शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

बाहेरून तेवढेच शिक्षक येणार

By admin | Updated: July 16, 2017 00:35 IST

औरंगाबाद : आंतरजिल्हा बदली प्रक्रियेने आता गती घेतली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : आंतरजिल्हा बदली प्रक्रियेने आता गती घेतली आहे. आतापर्यंत जवळपास दीडशे शिक्षक दुसऱ्या जिल्ह्यातून जिल्हा परिषदेत हजर झाले, तर येथून २८० शिक्षक कार्यमुक्त करण्यात आले आहेत. जिल्हा परिषदेने जेवढे शिक्षक सोडले, तेवढेच शिक्षक दुसऱ्या जिल्ह्यातून येणार आहेत. त्या सर्वांना समुपदेशन पद्धतीने पदस्थापना दिल्या जाणार आहेत. मंगळवारी जि. प. च्या यशवंतराव चव्हाण सभागृहात समुपदेशन प्रक्रिया राबविली जाण्याची शक्यता आहे. आंतरजिल्हा बदलीने मागील ८ ते १० दिवसांपासून १४० शिक्षक जिल्हा परिषदेत दाखल झाले आहेत. शिक्षण विभागाने त्यांना रुजू करून घेतले असले, तरी अद्याप कोणालाही पदस्थापना दिलेली नाही. दुसऱ्या जिल्ह्यातून आलेल्या शिक्षकांना पहिल्यांदा आदिवासी किंवा नक्षलग्रस्त क्षेत्रातील शाळांमध्ये पदस्थापना द्यावी. सेवाज्येष्ठ शिक्षक अशा क्षेत्रात जाण्यास तयार नसतील, तर सेवाकनिष्ठ शिक्षकांना त्याठिकाणच्या शाळांमध्ये पदस्थापना द्यावी, अशा शासनाच्या सूचना आहेत. पण, औरंगाबाद जिल्ह्यात ही दोन्ही प्र्रकारची क्षेत्रे नाहीत. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे आर्दड यांनी समुपदेशन पद्धतीनुसार पदस्थापना देण्याचा निर्णय घेतला. यामध्ये जिल्हा बदलीने येणाऱ्या शिक्षकांपैकी पहिल्यांदा सेवाज्येष्ठ शिक्षकांना अवघड क्षेत्रातील शाळांमध्ये पदस्थापना देण्याविषयी विचारले जाणार आहे. ते तयार नसतील, तर सेवाकनिष्ठ शिक्षकांना अवघड क्षेत्रातील शाळांमध्ये नोकरी करावी लागणार आहे. त्यांना त्या ठिकाणच्या शाळांमध्ये समुपदेशन पद्धतीद्वारे पदस्थापना दिली जाणार आहे. दुसऱ्या जिल्ह्यातून आलेल्या शिक्षकांना आता पदस्थापनेची प्रतीक्षा आहे. जिल्हांतर्गत बदल्यांची प्रक्रिया जुलैअखेरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. विशेष संवर्ग भाग-१ मध्ये येणाऱ्या शिक्षकांना जिल्हांतर्गत बदलीसाठी आॅनलाइन अर्ज करण्याची मुदत काल शुक्रवारी दुपारी ४ वाजेपासून संपुष्टात आली. शासनाने एका परिपत्रकाद्वारे विशेष संवर्ग भाग- २ मध्ये समाविष्ट शिक्षकांसाठी आॅनलाइन अर्ज करण्याची मुदत १४ ते १७ जुलैदरम्यान आहे. शिक्षकांना मुख्याध्यापक किंवा गटशिक्षणाधिकारी कार्यालयात आॅनलाइन अर्ज भरता येईल. दरम्यान, एकदाच संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्हा परिषद शिक्षकांकडून आॅनलाइन अर्ज भरण्याचा भार सर्व्हरवर पडल्यास ते हँग होईल. त्यामुळे पहिल्या टप्प्यात १४ ते १७ जुलैदरम्यान बीड, लातूर, जालना, सोलापूर आणि परभणी या पाच जिल्ह्यांसाठी सर्व्हर खुले करून दिले जाणार आहे.