शहरं
Join us  
Trending Stories
1
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
2
Operation Sindoor Live Updates: राज्यांना आपत्कालीन अधिकारांचा वापर करण्याची परवानगी, गृह मंत्रालयाचा निर्णय
3
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर RSSची मोदी सरकारच्या पाठीवर कौतुकाची थाप, भारतीय सैन्याचे केले अभिनंदन
4
भारत-पाक तणावादरम्यान सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर?
5
India Pakistan War: 'आमचे पंतप्रधान भित्रे, ते मोदींचे नाव घ्यायला घाबरतात'; पाकिस्तानी खासदाराने त्यांच्याच सरकारला सुनावले
6
India Pakistan Vidoe: पाकिस्तानने डागलेली उखळी तोफ थेट घरावर, क्षणात दिसेनासं झालं, बघा काय घडलं?
7
यशस्वी जैस्वालचा यू-टर्न ! गोवा नव्हे, मुंबई संघाकडूनच क्रिकेट खेळणार... काय दिलं कारण?
8
हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त! पाकिस्तानच्या गोळीबारात जुळ्या भावंडांचा मृत्यू
9
पाक लष्कर प्रमुखाला मिळाली विशेष 'पॉवर'; पाकिस्तानी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
10
लग्नाच्या अवघ्या १५व्या दिवशीच नवरीनं उडवली सासरची झोप; नवरदेवालाही लावला चुना अन्...  
11
Mumbai: टाटा मेमोरियल हॉस्पिटलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; भारत- पाकिस्तान तणावादरम्यान मेल
12
उद्यापासून महाराष्ट्रातील या ठिकाणी पेट्रोल पंपावर UPI पेमेंट बंद; कारण काय? जाणून घ्या...
13
तुमच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी आर्थिक नियोजन कसे करावे? महागाई लक्षात घेऊन 'या' टिप्स फॉलो करा
14
India Pakistan: 'ये कोई तरीका है भीख मांगने का'; भारताच्या 'पीआयबी'ने पाकिस्तानची उडवली खिल्ली 
15
मागे कोण उभं आहे बघा, शवपेट्यांना लपटलेले झेंडे बघा; भारताने जगाला दाखवला पाकचा खरा चेहरा
16
Operation Sindoor वर मुकेश अंबानींचं वक्तव्य, पंतप्रधानांचा उल्लेख करत केलं 'हे' वक्तव्य 
17
"घाबरण्याची गरज नाही..," भारत-पाक तणावादरम्यान इंडियन ऑईलनं पेट्रोल-डिझेलवर केलं मोठं वक्तव्य
18
"पुढचं आईस्क्रीम आता लाहोरमध्येच खाईन"; कर्तव्यावर परतलेल्या जवानाचा व्हिडीओ पाहून वाटेल अभिमान!
19
India Pakistan: पाकिस्तानच्या मिसाईल्स फटाक्यासारख्या फुस्स; पंजाबमध्ये सापडली पाडलेली क्षेपणास्त्रे, बघा व्हिडीओ
20
सलमान खान आर्मी ऑफिसरच्या भूमिकेत, गलवान व्हॅलीतील भारत-चीन युद्धावर येणार सिनेमा

पंकजांनी अडवली मेटेंची घौडदौड !

By admin | Updated: November 8, 2016 00:20 IST

बीड शिवसंग्रामचे आमदार विनायक मेटे आणि पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्यातील आजवर सुरू असलेल्या छुप्या संघर्षाची जाहीर कबुली दस्तूरखुद्द मेटे यांनीच स्नेहमेळाव्यात बोलताना दिली.

प्रताप नलावडे बीडशिवसंग्रामचे आमदार विनायक मेटे आणि पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्यातील आजवर सुरू असलेल्या छुप्या संघर्षाची जाहीर कबुली दस्तूरखुद्द मेटे यांनीच स्नेहमेळाव्यात बोलताना दिली. पंकजा यांनीच जिल्ह्यात युती करण्यासाठी जाणीवपूर्वक टाळाटाळ केल्याच्या गौप्यस्फोट केल्याने आता पालिका निवडणुकीतच मेटे आणि पंकजा हे दोघेही आमने-सामने येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याचबरोबर मेटे यांच्या राजकीय घौडदौडीला जिल्ह्यात लगाम घालण्याचे कामही पंकजा यांनी केले असल्याचे त्यांच्या वकतव्याने स्पष्ट झाले आहे.भाजपाचा मित्र पक्ष म्हणून शिवसंग्राम राज्यात कार्यरत असताना जिल्ह्यात मात्र मेटे यांची सातत्याने कोंडीच झाल्याचे पाहण्यास मिळाले. ही नेमकी कोंडी कोणी केली याची आजवर दबक्या आवाजात होणाऱ्या चर्चेला खुद्द मेटे यांनीच वाट मोकळी करून दिली. लोकसभेच्या निवडणुकीत आपली ताकद गोपीनाथ मुंडे यांच्या मागे उभी करणाऱ्या शिवसंग्रामला मुंडे यांच्या नंतरही भाजपाने आपला मित्र पक्ष म्हणून सन्मानाची वागणूक दिली. मेटे यांची विधान परिषदेवर वर्णी लावली परंतु त्यानंतर मात्र जिल्ह्यातील राजकारणाची समिकरणे बदलत गेली आणि पंकजा आणि मेटे यांच्यामधील शह-काटशहाचे राजकारण सुरूच राहिले. मंत्रीपदाकडे डोळे लावून बसलेल्या मेटे यांच्या पदरात दोन वर्षे उलटली तरी मंत्रीपद पडू शकले नाही. सर्व मित्रपक्षांना सामावून घेणाऱ्या भाजपाने मेटे यांना मात्र जाणीवपूर्वक टाळल्याने हा फटका मेटे यांना नेमका कोणामुळे बसला, याचीही चर्चा अनेक दिवस राजकीय वर्तुळात रंगली होती. मेटे यांनी स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने आपल्या मनातील ही खंत आणि खदखद नेमकेपणाने बोलून दाखविली. जिल्हा पातळीवर असे कराल तर राज्याचे नेतृत्व पुढे कसे करणार, असा टोला थेट पंकजा यांना लगावत त्यांनी काही प्रश्नही उपस्थित केले. नगरपालिकेच्या भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणांची आपण मुख्यमंत्र्यांकडून चौकशी लावली तरी त्याची प्रत्यक्षात चौकशी रेंगाळली असल्याचे सांगत याचा ठपका त्यांनी पंकजा यांच्यावरच ठेवला. क्षीरसागर यांना सहकार्य करण्यासाठीच बीडमध्ये सेना-भाजपा आणि शिवसंग्रामची युती होऊ दिली नसल्याचेही त्यांनी सूचक विधान केले. मेटे यांनी केलेल्या या सूतोवाचामुळे आता जिल्ह्यात भाजपा आणि शिवसंग्राम यांच्यात सख्य नसल्याचे जाहीर झाले आहे. गेली दोन वर्षापासून जिल्हा बँकेची निवडणूक असो की जिल्हा परिषदेची पोटनिवडणूक असो; भाजपाने मेटे यांना पध्दतशीरपणे बाजूला ठेवण्याचीच खेळी केल्याचे पहावयास मिळाले.