शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
2
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
3
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."
4
पाकिस्तान पुन्हा तोंडावर पडला; UN मध्ये मागितले ४ महत्वाच्या समित्यांचे अध्यक्षपद, मिळाला 'ठेंगा'
5
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
6
बकरी ईदच्या दिवशीच वृद्धाने दिली स्वतःची कुर्बानी; मशिदीत नमाज अदा केली अन् नंतर...
7
आंतरराष्ट्रीय स्तरावर हात पसरणारा पाकिस्तान भरतोय नेत्यांचे खिसे! सरकारने वाढवला पाचपटींनी पगार
8
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
9
HDFC बँकेच्या CEO वर कारवाईची मागणी, ₹२५ कोटी घोटाळ्याचा आरोप; जाणून घ्या प्रकरण
10
विराट कोहलीसारखी निष्ठा कायम राहील का? १८ वर्षांपर्यंत तुमचाही संयम टिकू शकेल का?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
12
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
13
फुफ्फुस निकामी, सतत दम्याचा त्रास अन्..! दुर्धर आजारावर मात करुन ३ वर्षांनी मराठी अभिनेत्याचं कमबॅक
14
T20 Mumbai League : कॅप्टन पृथ्वीची फसलेली चाल; सलामीवीर जोडीदाराला Retire Out करून स्वत:ही परतला तंबूत
15
“निवडणूक आयोग हा भाजपा आयोग, मतांवर टाकलेल्या दरोड्याची चौकशी का करत नाही?”: नाना पटोले
16
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
17
जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात! देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना टोला
18
कोलंबियात भाषण देताना राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या डोक्यात झाडली गोळी; हल्लेखोराला अटक
19
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
20
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती

पैठण डाव्या कालव्यातून सोडणार पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 23:20 IST

जायकवाडी डाव्या कालव्यातून रबी व उन्हाळी हंगामासाठी पाण्याच्या आठ पाळ्यांना मंजुरी मिळाली आहे

जालना/तीर्थपुरी : जायकवाडी डाव्या कालव्यातून रबी व उन्हाळी हंगामासाठी पाण्याच्या आठ पाळ्यांना मंजुरी मिळाली आहे. बुधवारपासून हे पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती आ. राजेश टोपे यांनी दिली.कालवा सल्लागार समितीच्या मुंबईत झालेल्या बैठकीत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी मंजुरी दिली आहे. १५ नोव्हेंबर रोजी सकाळी नाथसागरातून डाव्या कालव्याला पाणी सोडण्यात येणार असल्याने ऊस लागवडीचा शेतक-यांचा प्रश्न मार्गी लागणार आहे.जायकवाडी पाटबंधारे अंतर्गत येणा-या पैठण नाथसागरात चांगला पाऊस झाल्याने शंभर टक्के धरण भरल्याने डाव्या कालव्याअंतर्गत मोठ्या प्रमाणात पैठण, अंबड, घनसावंगी, परतूर, मंठा, पाथरी, मानवत या तालुक्यांतील कारखाना कार्यक्षेत्रात उसाची लागवड मोठ्या प्रमाणात होणार आहे. पाणी न सुटल्याने शेतक-यांनी ऊस लागवड थांबवली होती. पाणी कधी सुटणार, किती पाणी मिळणार असा प्रश्न शेतक-यांसमोर उभा होता. अखेर मुंबई येथे कालवा सल्लागार समितीची बैठक जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली १३ नोव्हेंबर मुंबईत झाली. यात रबी हंगाम १५ आॅक्टोबर २०१७ ते २८ फेब्रुवारी १८ पर्यंत असतो. त्यात ऊस, गहू, ज्वारी, कापूस यासाठी पाणीपाळ्या ४ मंजूर झाल्या तर उन्हाळी हंगाम १ मार्च २०१८ ते ३० जून २०१८ पर्यंत असतो. यासाठी ४ पाणीपाळ्या मंजूर झाल्या. अशा आठ पाणीपाळ्या मंजूर झाल्या असून, ऊस लागवडीसाठी डाव्या कालव्यातून १६ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता पाणी सोडले जाणार आहे. त्यामुळे चाºया, लघु चाºया, व सर्व्हिस रोडची दुरुस्तीकामे करून घ्यावीत, अशा सूचना संबंधित अधिका-यांना देण्यात आल्या आहेत. शेतक-यांनी रबी हंगामासाठी या पाण्याचा उपयोग करून घ्यावा, असे आवाहन आ.टोपे यांनी केले.