शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
2
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
3
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
4
IND A vs SA A : पंत कॅप्टन्सीसह कमबॅक करणार! रोहित-विराट मात्र 'या' वनडे मालिकेपासून दूरच राहणार?
5
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
6
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
7
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
8
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
9
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
11
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
12
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
13
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
14
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
15
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
16
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
17
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
18
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
19
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
20
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ

बाहेरून तेवढेच शिक्षक येणार

By admin | Updated: July 16, 2017 00:35 IST

औरंगाबाद : आंतरजिल्हा बदली प्रक्रियेने आता गती घेतली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : आंतरजिल्हा बदली प्रक्रियेने आता गती घेतली आहे. आतापर्यंत जवळपास दीडशे शिक्षक दुसऱ्या जिल्ह्यातून जिल्हा परिषदेत हजर झाले, तर येथून २८० शिक्षक कार्यमुक्त करण्यात आले आहेत. जिल्हा परिषदेने जेवढे शिक्षक सोडले, तेवढेच शिक्षक दुसऱ्या जिल्ह्यातून येणार आहेत. त्या सर्वांना समुपदेशन पद्धतीने पदस्थापना दिल्या जाणार आहेत. मंगळवारी जि. प. च्या यशवंतराव चव्हाण सभागृहात समुपदेशन प्रक्रिया राबविली जाण्याची शक्यता आहे. आंतरजिल्हा बदलीने मागील ८ ते १० दिवसांपासून १४० शिक्षक जिल्हा परिषदेत दाखल झाले आहेत. शिक्षण विभागाने त्यांना रुजू करून घेतले असले, तरी अद्याप कोणालाही पदस्थापना दिलेली नाही. दुसऱ्या जिल्ह्यातून आलेल्या शिक्षकांना पहिल्यांदा आदिवासी किंवा नक्षलग्रस्त क्षेत्रातील शाळांमध्ये पदस्थापना द्यावी. सेवाज्येष्ठ शिक्षक अशा क्षेत्रात जाण्यास तयार नसतील, तर सेवाकनिष्ठ शिक्षकांना त्याठिकाणच्या शाळांमध्ये पदस्थापना द्यावी, अशा शासनाच्या सूचना आहेत. पण, औरंगाबाद जिल्ह्यात ही दोन्ही प्र्रकारची क्षेत्रे नाहीत. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे आर्दड यांनी समुपदेशन पद्धतीनुसार पदस्थापना देण्याचा निर्णय घेतला. यामध्ये जिल्हा बदलीने येणाऱ्या शिक्षकांपैकी पहिल्यांदा सेवाज्येष्ठ शिक्षकांना अवघड क्षेत्रातील शाळांमध्ये पदस्थापना देण्याविषयी विचारले जाणार आहे. ते तयार नसतील, तर सेवाकनिष्ठ शिक्षकांना अवघड क्षेत्रातील शाळांमध्ये नोकरी करावी लागणार आहे. त्यांना त्या ठिकाणच्या शाळांमध्ये समुपदेशन पद्धतीद्वारे पदस्थापना दिली जाणार आहे. दुसऱ्या जिल्ह्यातून आलेल्या शिक्षकांना आता पदस्थापनेची प्रतीक्षा आहे. जिल्हांतर्गत बदल्यांची प्रक्रिया जुलैअखेरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. विशेष संवर्ग भाग-१ मध्ये येणाऱ्या शिक्षकांना जिल्हांतर्गत बदलीसाठी आॅनलाइन अर्ज करण्याची मुदत काल शुक्रवारी दुपारी ४ वाजेपासून संपुष्टात आली. शासनाने एका परिपत्रकाद्वारे विशेष संवर्ग भाग- २ मध्ये समाविष्ट शिक्षकांसाठी आॅनलाइन अर्ज करण्याची मुदत १४ ते १७ जुलैदरम्यान आहे. शिक्षकांना मुख्याध्यापक किंवा गटशिक्षणाधिकारी कार्यालयात आॅनलाइन अर्ज भरता येईल. दरम्यान, एकदाच संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्हा परिषद शिक्षकांकडून आॅनलाइन अर्ज भरण्याचा भार सर्व्हरवर पडल्यास ते हँग होईल. त्यामुळे पहिल्या टप्प्यात १४ ते १७ जुलैदरम्यान बीड, लातूर, जालना, सोलापूर आणि परभणी या पाच जिल्ह्यांसाठी सर्व्हर खुले करून दिले जाणार आहे.