शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

पालम तहसीलवर शेकापचा धडकला मोर्चा

By admin | Updated: November 15, 2014 23:55 IST

पालम : शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांचा मोर्चा काढण्यात आला.

पालम : तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने राज्य खजिनदार भाई लक्ष्मणराव गोळेगावकर यांच्या नेतृत्वाखाली १५ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांचा मोर्चा काढण्यात आला. पालम तालुक्यात पाऊस न पडल्याने खरिपाची पिके पूर्णत: वाया गेली आहेत. तर ओलावा नसल्याने रबीच्या पेरण्या झाल्याच नाहीत. शेतकरी निसर्गाच्या संकटात सापडला असून चिंताग्रस्त झाला आहे. जनावरांना चाऱ्याची सोय नाही. परंतु, याकडे शासकीय यंत्रणा लक्ष देत नसल्याने अडचणींचा डोंगर उभा टाकलेला आहे. पालम तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी शहरातील ममता विद्यालयातून मोर्चाची सुरुवात करण्यात आली. हा मोर्चा शनिवार बाजार, फळा-फरकंडा रस्ता, नवा मोंढा व मुख्य चौक, बसस्थानक परिसर या मार्गाने तहसील कार्यालयावर नेण्यात आला. कोरडा दुष्काळ जाहीर करावा, गोदावरी नदीच्या काठावर जनावरांसाठी छावण्या सुरू कराव्यात, रोजगार हमी योजनेच्या कामाची सुरुवात करावी, जनावरांसाठी चाऱ्याची सोय करण्याकरीता शेतकऱ्यांचा ऊस बाजार भावाने खरेदी करून आरक्षित करावा, पीक विमा लागू करावा यासह विविध मागण्यांचे निवेदन मोर्चेकऱ्यांनी तहसीलदारांना दिले. या मोर्चात राज्य खजिनदार भाई लक्ष्मणराव गोळेगावकर यांच्यासह काशिनाथराव जाधव, नवनाथ हत्तीअंबिरे, गोपीनाथ भोसले, राजेश ढवळे, मोतीराम चवरे, बंडू जाधव, विक्रम दिवटे, मोतीराम शिंदे, सीताराम पौळ, मुक्तार पठाण,संभाजी कानगुले, गोविंद शिंदे, पुरभाजी मुळे यांच्यासह पालम तालुक्यातील मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)