शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
3
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
6
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
7
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
8
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
9
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
10
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
11
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
12
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
13
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
14
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
15
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
16
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
17
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
18
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
19
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
20
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 

पंचनामे झालेल्या तुरीचेच माप !

By admin | Updated: May 11, 2017 23:43 IST

लातूर : नाफेड अंतर्गत लातूर जिल्ह्यात आठ खरेदी केंद्रांवर २ लाख ४९ हजार क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आली असून २२ एप्रिलपूर्वी नोंदी (पंचनामा) झालेल्या ७० हजार क्विंटल तुरीची खरेदी सुरू आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कलातूर : नाफेड अंतर्गत लातूर जिल्ह्यात आठ खरेदी केंद्रांवर २ लाख ४९ हजार क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आली असून २२ एप्रिलपूर्वी नोंदी (पंचनामा) झालेल्या ७० हजार क्विंटल तुरीची खरेदी सुरू आहे. यातील १९ दिवसांत १६ हजार ८०० क्विंटल तुरीची खरेदी झाली असून ५३ हजार २०० क्विंटल तुरीचे माप सध्या सुरूच आहे. दरम्यान, शासनाकडून तूर खरेदी केंद्रांना मुदतवाढ दिली असल्याचे सांगितले जात असले, तरी अद्याप जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालयास हे आदेश प्राप्त झाले नाहीत.लातूर जिल्ह्यात लातूर, उदगीर, जळकोट, अहमदपूर, चाकूर, मुरुड, रेणापूर, औसा, शिरूर अनंतपाळ येथे नाफेडमार्फत तूर खरेदी केंद्र सुरू करण्यात आले होते. ५ हजार ५०० रुपये क्विंटल दराने या केंद्रावर तूर खरेदी करण्यात येत होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी या केंद्रावर तूर विक्रीसाठी गर्दी केली होती. २२ मे पर्यंत १६ हजार शेतकऱ्यांची २ लाख ४९ हजार क्विंटल तूर खरेदी करण्यात आली आहे. २२ मे रोजी पंचनामे झाल्यानंतर १ हजार ६० शेतकऱ्यांची १६ हजार ८०० क्विंटल तूर खरेदी केली. उर्वरित तुरीचे माप सुरु आहे. तूर खरेदी केंद्र बंद केल्याने २२ एप्रिलनंतर तूर खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची तूर घेण्यात आली नाही. केंद्रावर पंचनामे झालेल्याच तुरीचे माप घेण्यात येत आहे. ९४ कोटींचे पेमेंट करण्यात आले असून, २९ कोटींचे पेमेंट शासनाकडे थकले आहे. दरम्यान, शेतकऱ्यांकडून तूर खरेदी केंद्र चालू ठेवण्याची मागणी होत असली, तरी अद्याप शासनाकडून तसे आदेश आले नसल्यामुळे पंचनाम्याव्यतिरिक्त तुरीची खरेदी बंद असल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत.