शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

वारकऱ्यांसह एसटीलाही पंढरीची ओढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:02 IST

स. सो. खंडाळकर औरंगाबाद: कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी पंढरपूरची वारी होत नाही. याचा फटका वारकऱ्यांना तर बसलाच. पांडुरंगाच्या ...

स. सो. खंडाळकर

औरंगाबाद: कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी पंढरपूरची वारी होत नाही. याचा फटका वारकऱ्यांना तर बसलाच. पांडुरंगाच्या ओढीने त्यांचा जीव तळमळलाच. पण एसटीलाही पंढरीची ओढ लागली आणि नुकसानीचा मोठा फटका बसला.

* दरवर्षी पंढरपूरसाठी किती बस सोडल्या जायच्या-१००

*त्यातून किती उत्पन्न मिळायचे- दरवर्षी २० लाख

*एसटीतून दरवर्षी साधारण किती जण प्रवास करायचे- ५ हजार

कोरोनामुळे नुकसान होतंय एवढं नक्की...

पंढरपूरच्या विठुरायाची ओढ लागलेल्या वारकऱ्यांची ने- आण करुन सेवा करण्यात एसटीलाही एक वेगळाच आनंद मिळायचा. परंतु कोरोनाने तोही‌ हिरावून घेतला. यात एसटीचे मोठे नुकसान होत आहे, याचे वाईट वाटते.

- अरुण सिया, विभाग नियंत्रक, औरंगाबाद

......................................‌.....

वारी करणारी माझी पाचवी पिढी...

पांडुरंगाची वारी करणारी माझी पाचवी पिढी आहे. पण कोरोनामुळे मागील दोन वर्षांपासून खंड पडतोय. मागील ३० वर्षांपासून मी विना मानधन कीर्तने करतोय. दोन वर्षांपासून त्यालाही मोठा ब्रेक लागला. कोरोनाचं संकट आलं. ते दूर होवो, हीच विठुरायाच्या चरणी प्रार्थना.

- ह.भ.प. नवनाथ महाराज आंधळे, औरंगाबाद

.....‌..................

कोरोना लवकर संपव रे पांडुरंगा...

मागील दहा वर्षांपासून शिवपार्वती भजनी मंडळाच्या आम्ही दहा-बारा महिला न चुकता वारीला जात होतो. कोरोनामुळे मागच्या वर्षी जाता आलं नाही. यावर्षी आमच्या मंडळाच्या भारूडकार सुरेखा अशोक पगार यांचा मृत्यू झाला. त्या दु:खातून मंडळ अजूनही सावरलेले नाही. यावर्षी पंढरपूरला जाता येत नाही. परंतु पैठणच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आम्ही भजन करणार आहोत आणि विठुरायालाही सेवा अर्पण करणार आहोत.

-सुरेखा शिवराम साळुंखे, औरंगाबाद

......................‌‌

पैठणची पालखी रवाना..

महाराष्ट्रातील मानाच्या १० पालख्यांपैकी पैठणची पालखी सोमवारी पंढरपूरकडे रवाना झाली. आषाढी वारीसाठी संत एकनाथ महाराज यांच्या पादुका पालखीचे परिवहन महामंडळाच्या शिवशाही बसने नाथमंदिरातून ४० वारकऱ्यांसह पंढरपूरकडे प्रस्थान झाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सलग दुसऱ्या वर्षी शासनाने पायीवारी रद्द केल्याने औपचारिक प्रस्थान झाल्यानंतर गेल्या १८ दिवसांपासून नाथांच्या पादुका गावातील नाथमंदिरात मुक्कामी होत्या. ४२३ वर्षांची पायीवारीची ही प्रथा आहे. रोहयो तथा फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे व पालखी प्रमुख हभप रघुनाथ महाराज पालखीवाले यांच्या हस्ते नाथमंदिरात पादुकांची आरती करण्यात आली. भुमरे व रघुनाथ महाराज पालखीवाले यांच्या हस्ते नाथमंदिरातून पादुका शिवशाही बसमध्ये स्थानापन्न करण्यात आल्या. यावेळी उपस्थित भाविकांनी भानुदास एकनाथ नामाचा गजर केला. पोलीस बंदोबस्तात पालखी रवाना झाली.