयानक Video! गुजरातमध्ये गंभीरा पूल कोसळला, अनेक वाहने पाण्यात पडली; तिघांचा मृत्यू, शोध सुरु 
2
'चीन, पाकिस्तान आणि बांगलादेशची एकी भारतासाठी धोकादायक', CDS प्रमुख चौहान यांचं मुद्द्यावर बोट
3
मेट्रो प्रकल्पाला गती देण्यासाठी २५० परप्रांतीय मजूर मुंबईत दाखल; काहींना विमानाने मुंबईत आणले
4
ही तर सोनमपेक्षा एक पाऊल पुढे! बॉयफ्रेंडसाठी पतीला विष दिलं अन् कुणालाही कळण्याआधी केला खेळ खल्लास!
5
Stock Market Today: ७६ अंकांनी घसरून उघडला सेन्सेक्स; ३ सेक्टर्समध्ये तेजी, का अस्थिर आहे मार्केट?
6
भारत बंद होण्याआधीच इंडिया आघाडीचा चक्का जाम; बिहारमध्ये निवडणूक आयोगाविरोधात रस्ते बंद, रेल्वे रोखल्या
7
Pension Scheme: वृद्धापकाळात दरमहा ₹२०,५०० चं पेन्शन देईल ही स्कीम; पाहा याचे जबरदस्त ५ फायदे
8
Alia Bhatt : अभिनेत्री आलिया भटच्या माजी पर्सनल असिस्टंटला अटक; ७६ लाखांच्या फसवणुकीचा गंभीर आरोप
9
"मृणालची इमेज खराब होणार नाही अशी आशा", अजय देवगणसोबतचा डान्स पाहून केलं ट्रोल
10
लेकीला वाचवण्यासाठी आईने घरही विकलं, तरीही...; कोण आहे निमिषा प्रिया? येमेनमध्ये होणार फाशीची शिक्षा
11
लग्नाच्या पहिल्या रात्रीच पती नपुंसक असल्याचे समजले, तिने मोठ्या जावेला सांगितले, मग दीर आला...
12
Sanjay Gaikwad : आमदार संजय गायकवाडांचा राडा, आमदार निवास कँटिनमधील कर्मचाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण
13
स्मृती ईराणींचा राजकारणातून अभिनयाकडे युटर्न, १७ वर्षांनंतरच्या कमबॅकवर म्हणाल्या- 'पार्ट टाइम अ‍ॅक्ट्रेस'
14
लग्नाच्या ३ वर्षांतच पायल रोहतगीचा होणार घटस्फोट? ७ वर्ष लहान कुस्तीपटूशी थाटलेला संसार
15
"माझ्यासाठीच नाही, तर १४० कोटी भारतीयांसाठीही..."; ब्राझीलचा सर्वोच्च सन्मान मिळाल्यावर काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
16
अरे देवा! ज्या सावत्र आईचा आशीर्वाद घ्यायचा, तिच्यासोबत पळाला अल्पवयीन मुलगा; केलं लग्न
17
Kangana Ranaut : "लोकांना तिला निवडून दिल्याबद्दल पश्चात्ताप होतोय"; कंगना राणौतवर काँग्रेसचा जोरदार हल्लाबोल
18
पुणे : बाहेरून दिसायचा स्पा, आत चालायचा देह व्यापार; १८ मुलींची सुटका, परदेशी मुलींचाही समावेश
19
Video - संतापजनक! राजस्थानमध्ये उद्घाटनापूर्वीच वाहून गेला नवा रस्ता; पावसाने केली पोलखोल
20
अहमदाबाद विमान दुर्घटनेच्या प्राथमिक चौकशी अहवालात काय?; कारण अद्यापही गुलदस्त्यात

अभियांत्रिकीचा पेपर फुटल्याची अफवा

By admin | Updated: May 24, 2016 01:22 IST

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने घेण्यात येत असलेल्या अभियांत्रिकी द्वितीय वर्षाचा गणिताचा पेपर फुटल्याची अफवा सोमवारी दिवसभर फिरत होती.

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने घेण्यात येत असलेल्या अभियांत्रिकी द्वितीय वर्षाचा गणिताचा पेपर फुटल्याची अफवा सोमवारी दिवसभर फिरत होती. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी ही बाब विद्यापीठ प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली असता हे ऐकून सुरुवातीला प्रशासन हादरले. त्यांनी शहरातील सर्व परीक्षा केंद्रांकडे यासंबंधीची तात्काळ चौकशी केली, तेव्हा मात्र असा कोणताही प्रकार घडला नसल्याची माहिती समोर आली. अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या परीक्षेला १३ मेपासून सुरुवात झाली. विद्यापीठ कार्यक्षेत्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये अभियांत्रिकीचे १९ परीक्षा केंद्रे असून, यापैकी १२ परीक्षा केंद्रे औरंगाबाद शहरात आहेत. या परीक्षेला सकाळी १० वाजता प्रारंभ होतो. तत्पूर्वी, सर्व परीक्षा केंद्रांवर विद्यापीठाकडून त्या- त्या दिवशीच सकाळी ८.३० वाजता आॅनलाईन पेपर पाठविले जातात. दरम्यान, आज सकाळी ८.३० ते ९.३० वाजेदरम्यान काही विद्यार्थ्यांच्या व्हॉटस्अ‍ॅपवर अभियांत्रिकी द्वितीय वर्षाच्या गणित (क्रमांक-४) पेपरचे काही प्रश्न फिरत असल्याची कुणकुण लागली. मात्र, दिवसभरात एकाही विद्यार्थ्याने अथवा संबंधित परीक्षा संचालकांनी किंवा प्राचार्यांनी यासंबंधीची तक्रार विद्यापीठ परीक्षा विभागाकडे केलेली नव्हती. परीक्षा नियंत्रक डॉ. नेटके यांनी खोलात जाऊन यासंबंधीची चौकशी केली तेव्हा आजचा पेपर फुटला नसल्याची माहिती समजताच त्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. काही अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर एक-दोन गेस प्रश्न व्हायरल झाले होते. तोच धागा पकडून काही जणांनी खोडसाळपणे अभियांत्रिकी द्वितीय वर्षाचा गणिताचा पेपर फुटल्याची अफवा पसरवली. ही अफवा वाऱ्यासरशी विद्यापीठात पोहोचली आणि विद्यापीठ प्रशासन हादरून गेले. अफवा पसरविणाऱ्या विद्यार्थ्यांचा शोध विद्यापीठ प्रशासन घेत आहे.दुपारी पेपर फुटल्याची माहिती प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींकडून समजली तेव्हा सर्व केंद्रप्रमुख तसेच प्राचार्यांकडून माहिती जाणून घेतली. तेव्हा असा प्रकार कुठेही घडलेला नसल्याचे समजले. यासंबंधीची तक्रार एकाही परीक्षार्थी, प्राध्यापक, प्राचार्य, केंद्रप्रमुखांनी लेखी, तोंडी दिलेली नाही. ही केवळ अफवा आहे, असे परीक्षा नियंत्रक डॉ. दिगंबर नेटके यांनी सांगितले. कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनीही परीक्षेदरम्यान सतर्क राहण्याचे आदेश दिलेले आहेत.