शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
3
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
4
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
5
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
6
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
7
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
8
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
9
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
10
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
11
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
12
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
13
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
14
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
15
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
16
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
17
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
18
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
19
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

१९० पैकी केवळ ५३ सौर कृषीपंपच झाले कार्यान्वित !

By admin | Updated: January 1, 2017 23:36 IST

उस्मानाबाद : भारनियमन आणि विद्युत बिलाच्या कटकटीतून शेतकऱ्यांची सुटका व्हावी, यासाठी शासनाने सौर कृषीपंप वाटप योजना सुरू केली.

उस्मानाबाद : भारनियमन आणि विद्युत बिलाच्या कटकटीतून शेतकऱ्यांची सुटका व्हावी, यासाठी शासनाने सौर कृषीपंप वाटप योजना सुरू केली. सदरील योजनेअंतर्गत जिल्ह्यासाठी सुमारे १९० सोला कृषीपंप वाटपाचे उद्दिष्ट आले होते. सर्व लाभार्थ्यांची निवड करण्यात आली असली तरी ९९ शेतकऱ्यांनी पैसे भरले अले तरी आजवर केवळ ५३ सोलापंपच कार्यान्वित होवू शकले. जवळपास वर्षभराचा कालावधी लोटत आला आहे. अनेक शेतकऱ्यांनी पैसेही भरले आहेत. असे असतानाही २५ टक्यांच्या आसपासच सोलारपंप कार्यान्वित होवू शकल्याने ‘महावितरण’च्या कार्यापद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येवू लागले आहे.मागील तीन-चार वर्षात जिल्हाभरातील शेकऱ्यांनी भीषण दुष्काळाचा सामना केला. पाणीटंचाईमुळे शेतीव्यवसाय अक्षरश: मोडून पडला होता. सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले. अशा दुष्काळी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी शासनाने अनुदानावर सोलार कृषीपंप वाटप योजना सुरू केली. ज्यामुळे शेतकऱ्यांची भारनियमन आणि विद्युत बिलाच्या कटकटीतून मुक्तता होईल, अशी अपेक्षा होती. दरम्यान, या योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यासाठी सुमारे १९० सोलारपंप पाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले. त्यानुसार वीज कंपनीकडे सुमारे चारशेच्या आसपास अर्जही दाखल झाले. यापैकी सर्व निकषांमध्ये पात्र ठरलेल्या १९० शेतकऱ्यांची निवडही करण्यात आली. यापैकी १६५ जणांना कोटेशनही देण्यात आले असता ९९ जणांनी पैसे भरले. परंतु, वर्षभराचा कालावधी लोटत आला असतानाही आजवर केवळ ५३ सोलारपंपच कार्यान्वित केले आहेत. पैसे भरूनही ज्या लाभार्थ्यांचे सोलारपंप कार्यान्वित करण्यात आलेले नाहीत, असे शेतकरी वीज कपंनीकडे चकरा मारीत आहेत. परंतु, अधिकारी सोयीची उत्तरे देत आहेत. त्यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. सध्या प्रकल्पांसह विहिरी, कुपनलिकांना पाणी आहे. पिकांना पाणी देण्याची शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. परंतु, भारनियमन आणि खंडित वीजपुरवठ्यामुळे पाणी असूनही पिके करपू लागली आहेत. अशा परिस्थितीत लाभार्थी शेतकऱ्यांना सोलारपंप मोठा आधार ठरले असते. परंतु, दुर्दैवाने तसे झाले नाही. पैसे भरूनही संबंधित ज्या लाभार्थ्यांचे सोलार कृषीपंप कार्यान्वित करण्यात आलेले नाहीत, त्याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.(प्रतिनिधी)