शहरं
Join us  
Trending Stories
1
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
2
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकाल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
3
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
4
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
5
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
6
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
7
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
8
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
9
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
10
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
11
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
12
Astrology: जोडीदार 'क्लिक' होत नाही अशी तरुणांची सबब; हा ग्रहांचा परिणाम समजावा का?
13
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
14
IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराजनं सांगितलं त्याच्या आगळ्यावेगळ्या सेलिब्रेशनमागचं कारण!
15
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 
16
Recipe : किसलेल्या दोडक्याची ‘अशी’ चमचमीत करा भाजी, चव जबरदस्त-दोडक्याचेच व्हाल फॅन!
17
दोन वर १ शेअर मिळणार फ्री, 'ही' कंपनी ग्रहकांना देणार भेट; याच महिन्यात जमा होणार, तुमच्याकडे आहे का?
18
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
19
West Bengal Accident: जगन्नाथाच्या दर्शनासाठी जाताना भाविकांवर काळाचा घाला, वाटेतच ट्रकला धडक, कारमधील ४ जण ठार!
20
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार

वावना व पाडळी या गावांना जोडणारा पाणंद रस्ता गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:02 IST

निधोना : फुलंब्री तालुक्यातील वावना व पाडळी(एकघर) दोन गावांना जोडणारा पाणंद रस्ता गायब झाला असून, ग्रुप ग्रामपंचायत असलेल्या ...

निधोना : फुलंब्री तालुक्यातील वावना व पाडळी(एकघर) दोन गावांना जोडणारा पाणंद रस्ता गायब झाला असून, ग्रुप ग्रामपंचायत असलेल्या गावातील नागरिकांना येण्या-जाण्यासाठी पाच कि.मी. अंतर हेलपाटा मारून यावे लागते. शेतमाल ने-आण करतानाही शेतकऱ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते.

सन १९७२ सालच्या दुष्काळात जिल्हा परिषदेच्या अंतर्गत बांधकाम विभागाने रस्ता क्र. ७४ या अंदाजे दीड कि.मी. अंतराच्या पाणंद रस्त्याचे काम पूर्ण केले होते. पाडळी येथून फुलंब्री- पिशोर हा प्रमुख रस्ता गेलेला आहे. तेथून वावना शिवारातील गट क्र. २५,१९,१८,१५,१०,९,८,४ या शेतजमिनीतून रस्त्याची निर्मिती करुन ग्रुप ग्रामपंचायत असलेल्या वावना व पाडळी ही दोन्ही गावे एकमेकास जोडली होती. जवळपास १९८५पर्यंत सुमारे १५ वर्षे हा रस्ता वापरात होता; मात्र तेव्हा शासनाने या रस्त्याचे खडीकरण, मजबुतीकरण केले नाही. त्यानंतर रस्ता गेलेल्या जमिनींपैकी गट क्र.१८,१९,२५ मधील शेतजमिनी मूळ मालकांनी विकून टाकल्या. ज्या लोकांनी या जमिनी खरेदी केल्या, त्यांनी या जमिनीतून गेलेला रस्ताच नाहीसा केला. यानंतर त्यांचे अनुकरण इतर लोकांनीही केले व तेव्हापासून हा रस्ता गायब झाला आहे. यामुळे शासनाने केलेला लाखो रुपयांचा खर्चही पाण्यात गेला. तसेच दोन्ही गावांतील नागरिकांना दीड कि.मी. ऐवजी पाच कि.मी. चा फेरा मारुन ये- जा करावी लागत आहे. यानंतरही या रस्त्याला मंजुरी मिळाली होती, मात्र ग्रामपंचायतमधील सत्ताधाऱ्यांनी या रस्त्याच्या नावाने दुसऱ्या रस्त्याचे काम केले. तेही काम आज अपूर्णावस्थेत आहे. जिल्हा परिषद बांधकाम विभाग मात्र अंधारातच असून या पाणंद रस्त्याची गुंतागुंत वाढली आहे. हा रस्ता होण्यासाठी दोन्ही गावातील लोकांनी फुलंब्री तहसीलदारांकडे ग्रामसभेच्या ठरावासह अर्ज केला असून पाणंद रस्त्याची निर्मिती करुन दोन्ही गावे जोडण्याची मागणी केली आहे. मात्र तहसील प्रशासन लोकांच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत असल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. यामुळे नागरिकांनी जर मागणी पूर्ण केली नाही, तर आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे. गुगलवर या पाणंद रस्त्याची वावना-पाडळी-लालवण-नायगाव अशी नोंद केलेली असल्याचे नागरिकांनी सांगितले.

कोट

या पाणंद रस्त्याचे गांभीर्य लक्षात घेऊन तत्काळ काम करण्यात यावे. हा रस्ता माझ्या जमिनीतून गेलेला आहे. माझी त्याला संमती आहे, मात्र दोन ते तीन लोक विरोध करीत आहेत.

-सोमीनाथ जाधव, सरपंच ग्रुप ग्रा.पं. वावना-पाडळी.

कोट

मी सरपंच होतो तेव्हा वावना-पाडळी रस्त्याच्या खडीकरण, मजबुतीकरणासाठी निधीची मागणी केली होती; मात्र निधी मिळाला नाही. कालांतराने शेतकऱ्यांनी त्या पाणंद रस्त्यावर अतिक्रमण करून रस्ता नाहीसा केला आहे.

-अशोक जाधव, माजी सरपंच, ग्रुप ग्रा.पं. वावना, पाडळी