शहरं
Join us  
Trending Stories
1
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
2
ट्रम्प यांच्या पत्नीची 'AI चॅलेन्ज', जिंकणाऱ्याला मिळणार लाखोंचं बक्षीस...! जाणून घ्या, करायचं काय?
3
ट्रम्प टॅरिफचा बाजाराला जोरदार झटका! सेन्सेक्स ६०० अंकांनी कोसळला; काही मिनिटांत ४.१४ लाख कोटींचे नुकसान
4
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
5
Russia Ukraine War: रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर भयावह हल्ला, तीन ठार, १२ जण जखमी
6
"रशिया युक्रेन युद्ध मोदींचे" अमेरिकन राजदूताने भारताला धरलं जबाबदार, टॅरिफ कमी करण्यासाठी ठेवली अट
7
Rishi Panchami 2025: ऋषी मुनी तथा देव, मृत हरणाचे किंवा वाघाचे कातडे 'आसन' म्हणून का वापरत असत? वाचा 
8
पुतिन नव्हे..., आता झेलेन्स्कींवरच भडकले ट्रम्प, म्हणाले, "युद्ध..., युक्रेनने ऐकले नाही, तर बंदी घालेन!"
9
गजानन महाराज पुण्यतिथि: जाणून घ्या त्यांनी दिलेला सिद्धमंत्र; जो तुमचे आयुष्य बदलून टाकेल!
10
Mumbai: डॉकयार्ड रेल्वे स्टेशनजवळ सापडलेल्या मृतदेहाचा उलगडा, जमिनीच्या वादातून हत्या, तिघांना अटक
11
जामीन अर्जावरील सुनावणी ४३ वेळा पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, आरोपीला दिलासा
12
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
13
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
14
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
15
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
16
Manoj Jarange Patil: मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
17
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
18
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
19
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
20
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल

१९० पैकी केवळ ५३ सौर कृषीपंपच झाले कार्यान्वित !

By admin | Updated: January 1, 2017 23:36 IST

उस्मानाबाद : भारनियमन आणि विद्युत बिलाच्या कटकटीतून शेतकऱ्यांची सुटका व्हावी, यासाठी शासनाने सौर कृषीपंप वाटप योजना सुरू केली.

उस्मानाबाद : भारनियमन आणि विद्युत बिलाच्या कटकटीतून शेतकऱ्यांची सुटका व्हावी, यासाठी शासनाने सौर कृषीपंप वाटप योजना सुरू केली. सदरील योजनेअंतर्गत जिल्ह्यासाठी सुमारे १९० सोला कृषीपंप वाटपाचे उद्दिष्ट आले होते. सर्व लाभार्थ्यांची निवड करण्यात आली असली तरी ९९ शेतकऱ्यांनी पैसे भरले अले तरी आजवर केवळ ५३ सोलापंपच कार्यान्वित होवू शकले. जवळपास वर्षभराचा कालावधी लोटत आला आहे. अनेक शेतकऱ्यांनी पैसेही भरले आहेत. असे असतानाही २५ टक्यांच्या आसपासच सोलारपंप कार्यान्वित होवू शकल्याने ‘महावितरण’च्या कार्यापद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येवू लागले आहे.मागील तीन-चार वर्षात जिल्हाभरातील शेकऱ्यांनी भीषण दुष्काळाचा सामना केला. पाणीटंचाईमुळे शेतीव्यवसाय अक्षरश: मोडून पडला होता. सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले. अशा दुष्काळी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी शासनाने अनुदानावर सोलार कृषीपंप वाटप योजना सुरू केली. ज्यामुळे शेतकऱ्यांची भारनियमन आणि विद्युत बिलाच्या कटकटीतून मुक्तता होईल, अशी अपेक्षा होती. दरम्यान, या योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यासाठी सुमारे १९० सोलारपंप पाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले. त्यानुसार वीज कंपनीकडे सुमारे चारशेच्या आसपास अर्जही दाखल झाले. यापैकी सर्व निकषांमध्ये पात्र ठरलेल्या १९० शेतकऱ्यांची निवडही करण्यात आली. यापैकी १६५ जणांना कोटेशनही देण्यात आले असता ९९ जणांनी पैसे भरले. परंतु, वर्षभराचा कालावधी लोटत आला असतानाही आजवर केवळ ५३ सोलारपंपच कार्यान्वित केले आहेत. पैसे भरूनही ज्या लाभार्थ्यांचे सोलारपंप कार्यान्वित करण्यात आलेले नाहीत, असे शेतकरी वीज कपंनीकडे चकरा मारीत आहेत. परंतु, अधिकारी सोयीची उत्तरे देत आहेत. त्यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. सध्या प्रकल्पांसह विहिरी, कुपनलिकांना पाणी आहे. पिकांना पाणी देण्याची शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. परंतु, भारनियमन आणि खंडित वीजपुरवठ्यामुळे पाणी असूनही पिके करपू लागली आहेत. अशा परिस्थितीत लाभार्थी शेतकऱ्यांना सोलारपंप मोठा आधार ठरले असते. परंतु, दुर्दैवाने तसे झाले नाही. पैसे भरूनही संबंधित ज्या लाभार्थ्यांचे सोलार कृषीपंप कार्यान्वित करण्यात आलेले नाहीत, त्याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.(प्रतिनिधी)