शहरं
Join us  
Trending Stories
1
हाँगकाँग अग्निकांडातील 83 जणांच्या मृत्यूला जबाबदार कोण? 70 वर्षांतील सर्वात मोठी दुर्घटना, 4600 जणांची घरे स्वाहा...! 
2
बिहारमधील पराभवाच्या आढावा बैठकीपूर्वीच काँग्रेसमध्ये मोठा राडा! दोन नेते एकमेकांना भिडले, कुणी दिली गोळी घालण्याची धमकी?
3
अलास्काला ६, तर इंडोनेशियाला ६.२ तीव्रतेच्या भूकंपाचे झटके; 400 वर घरे उद्ध्वस्त, 7000 हून अधिक विस्थापित 
4
२०६ च्या एकदम ४४...! सीआयए अन् मोसादनं रचला काँग्रेसला हरवण्याचा कट? माजी खासदाराचा मोठा दावा, काय तर्क दिला? जाणून घ्या
5
कर्नाटक सत्तासंघर्ष : "जनादेश एका क्षणाचा नाही तर पाच वर्षांचा..."; CM-DCM यांचं वाक्युद्ध 
6
इम्रान खान कुठे आहेत? पाकिस्तान संसदेत पीटीआयचा गदारोळ; बहिणी तुरुंगाबाहेच बसून...
7
WPL Auction Sold And Unsold Players: शेवटच्या क्षणी अंपायरची लेक 'लखपती'; स्टार्कची बायको 'अनसोल्ड'च
8
लवकरच येतोय ICICI च्या जॉइंट व्हेंचरचा आयपीओ, केव्हा लॉन्च होणार? जाणून घ्या सविस्तर
9
"२ तारखेपर्यंत मला युती टिकवायचीय"; शिवसेनेसोबतच्या वादावर रविंद्र चव्हाणांचे मोठे राजकीय संकेत...
10
WPL 2026 Auction : एअरफोर्स ऑफिसर Shikha Pandey वर पैशांची 'बरसात'; ३६ व्या वर्षी विक्रमी बोली
11
“भाजपा पैसे वाटल्याशिवाय जिंकू शकत नाही, भविष्यात महायुती टिकणार नाही”: विजय वडेट्टीवार
12
WPL 2026 Auction : अनुष्का शर्माचं नाव येताच RCB तिच्या मागून धावला! पण खर्च नाही झेपला अन्...
13
१०० वर्षांनी पंचग्रही योग, २०२६ला ७ राशींची मनासारखी कमाई; पद-पैसा-प्रतिष्ठा, शुभ-लाभ भरभराट!
14
ट्रेनमध्ये प्रवास करताना नेटवर्क का जाते? इंटरनेट का होते स्लो? जाणून घ्या 'या' समस्येवरचा उपाय
15
एकपेक्षा जास्त लग्न करणे गुन्हा...'या' राज्यात विधेयक मंजूर; दंडासह कठोर शिक्षेची तरतूद
16
ॲपल अडकली? भारतात ₹३.२० लाख कोटी दंडाची टांगती तलवार; कायदा बदलला अन्...
17
३०० सीट वाढणार, ४ कोच कायमस्वरुपी जोडले जाणार; वंदे भारत ट्रेनला प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद
18
मन हेलावून टाकणारी घटना...! पती, पत्‍नी, प्रियकर अन् एक अजब करार...! सर्वत्र होतेय चर्चा 
19
टाटा सिएरा खरेच ₹११.४९ लाखांना मिळणार? नेक्सॉन, हॅरिअरलाच खाऊन टाकणार..., हो, नाही...
20
अरेच्चा! भारतीयांना 'हे' शब्द नीट उच्चारताच येत नाही; तुम्ही Croissant, Ghibli चा उच्चार चुकवता?
Daily Top 2Weekly Top 5

पीक विमा योजनेस मुदतवाढ मिळालीच पाहिजे-चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 00:29 IST

भोकर: तालुक्यात दिवशी येथे बँकेसमोर रांगेत शेतकºयाचा झालेला मृत्यू हा शासनाच्या नाकर्तेपणाचा व अयोग्य नियोजनाचा बळी असून अशा घटना रोखण्यासाठी राज्यभरात पीक विमा भरण्याची मुदत किमान दहा दिवसांनी वाढवून देणे गरजेचे आहे अशी आग्रही मागणी माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा़अशोकराव चव्हाण यांनी केली़

लोकमत न्यूज नेटवर्कभोकर: तालुक्यात दिवशी येथे बँकेसमोर रांगेत शेतकºयाचा झालेला मृत्यू हा शासनाच्या नाकर्तेपणाचा व अयोग्य नियोजनाचा बळी असून अशा घटना रोखण्यासाठी राज्यभरात पीक विमा भरण्याची मुदत किमान दहा दिवसांनी वाढवून देणे गरजेचे आहे अशी आग्रही मागणी माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा़अशोकराव चव्हाण यांनी केली़भोकर येथे एसबीआय बँकेच्या बाहेर जमलेल्या शेतकºयांशी त्यांनी रविवारी संवाद साधला़ दिवशी बु़ येथील मयत शेतकरी रामा पोतरे यांच्या निवासस्थानी जाऊन खा. चव्हाण यांनी कुटुंबियांचे सांत्वन केले़ मुख्य रस्त्यावरील एसबीआय बँकेसमोर रविवारीही पीक विमा भरण्यासाठी शेतकºयांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या़ यावेळी खा. चव्हाण यांनी शेतकºयांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या़ पोलीस जीपवर चढून यावेळी त्यांनी शेतकºयांना आवाहन केले़ ते म्हणाले, बँकेच्या रांगेत शेतकºयाचा मृत्यू होणे दुर्देवी घटना आहे़ अशा घटना टाळण्यासाठी शासनाने पीक विमा भरण्याची मुदत वाढवायला पाहिजे़राज्यभरात एकसारखीच परिस्थिती आहे़ वीजपुरवठा नाही, आॅनलाईनमध्ये अडचणी येत आहेत़ सरकारने योग्य नियोजन न करताच पीक विमा जाहीर केला़ अल्पावधीत शेतकºयांना बँकेच्या रांगेत उभे केले़ यापूर्वी अशाचप्रकारे नोटबंदी करुन जनतेला दोन महिने बँकेच्या रांगेत उभे राहायला लावले होते़ त्याहीवेळी निष्पाप नागरिकांचा नाहक बळी गेला़ आताही योग्य नियोजन होत नसल्याने शेतकºयांचा बळी जात आहे़ या ठिकाणी कोणतेही राजकारण करण्यासाठी आलो नसून जनतेची गैरसोय दूर व्हावी, अशी माझी भावना आहे़ जिल्हा प्रशासन व बँक व्यवस्थापनाने पीक विमा भरण्याचे योग्य नियोजन करावे़शेतकºयांचे अर्ज आॅफलाईन पद्धतीने घ्यावेत़ बँकेत काऊंटर वाढवावेत़ शेतकºयांनीही संयमाने आपले अर्ज भरुन सहकार्य करावे़ यावेळी खा. चव्हाण यांनी बँक व्यवस्थापक के़एस़ कुलकर्णी यांच्याशी चर्चा करुन सूचनाही केल्या़ बँकेसमोर मोठा जनसमुदाय जमला होता़ त्यातील काही शेतकºयांनी रास्ता रोकोही केला़ त्यानंतर रांगेतील शेतकºयांनी शिस्तीने अर्ज भरल्यानंतर बँकेसमोरील गर्दी बरीच निवळली होती़