शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
2
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
3
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
4
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
5
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
6
२ लाख रुपयांवर मिळेल ३०,९०८ रुपये निश्चित व्याज! सरकारी बँक 'या' ग्राहकांना देतेय सर्वाधिक परतावा
7
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
8
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
9
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
10
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
11
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
12
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
13
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
14
Home Remedy: महागडी हेअर ट्रीटमेंट सोडा, ५० रुपयांत लांबसडक, घनदाट, काळेभोर केस मिळवा 
15
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
16
'सिटी ऑफ ड्रीम्स'नंतर प्रिया बापटचा पुन्हा 'तो' सीन, अभिनेत्री सुरवीन चावलासोबत लिपलॉक
17
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
18
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
19
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
20
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?

पंचनाम्याचा नुसताच फार्स

By admin | Updated: August 9, 2014 00:38 IST

लातूर,हरी मोकाशे यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील ५ हजार ७११ एकरवरील नामांकित कंपन्याचे बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी

 

लातूर,हरी मोकाशे  यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील ५ हजार ७११ एकरवरील नामांकित कंपन्याचे बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी २ हजार १९७ शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या़ त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना बियाणे देण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या़ बहुतांशी शेतकऱ्यांना अद्यापही बियाणे मिळाले नाही़ दरम्यान, कृषी विभागाकडून करण्यात येत असलेल्या नुकसानीच्या पंचनाम्याचे काम पूर्णत्वाकडे आले असले तरी शेतकऱ्यांसाठी कुठल्याही मदतीची ठोस उपाययोजना नाहीत. पंचनाम्याचा नुसताच फार्स सुरु आहे. जिल्ह्यात खरीपातील सोयाबीनचे अपेक्षित क्षेत्र ३ लाख ५५ हजार हेक्टर आहे़ नगदी पीक म्हणून जिल्ह्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचा कल सोयाबीनकडे राहिला. यातच यंदाच्या हंगामात उशिरा अल्प पाऊस झाला़ त्यामुळे तूर, उडीद, मूग या पिकांच्या पेरणीचा कालावधी संपुष्टात आल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीनवर भर दिला़ गेल्या वर्षी सोयाबीनचे उत्पादन कमी झाल्याने शासनाने घरगुती बियाणांचा वापर करण्याचे आवाहन केले़ काही शेतकऱ्यांनी उत्पादन घटू नये म्हणून नामांकित कंपन्यांच्या बियाणांचा वापर केला़ पेरणी झालेल्या ३ लाख ४० हजार हेक्टर क्षेत्रापैकी मोठ्या प्रमाणात घरगुती बियाणांचा वापर झाला़ जवळपास ३० टक्के क्षेत्रावर कंपन्यांच्या बियाणांचा वापर करण्यात आला़ परंतु, बोगस बियाणे लागल्याने काही शेतकऱ्यांच्या बियाणांची उगवण झाली नाही़ त्यामुळे जिल्ह्यातील २ हजार १९७ शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या़ या शेतकऱ्यांचे ५ हजार ७११ एकरवरील बियाणाचे नुकसान झाले़ या तक्रारींची लातूरच्या कृषी सहसंचालकांनी दखल घेऊन बियाणे न उगवलेल्या शेतकऱ्यांना नव्याने बियाणे देण्याचे आदेश कंपन्यांना दिले़ यातील काही शेतकऱ्यांना नव्याने बियाणे मिळाले़ खत, पेरणी खर्चाचे नुकसान सहन करता येईल, अशी मानसिकता ठेऊन नवे बियाणे मिळेल अशी आशा शेतकऱ्यांना होती़ परंतु, बहुतांशी शेतकऱ्यांना अद्यापही बियाणे मिळाले नाही़ परिणामी, पेरणीचा हंगाम संपुष्टात आला आहे़ त्यामुळे आता नव्याने जरी बियाणे मिळाले तरी काय उपयोग असा सवाल शेतकऱ्यांतून होत आहे़ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या सोयाबीन शेतीचे पंचनामे करण्यास सुरुवात झाली़ त्यामुळे आजपर्यंत १ हजार ४१७ शेतकऱ्यांचे पंचनाम्याचे काम पूर्ण झाले आहे़ हे पंचनामे करण्यात येत असले तरी या पंचनाम्यातून काय साध्य होणार आहे? याबाबत कृषी विभागही अनभिज्ञ आहे़ भरपाईच मिळणार नसेल तर पंचनामेच कशासाठी? असा सवाल शेतकऱ्यांतून होत आहे. कंपन्यांच्या बोगस बियाणामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे़ त्यामुळे कंपन्यांनी एकरी उत्पादनाप्रमाणे शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यायला हवी, अशी मागणी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजकुमार सस्तापूरे यांनी केली आहे़ बोगस बियाणामुळे सर्वाधिक नुकसान निलंगा तालुक्यातील शेतकऱ्यांचे असून १ हजार ३९ तक्रारी आहेत़ तिथे ६८८ शेतकऱ्यांचे पंचनामे झाले आहेत़ त्यापाठोपाठ औसा तालुक्यातील आणि त्यानंतर लातूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे़ औशातील संख्या ६१० तर लातूर तालुक्यातील संख्या १४८ अशी आहे़ कृषी विभागाकडून पंचनामे करण्यात येत असले तरी शासनाकडून कुठलीही मदत मिळणार नाही़ त्यामुळे बोगस बियाणे बाजारात आणलेल्या कंपन्यांना भरपाई देण्याचे प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत़ ते मंजूर करुन कितपत भरपाई द्यायची हे कंपन्यांवर अवलंबून आहे, असे जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाचे मोहीम अधिकारी महेश क्षीरसागर यांनी सांगितले़