शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
2
महाराष्ट्रात ७९ ठिकाणी शेतकरी भवन उभारणार; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ८ महत्त्वाचे निर्णय
3
भारत आणि चीनचं टेन्शन वाढवणार युरोपियन युनियन! अमेरिकेच्या समोर झुकलं का EU?
4
निष्पाप लेकरावर दयाही आली नाही! ७ वर्षांच्या मुलीला तिसऱ्या मजल्यावरून फेकलं, सावत्र आईचा गुन्हा 'असा' झाला उघड
5
6G क्षेत्रात भारताची मोठी झेप, IIT हैदराबादने विकसित केले प्रोटोटाइप; 2030 पर्यंत लॉन्च होणार
6
दही, दूध, लोणी घागर भरूनी...! सर्व स्वस्त झाले, या मोठ्या डेअरीने GST कपातीपूर्वीच घोषणा केली
7
ITR भरण्यासाठी उरले शेवटचे काही तास! आयकर विभागाकडून करदात्यांसाठी ६ टिप्स
8
Pitru Paksha 2025: काही लोक जिवंतपणी स्वत:चे श्राद्ध करवून घेतात; पण का आणि कुठे? वाचा!
9
बाबांसाठी घड्याळ, आईला कानातले पण ते...; अधिकाऱ्याच्या लेकाची काळजात चर्र करणारी गोष्ट
10
'भारत तर टॅरिफचा महाराजा, त्यांच्यामुळे अमेरिकेच्या कामगारांचे...'; डोनाल्ड ट्रम्प यांच्या सल्लागाराचा आरोप
11
भारतीय नवराच हवा! न्यूयॉर्कमधील प्रसिद्ध टाइम्स स्क्वेअरवर फलक घेऊन उभी राहिली तरुणी
12
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये मसूद अझहरच्या कुटुंबाचे काय झाले? जैश कमांडर म्हणाला, 'तुकडे- तुकडे...'
13
अंजली दमानियांच्या पतीची राज्य सरकारची थिंक टँक असलेल्या 'मित्रा' संस्थेच्या सल्लागारपदी नियुक्ती
14
टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुपरफास्ट ३००० धावा; विराट दुसऱ्या क्रमांकावर, पहिला कोण?
15
आता उत्तर कोरियात 'आईस्क्रीम' शब्द बोलण्यास बंदी; हुकूमशाह किम जोंग उननं काढलं फर्मान, कारण...
16
जबरदस्त दणका! आयसीसीने मॅच रेफरीला काढण्याची मागणी फेटाळली; पाकिस्तान संघ आशिया कपमधून बाहेर पडणार?
17
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाताय? आज तातडीचा विशेष ब्लॉक, एक तासासाठी वाहतूक राहणार बंद 
18
फक्त ३ वर्षात १०,००० रुपयांच्या SIP ने खरेदी करू शकता ड्रीम कार; गुंतवणुकीचा फॉर्म्युला ठरतोय हीट
19
जगातील सर्वात ‘पॉवरफुल’ व्यक्तीचे बंगळुरुमध्ये नवे ऑफिस; भाडे 400 कोटींपेक्षा जास्त..!
20
'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये आर्यन खानच्या दिग्दर्शनाखाली केलं काम, बॉबी देओलने सांगितला अनुभव

पंकजांनी अडवली मेटेंची घौडदौड !

By admin | Updated: November 8, 2016 00:20 IST

बीड शिवसंग्रामचे आमदार विनायक मेटे आणि पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्यातील आजवर सुरू असलेल्या छुप्या संघर्षाची जाहीर कबुली दस्तूरखुद्द मेटे यांनीच स्नेहमेळाव्यात बोलताना दिली.

प्रताप नलावडे बीडशिवसंग्रामचे आमदार विनायक मेटे आणि पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्यातील आजवर सुरू असलेल्या छुप्या संघर्षाची जाहीर कबुली दस्तूरखुद्द मेटे यांनीच स्नेहमेळाव्यात बोलताना दिली. पंकजा यांनीच जिल्ह्यात युती करण्यासाठी जाणीवपूर्वक टाळाटाळ केल्याच्या गौप्यस्फोट केल्याने आता पालिका निवडणुकीतच मेटे आणि पंकजा हे दोघेही आमने-सामने येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याचबरोबर मेटे यांच्या राजकीय घौडदौडीला जिल्ह्यात लगाम घालण्याचे कामही पंकजा यांनी केले असल्याचे त्यांच्या वकतव्याने स्पष्ट झाले आहे.भाजपाचा मित्र पक्ष म्हणून शिवसंग्राम राज्यात कार्यरत असताना जिल्ह्यात मात्र मेटे यांची सातत्याने कोंडीच झाल्याचे पाहण्यास मिळाले. ही नेमकी कोंडी कोणी केली याची आजवर दबक्या आवाजात होणाऱ्या चर्चेला खुद्द मेटे यांनीच वाट मोकळी करून दिली. लोकसभेच्या निवडणुकीत आपली ताकद गोपीनाथ मुंडे यांच्या मागे उभी करणाऱ्या शिवसंग्रामला मुंडे यांच्या नंतरही भाजपाने आपला मित्र पक्ष म्हणून सन्मानाची वागणूक दिली. मेटे यांची विधान परिषदेवर वर्णी लावली परंतु त्यानंतर मात्र जिल्ह्यातील राजकारणाची समिकरणे बदलत गेली आणि पंकजा आणि मेटे यांच्यामधील शह-काटशहाचे राजकारण सुरूच राहिले. मंत्रीपदाकडे डोळे लावून बसलेल्या मेटे यांच्या पदरात दोन वर्षे उलटली तरी मंत्रीपद पडू शकले नाही. सर्व मित्रपक्षांना सामावून घेणाऱ्या भाजपाने मेटे यांना मात्र जाणीवपूर्वक टाळल्याने हा फटका मेटे यांना नेमका कोणामुळे बसला, याचीही चर्चा अनेक दिवस राजकीय वर्तुळात रंगली होती. मेटे यांनी स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने आपल्या मनातील ही खंत आणि खदखद नेमकेपणाने बोलून दाखविली. जिल्हा पातळीवर असे कराल तर राज्याचे नेतृत्व पुढे कसे करणार, असा टोला थेट पंकजा यांना लगावत त्यांनी काही प्रश्नही उपस्थित केले. नगरपालिकेच्या भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणांची आपण मुख्यमंत्र्यांकडून चौकशी लावली तरी त्याची प्रत्यक्षात चौकशी रेंगाळली असल्याचे सांगत याचा ठपका त्यांनी पंकजा यांच्यावरच ठेवला. क्षीरसागर यांना सहकार्य करण्यासाठीच बीडमध्ये सेना-भाजपा आणि शिवसंग्रामची युती होऊ दिली नसल्याचेही त्यांनी सूचक विधान केले. मेटे यांनी केलेल्या या सूतोवाचामुळे आता जिल्ह्यात भाजपा आणि शिवसंग्राम यांच्यात सख्य नसल्याचे जाहीर झाले आहे. गेली दोन वर्षापासून जिल्हा बँकेची निवडणूक असो की जिल्हा परिषदेची पोटनिवडणूक असो; भाजपाने मेटे यांना पध्दतशीरपणे बाजूला ठेवण्याचीच खेळी केल्याचे पहावयास मिळाले.