शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

बाहेरून तेवढेच शिक्षक येणार

By admin | Updated: July 16, 2017 00:35 IST

औरंगाबाद : आंतरजिल्हा बदली प्रक्रियेने आता गती घेतली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : आंतरजिल्हा बदली प्रक्रियेने आता गती घेतली आहे. आतापर्यंत जवळपास दीडशे शिक्षक दुसऱ्या जिल्ह्यातून जिल्हा परिषदेत हजर झाले, तर येथून २८० शिक्षक कार्यमुक्त करण्यात आले आहेत. जिल्हा परिषदेने जेवढे शिक्षक सोडले, तेवढेच शिक्षक दुसऱ्या जिल्ह्यातून येणार आहेत. त्या सर्वांना समुपदेशन पद्धतीने पदस्थापना दिल्या जाणार आहेत. मंगळवारी जि. प. च्या यशवंतराव चव्हाण सभागृहात समुपदेशन प्रक्रिया राबविली जाण्याची शक्यता आहे. आंतरजिल्हा बदलीने मागील ८ ते १० दिवसांपासून १४० शिक्षक जिल्हा परिषदेत दाखल झाले आहेत. शिक्षण विभागाने त्यांना रुजू करून घेतले असले, तरी अद्याप कोणालाही पदस्थापना दिलेली नाही. दुसऱ्या जिल्ह्यातून आलेल्या शिक्षकांना पहिल्यांदा आदिवासी किंवा नक्षलग्रस्त क्षेत्रातील शाळांमध्ये पदस्थापना द्यावी. सेवाज्येष्ठ शिक्षक अशा क्षेत्रात जाण्यास तयार नसतील, तर सेवाकनिष्ठ शिक्षकांना त्याठिकाणच्या शाळांमध्ये पदस्थापना द्यावी, अशा शासनाच्या सूचना आहेत. पण, औरंगाबाद जिल्ह्यात ही दोन्ही प्र्रकारची क्षेत्रे नाहीत. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे आर्दड यांनी समुपदेशन पद्धतीनुसार पदस्थापना देण्याचा निर्णय घेतला. यामध्ये जिल्हा बदलीने येणाऱ्या शिक्षकांपैकी पहिल्यांदा सेवाज्येष्ठ शिक्षकांना अवघड क्षेत्रातील शाळांमध्ये पदस्थापना देण्याविषयी विचारले जाणार आहे. ते तयार नसतील, तर सेवाकनिष्ठ शिक्षकांना अवघड क्षेत्रातील शाळांमध्ये नोकरी करावी लागणार आहे. त्यांना त्या ठिकाणच्या शाळांमध्ये समुपदेशन पद्धतीद्वारे पदस्थापना दिली जाणार आहे. दुसऱ्या जिल्ह्यातून आलेल्या शिक्षकांना आता पदस्थापनेची प्रतीक्षा आहे. जिल्हांतर्गत बदल्यांची प्रक्रिया जुलैअखेरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. विशेष संवर्ग भाग-१ मध्ये येणाऱ्या शिक्षकांना जिल्हांतर्गत बदलीसाठी आॅनलाइन अर्ज करण्याची मुदत काल शुक्रवारी दुपारी ४ वाजेपासून संपुष्टात आली. शासनाने एका परिपत्रकाद्वारे विशेष संवर्ग भाग- २ मध्ये समाविष्ट शिक्षकांसाठी आॅनलाइन अर्ज करण्याची मुदत १४ ते १७ जुलैदरम्यान आहे. शिक्षकांना मुख्याध्यापक किंवा गटशिक्षणाधिकारी कार्यालयात आॅनलाइन अर्ज भरता येईल. दरम्यान, एकदाच संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्हा परिषद शिक्षकांकडून आॅनलाइन अर्ज भरण्याचा भार सर्व्हरवर पडल्यास ते हँग होईल. त्यामुळे पहिल्या टप्प्यात १४ ते १७ जुलैदरम्यान बीड, लातूर, जालना, सोलापूर आणि परभणी या पाच जिल्ह्यांसाठी सर्व्हर खुले करून दिले जाणार आहे.