शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

१९० पैकी केवळ ५३ सौर कृषीपंपच झाले कार्यान्वित !

By admin | Updated: January 1, 2017 23:36 IST

उस्मानाबाद : भारनियमन आणि विद्युत बिलाच्या कटकटीतून शेतकऱ्यांची सुटका व्हावी, यासाठी शासनाने सौर कृषीपंप वाटप योजना सुरू केली.

उस्मानाबाद : भारनियमन आणि विद्युत बिलाच्या कटकटीतून शेतकऱ्यांची सुटका व्हावी, यासाठी शासनाने सौर कृषीपंप वाटप योजना सुरू केली. सदरील योजनेअंतर्गत जिल्ह्यासाठी सुमारे १९० सोला कृषीपंप वाटपाचे उद्दिष्ट आले होते. सर्व लाभार्थ्यांची निवड करण्यात आली असली तरी ९९ शेतकऱ्यांनी पैसे भरले अले तरी आजवर केवळ ५३ सोलापंपच कार्यान्वित होवू शकले. जवळपास वर्षभराचा कालावधी लोटत आला आहे. अनेक शेतकऱ्यांनी पैसेही भरले आहेत. असे असतानाही २५ टक्यांच्या आसपासच सोलारपंप कार्यान्वित होवू शकल्याने ‘महावितरण’च्या कार्यापद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येवू लागले आहे.मागील तीन-चार वर्षात जिल्हाभरातील शेकऱ्यांनी भीषण दुष्काळाचा सामना केला. पाणीटंचाईमुळे शेतीव्यवसाय अक्षरश: मोडून पडला होता. सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले. अशा दुष्काळी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी शासनाने अनुदानावर सोलार कृषीपंप वाटप योजना सुरू केली. ज्यामुळे शेतकऱ्यांची भारनियमन आणि विद्युत बिलाच्या कटकटीतून मुक्तता होईल, अशी अपेक्षा होती. दरम्यान, या योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यासाठी सुमारे १९० सोलारपंप पाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले. त्यानुसार वीज कंपनीकडे सुमारे चारशेच्या आसपास अर्जही दाखल झाले. यापैकी सर्व निकषांमध्ये पात्र ठरलेल्या १९० शेतकऱ्यांची निवडही करण्यात आली. यापैकी १६५ जणांना कोटेशनही देण्यात आले असता ९९ जणांनी पैसे भरले. परंतु, वर्षभराचा कालावधी लोटत आला असतानाही आजवर केवळ ५३ सोलारपंपच कार्यान्वित केले आहेत. पैसे भरूनही ज्या लाभार्थ्यांचे सोलारपंप कार्यान्वित करण्यात आलेले नाहीत, असे शेतकरी वीज कपंनीकडे चकरा मारीत आहेत. परंतु, अधिकारी सोयीची उत्तरे देत आहेत. त्यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. सध्या प्रकल्पांसह विहिरी, कुपनलिकांना पाणी आहे. पिकांना पाणी देण्याची शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. परंतु, भारनियमन आणि खंडित वीजपुरवठ्यामुळे पाणी असूनही पिके करपू लागली आहेत. अशा परिस्थितीत लाभार्थी शेतकऱ्यांना सोलारपंप मोठा आधार ठरले असते. परंतु, दुर्दैवाने तसे झाले नाही. पैसे भरूनही संबंधित ज्या लाभार्थ्यांचे सोलार कृषीपंप कार्यान्वित करण्यात आलेले नाहीत, त्याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.(प्रतिनिधी)