शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
3
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
4
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
5
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
6
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
7
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
8
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
9
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
10
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
11
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
12
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
13
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
14
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
15
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
16
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
17
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
18
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...
19
गणपती आगमनाला पाऊस येणं हे तर शुभ लक्षण; यंदाही मुसळधार कोसळण्याची शक्यता 
20
भारताला 'मृत अर्थव्यवस्था' म्हणणाऱ्या ट्रम्प यांची मोठी गुंतवणूक; दरमहा होते कोट्यवधीची कमाई...

वावना व पाडळी या गावांना जोडणारा पाणंद रस्ता गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:02 IST

निधोना : फुलंब्री तालुक्यातील वावना व पाडळी(एकघर) दोन गावांना जोडणारा पाणंद रस्ता गायब झाला असून, ग्रुप ग्रामपंचायत असलेल्या ...

निधोना : फुलंब्री तालुक्यातील वावना व पाडळी(एकघर) दोन गावांना जोडणारा पाणंद रस्ता गायब झाला असून, ग्रुप ग्रामपंचायत असलेल्या गावातील नागरिकांना येण्या-जाण्यासाठी पाच कि.मी. अंतर हेलपाटा मारून यावे लागते. शेतमाल ने-आण करतानाही शेतकऱ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते.

सन १९७२ सालच्या दुष्काळात जिल्हा परिषदेच्या अंतर्गत बांधकाम विभागाने रस्ता क्र. ७४ या अंदाजे दीड कि.मी. अंतराच्या पाणंद रस्त्याचे काम पूर्ण केले होते. पाडळी येथून फुलंब्री- पिशोर हा प्रमुख रस्ता गेलेला आहे. तेथून वावना शिवारातील गट क्र. २५,१९,१८,१५,१०,९,८,४ या शेतजमिनीतून रस्त्याची निर्मिती करुन ग्रुप ग्रामपंचायत असलेल्या वावना व पाडळी ही दोन्ही गावे एकमेकास जोडली होती. जवळपास १९८५पर्यंत सुमारे १५ वर्षे हा रस्ता वापरात होता; मात्र तेव्हा शासनाने या रस्त्याचे खडीकरण, मजबुतीकरण केले नाही. त्यानंतर रस्ता गेलेल्या जमिनींपैकी गट क्र.१८,१९,२५ मधील शेतजमिनी मूळ मालकांनी विकून टाकल्या. ज्या लोकांनी या जमिनी खरेदी केल्या, त्यांनी या जमिनीतून गेलेला रस्ताच नाहीसा केला. यानंतर त्यांचे अनुकरण इतर लोकांनीही केले व तेव्हापासून हा रस्ता गायब झाला आहे. यामुळे शासनाने केलेला लाखो रुपयांचा खर्चही पाण्यात गेला. तसेच दोन्ही गावांतील नागरिकांना दीड कि.मी. ऐवजी पाच कि.मी. चा फेरा मारुन ये- जा करावी लागत आहे. यानंतरही या रस्त्याला मंजुरी मिळाली होती, मात्र ग्रामपंचायतमधील सत्ताधाऱ्यांनी या रस्त्याच्या नावाने दुसऱ्या रस्त्याचे काम केले. तेही काम आज अपूर्णावस्थेत आहे. जिल्हा परिषद बांधकाम विभाग मात्र अंधारातच असून या पाणंद रस्त्याची गुंतागुंत वाढली आहे. हा रस्ता होण्यासाठी दोन्ही गावातील लोकांनी फुलंब्री तहसीलदारांकडे ग्रामसभेच्या ठरावासह अर्ज केला असून पाणंद रस्त्याची निर्मिती करुन दोन्ही गावे जोडण्याची मागणी केली आहे. मात्र तहसील प्रशासन लोकांच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत असल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. यामुळे नागरिकांनी जर मागणी पूर्ण केली नाही, तर आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे. गुगलवर या पाणंद रस्त्याची वावना-पाडळी-लालवण-नायगाव अशी नोंद केलेली असल्याचे नागरिकांनी सांगितले.

कोट

या पाणंद रस्त्याचे गांभीर्य लक्षात घेऊन तत्काळ काम करण्यात यावे. हा रस्ता माझ्या जमिनीतून गेलेला आहे. माझी त्याला संमती आहे, मात्र दोन ते तीन लोक विरोध करीत आहेत.

-सोमीनाथ जाधव, सरपंच ग्रुप ग्रा.पं. वावना-पाडळी.

कोट

मी सरपंच होतो तेव्हा वावना-पाडळी रस्त्याच्या खडीकरण, मजबुतीकरणासाठी निधीची मागणी केली होती; मात्र निधी मिळाला नाही. कालांतराने शेतकऱ्यांनी त्या पाणंद रस्त्यावर अतिक्रमण करून रस्ता नाहीसा केला आहे.

-अशोक जाधव, माजी सरपंच, ग्रुप ग्रा.पं. वावना, पाडळी