शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रा जिथे जिथे जाऊन आली तिथे तिथे पाकिस्तानचे ऑपरेशन सिंदूरवेळी हल्ले? गोल्डन टेंपल, पठाणकोट अन् काश्मीर...
2
कधीकाळी पाकिस्तानात राहत होते ज्योती मल्होत्राचे कुटुंब?; तपासात समोर आली नवी माहिती
3
"बिहार निवडणुकीसाठी भाजपाची खेळी..."; पहलगाम हल्ल्यावर काय म्हणाले यशवंत सिन्हा?
4
“मुंबईकर उद्धव ठाकरेंना त्यांची जागा दाखवतील, मविआच्या ५० जागाही येणार नाही”; भाजपाचा दावा
5
सुरक्षा दलांकडून नक्षलवाद्यांवर आणखी एक मोठा प्रहार, चकमकीत २६ नक्षली ठार
6
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची पहिली झलक समोर, 'या' दिवशी प्रदर्शित होणार चित्रपट
7
अबुझमाडमध्ये २७ नक्षल्यांना कंठस्नान; पाेलीस शहीद, १ काेटी बक्षीस असलेल्या बसवा राजूचा खात्मा
8
तुर्की अन् अझरबैजानला धक्का; भारताने आर्मेनियासोबत केला आकाश 1-एस क्षेपणास्त्र करार
9
इंग्रजी फाडफाड येत नाही, प्रश्नच मिटला! तुम्ही बोला, गुगल समोरच्याला त्याच्या भाषेत ऐकवणार...
10
पूजा खेडकर हिला मोठा दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून अटकपूर्व जामीन मंजूर
11
Jyoti Malhotra : "पाकिस्तानात माझं लग्न करुन द्या"; ज्योती मल्होत्राचं अली हसनसोबतच व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल
12
सोनिया आणि राहुल गांधी यांना झाला १४२ कोटींचा फायदा, नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीचा कोर्टात आरोप   
13
मुलांचं लग्न जमवताना एकमेकांच्या प्रेमात पडले व्याही आणि विहीण! लग्नासाठी कोर्टात पोहोचले पण... 
14
डॉक्टर की कसाई...! ५० जणांच्या हत्येनंतरही हात थरथरले नाहीत; अंगावर काटा आणणारी थरारक घटना
15
'एक नंबर तुझी कंबर' व्हायरल गाण्यावर नारकर कपलचा डान्स, व्हिएतनाममधून शेअर केला Video
16
Mumbai Rains: मुंबईत पावसाचा हाहाकार! पवईत झाड कोसळल्याने दोन जण जखमी, एकाची प्रकृती गंंभीर
17
'ऑपरेशन सिंदूर'बाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या प्रा. अली खानला अंतरिम जामीन मंजूर
18
बापरे! गर्लफ्रेंड आहे की डाकू, बॉयफ्रेंडला रस्त्यात अडवला, कपडे फाटेपर्यंत चप्पलने मारले; छातीवर बसून गळा ...
19
“SCचे टॉप ५ जज सुट्ट्यांमध्ये कामावर, तरी प्रलंबित याचिकांचे खापर आमच्यावर”; CJI गवई संतापले
20
Mangal Gochar 2025: जूनमध्ये कुंजकेतू योग संघर्ष वाढवणार, 'या' पाच राशींना अधिक सतर्क राहावे लागणार!

पीक विमा योजनेस मुदतवाढ मिळालीच पाहिजे-चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 00:29 IST

भोकर: तालुक्यात दिवशी येथे बँकेसमोर रांगेत शेतकºयाचा झालेला मृत्यू हा शासनाच्या नाकर्तेपणाचा व अयोग्य नियोजनाचा बळी असून अशा घटना रोखण्यासाठी राज्यभरात पीक विमा भरण्याची मुदत किमान दहा दिवसांनी वाढवून देणे गरजेचे आहे अशी आग्रही मागणी माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा़अशोकराव चव्हाण यांनी केली़

लोकमत न्यूज नेटवर्कभोकर: तालुक्यात दिवशी येथे बँकेसमोर रांगेत शेतकºयाचा झालेला मृत्यू हा शासनाच्या नाकर्तेपणाचा व अयोग्य नियोजनाचा बळी असून अशा घटना रोखण्यासाठी राज्यभरात पीक विमा भरण्याची मुदत किमान दहा दिवसांनी वाढवून देणे गरजेचे आहे अशी आग्रही मागणी माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा़अशोकराव चव्हाण यांनी केली़भोकर येथे एसबीआय बँकेच्या बाहेर जमलेल्या शेतकºयांशी त्यांनी रविवारी संवाद साधला़ दिवशी बु़ येथील मयत शेतकरी रामा पोतरे यांच्या निवासस्थानी जाऊन खा. चव्हाण यांनी कुटुंबियांचे सांत्वन केले़ मुख्य रस्त्यावरील एसबीआय बँकेसमोर रविवारीही पीक विमा भरण्यासाठी शेतकºयांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या़ यावेळी खा. चव्हाण यांनी शेतकºयांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या़ पोलीस जीपवर चढून यावेळी त्यांनी शेतकºयांना आवाहन केले़ ते म्हणाले, बँकेच्या रांगेत शेतकºयाचा मृत्यू होणे दुर्देवी घटना आहे़ अशा घटना टाळण्यासाठी शासनाने पीक विमा भरण्याची मुदत वाढवायला पाहिजे़राज्यभरात एकसारखीच परिस्थिती आहे़ वीजपुरवठा नाही, आॅनलाईनमध्ये अडचणी येत आहेत़ सरकारने योग्य नियोजन न करताच पीक विमा जाहीर केला़ अल्पावधीत शेतकºयांना बँकेच्या रांगेत उभे केले़ यापूर्वी अशाचप्रकारे नोटबंदी करुन जनतेला दोन महिने बँकेच्या रांगेत उभे राहायला लावले होते़ त्याहीवेळी निष्पाप नागरिकांचा नाहक बळी गेला़ आताही योग्य नियोजन होत नसल्याने शेतकºयांचा बळी जात आहे़ या ठिकाणी कोणतेही राजकारण करण्यासाठी आलो नसून जनतेची गैरसोय दूर व्हावी, अशी माझी भावना आहे़ जिल्हा प्रशासन व बँक व्यवस्थापनाने पीक विमा भरण्याचे योग्य नियोजन करावे़शेतकºयांचे अर्ज आॅफलाईन पद्धतीने घ्यावेत़ बँकेत काऊंटर वाढवावेत़ शेतकºयांनीही संयमाने आपले अर्ज भरुन सहकार्य करावे़ यावेळी खा. चव्हाण यांनी बँक व्यवस्थापक के़एस़ कुलकर्णी यांच्याशी चर्चा करुन सूचनाही केल्या़ बँकेसमोर मोठा जनसमुदाय जमला होता़ त्यातील काही शेतकºयांनी रास्ता रोकोही केला़ त्यानंतर रांगेतील शेतकºयांनी शिस्तीने अर्ज भरल्यानंतर बँकेसमोरील गर्दी बरीच निवळली होती़