शहरं
Join us  
Trending Stories
1
"१२ फ्लॅट, ४ बंगले.., शिंदेंच्या आमदारांची मस्ती जिरवायचीय"; भाजपा आमदाराचा गंभीर आरोप
2
“अमेरिकेच्या आदेशांचे पालन करतोय, तोपर्यंत भारत महान मित्र, पण...”; चीनने स्पष्टच सांगितले
3
देशाला मजबूत पंतप्रधानांची गरज, नरेंद्र मोदी तर भाजपाचे प्रचारमंत्री; उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र
4
"मी खेळू शकेन असं वाटत नाही, पण CSK साठी..."; धोनीच्या विधानाने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या
5
उद्धव ठाकरे सहकुटुंब शरद पवारांच्या घरी; संजय राऊतही उपस्थित, दिल्लीत घडामोडींना वेग!
6
बेवफा सोनिया...! प्रियकराच्या मदतीनं पतीला संपवलं; १ वर्ष कुणालाही नाही कळलं, पण एका चुकीनं...
7
कोट्यधीश बनवणारा शेअर... १ लाखाचे झाले ३.५० कोटी रुपये, एकेकाळी १० रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
8
रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल अन् मुंबई रणजी टीम .... मधल्या काळात नेमकं काय-काय घडलं?
9
रक्षाबंधनाच्या मराठी शुभेच्छा; प्रेमळ Messages आणि भावपूर्ण Greetings पाठवा आपल्या बहीण-भावाला
10
कामाचं टेन्शन, लोनची झंझट... शांतीसाठी आलाय नवा विचित्र ट्रेंड, डॉक्टरांनी म्हटलं 'खतरनाक'
11
राहुल गांधींची 'डिनर डिप्लोमसी', थंड पडलेल्या INDIA आघाडीला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न
12
व्हाट्सअ‍ॅपच घोटाळेबाजांपासून सावध करणार, युजर्ससाठी दोन सेफ्टी टूल लाँच...; कशी वापरायची...
13
विराट कोहलीचं आवडतं गाणं गाजतंय, यूट्यूबवर मिळालेत १० कोटी Views, तुम्ही ऐकलंय का?
14
विमानतळावर उतरताच UAEच्या विमानावर हवाईदलाने केला हल्ला, ४० जणांचा मृत्यू
15
National Flag : केवळ भारतच नव्हे, जगातील 'या' देशांच्या झेंड्यावरही आहे केशरी, पांढरा अन् हिरवा रंग!
16
भारत अन् चीनचे जमायला लागले, तिकडे पाकिस्तान अस्वस्थ झाला, नवीन रडारड केली सुरू
17
“उपराष्ट्रपतींना तडकाफडकी राजीनामा का द्यावा लागला, आता आहेत तरी कुठे?” उद्धव ठाकरेंचा सवाल
18
"पुढच्या जन्मात मी तुलाच माझी पत्नी बनवेन"; काकीच्या प्रेमात वेडा झाला २६ वर्षीय तरुण अन्...
19
Mamata Banerjee : "मी जिवंत सिंहीण, जखमी करण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा...", ममता बॅनर्जींचं भाजपाला चॅलेंज
20
आता भारतातूनच खरेदी करा Apple, Microsoft चे शेअर्स! परदेशी गुंतवणुकीचा सोपा मार्ग, काय आहेत नियम व अटी?

पैठण डाव्या कालव्यातून सोडणार पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 23:20 IST

जायकवाडी डाव्या कालव्यातून रबी व उन्हाळी हंगामासाठी पाण्याच्या आठ पाळ्यांना मंजुरी मिळाली आहे

जालना/तीर्थपुरी : जायकवाडी डाव्या कालव्यातून रबी व उन्हाळी हंगामासाठी पाण्याच्या आठ पाळ्यांना मंजुरी मिळाली आहे. बुधवारपासून हे पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती आ. राजेश टोपे यांनी दिली.कालवा सल्लागार समितीच्या मुंबईत झालेल्या बैठकीत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी मंजुरी दिली आहे. १५ नोव्हेंबर रोजी सकाळी नाथसागरातून डाव्या कालव्याला पाणी सोडण्यात येणार असल्याने ऊस लागवडीचा शेतक-यांचा प्रश्न मार्गी लागणार आहे.जायकवाडी पाटबंधारे अंतर्गत येणा-या पैठण नाथसागरात चांगला पाऊस झाल्याने शंभर टक्के धरण भरल्याने डाव्या कालव्याअंतर्गत मोठ्या प्रमाणात पैठण, अंबड, घनसावंगी, परतूर, मंठा, पाथरी, मानवत या तालुक्यांतील कारखाना कार्यक्षेत्रात उसाची लागवड मोठ्या प्रमाणात होणार आहे. पाणी न सुटल्याने शेतक-यांनी ऊस लागवड थांबवली होती. पाणी कधी सुटणार, किती पाणी मिळणार असा प्रश्न शेतक-यांसमोर उभा होता. अखेर मुंबई येथे कालवा सल्लागार समितीची बैठक जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली १३ नोव्हेंबर मुंबईत झाली. यात रबी हंगाम १५ आॅक्टोबर २०१७ ते २८ फेब्रुवारी १८ पर्यंत असतो. त्यात ऊस, गहू, ज्वारी, कापूस यासाठी पाणीपाळ्या ४ मंजूर झाल्या तर उन्हाळी हंगाम १ मार्च २०१८ ते ३० जून २०१८ पर्यंत असतो. यासाठी ४ पाणीपाळ्या मंजूर झाल्या. अशा आठ पाणीपाळ्या मंजूर झाल्या असून, ऊस लागवडीसाठी डाव्या कालव्यातून १६ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता पाणी सोडले जाणार आहे. त्यामुळे चाºया, लघु चाºया, व सर्व्हिस रोडची दुरुस्तीकामे करून घ्यावीत, अशा सूचना संबंधित अधिका-यांना देण्यात आल्या आहेत. शेतक-यांनी रबी हंगामासाठी या पाण्याचा उपयोग करून घ्यावा, असे आवाहन आ.टोपे यांनी केले.