शहरं
Join us  
Trending Stories
1
आता दोघांनीही थांबावे; डोनाल्ड ट्रम्प यांची भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा मध्यस्थीची ऑफर
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
भारताच्या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तानमध्ये कितीजण मृत्युमुखी पडले? आकडा आला समोर  
4
बहावलपूरवरील हल्ला पाकिस्तानी सैन्याच्या लागलाय जिव्हारी, कापलं गेलंय नाक, कारण काय?
5
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
6
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
7
‘ऑपरेशन सिंदूर’ला नागपुरातील ‘नागास्त्र-१’चे बळ ? टेहळणीसोबतच लक्ष्याचा भेद करण्याची क्षमता
8
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
9
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
10
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
11
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
12
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
13
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
14
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
15
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
16
Operation Sindoor Live Updates: पंजाबमधील अमृतसरमध्ये ब्लॅकआउट, लोकांना घरातच राहण्याचे आवाहन
17
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
18
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
19
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
20
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."

मालकीहक्कच असुरक्षित...!

By admin | Updated: December 20, 2015 23:53 IST

व्यंकटेश वैष्णव , बीड जागेच्या मालकी बाबतच्या प्रकरणांमध्ये मोठे वाद आहेत. भूमीअभिलेख कार्यालयात याबाबत नागरीकांचे आक्षेप अर्ज असताना देखील जागेंचे फेरफार होतात.

व्यंकटेश वैष्णव , बीडजागेच्या मालकी बाबतच्या प्रकरणांमध्ये मोठे वाद आहेत. भूमीअभिलेख कार्यालयात याबाबत नागरीकांचे आक्षेप अर्ज असताना देखील जागेंचे फेरफार होतात. जमीनींचे मालकी हक्कच असुरक्षीत आहेत. धनदांडग्यांना जमिनी बळकवून देण्यासाठी मदत करणारी टोळीच भूमीअभिलेख कार्यालयात सक्रीय आहे. याचे पुरावे ‘लोकमत’कडे उपलब्ध आहेत.येथील भूमी अभिलेख कार्यालयाचा गलथान कारभार चव्हाट्यावर येत आहे. खासरा पत्रक नसताना सातबारा बनवून जमीनींचे व्यवहार झाल्याचे यापूर्वीच समोर आले आहे. आता तर क्षेत्र शिल्लक नसताना देखील फेरफार ओढल्याने जागेचे मूळ मालक हादरले आहे. ही परिस्थिती केवळ बीड शहरापुरतीच मर्यादित नाही तर जिल्हयातील जमीनींचे मालकी हक्क धोक्यात आले आहेत. बीड येथील ललीत अब्बड व इतरांनी सिटी सर्व्हे नंबर ४५९९ या जागेवर क्षेत्र शिल्लक नसताना देखील दुसऱ्या एका व्यक्तीच्या नावे फेर करून दिल्याबाबत लेखी आक्षेप घेतला. असे असताना देखील भूमी अभिलेख कार्यालयाने दुसऱ्या एका व्यक्तीचे नावाने फेर ओढला. अब्बड यांनी २ डिसेंबर २०१४ दरम्यान आक्षेप अर्ज केला होता. या अर्जाकडे ‘अर्थ’पूर्ण दुर्लक्ष करत सदरील कार्यालयातील अधिकाऱ्यांनी ३० जुलै २०१५ रोजी फेरफार करून दिला. आक्षेप अर्जानंतर १७ महिन्यांनी भूमी अभिलेख कार्यालयाने आक्षेप अर्ज निकाली न काढता. खोटे कागदपत्र तयार करून फेरफार ओढला व १९ आॅगस्ट २०१५ रोजी मंजूर केले असल्याचे चेतन अब्बड यांनी सांगितले.मूळ जागा मालकाचेवारसदारच केले बेघरभूमी अभिलेख उप अधीक्षक कार्यालयाच्या बोगस कारभाराच्या नवनवीन कथा समोर येत आहेत. कागदपत्रांचा खेळ करत चक्क मूळ जागा मालकाच्या वारसदारानांच बेवारस करण्याचा प्रकार केला आहे. शहरातील हिरालाल चौक, बुरूड गल्ली येथील सिटी सर्व्हे नं.४५९९ मधील ५३.१ क्षेत्रातील अर्धी जागा मालकीची असताना देखील रेकॉर्डवर ही जागा नसल्याचे दाखवून जागा मालक मन्नूलाल अब्बड यांच्या वारसदारांना बेघर केले असल्याचे कागदपत्रावरून स्पष्ट होते.न्याय न मिळाल्यास न्यायालयात धावआक्षेप अर्ज दिलेला असतानाही १७ महिन्यानंतर फेरफारला मंजुरी दिली जाते. यामुळे आमच्यावर अन्याय होत आहे. याबाबत न्याय मिळाला नाही तर आम्ही न्यायालयात जाणार आहोत, असा इशारा आक्षेप अर्जदार चेतन अब्बड यांनी दिला.