शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती तुटली! पुण्यात भाजपा-NCP वेगळे लढणार; अजित पवार म्हणाले, "मी माझं सर्वस्व..."
2
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
3
Plane Crash Mexico Video: इमर्जन्सी लँडिंगआधीच विमान कोसळले; भयंकर अपघातात १० जण ठार
4
TV खरेदीचा विचार करत असाल तर आत्ताच करा, जानेवारीपासून किंमत वाढवण्याची तयारी; कारण काय?
5
आचारसंहिता लागण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांची धावपळ; प्रकल्पाची उद्घाटने, भूमिपूजन अन् घोषणांचा सपाटा
6
धनुर्मासारंभ: ९ राशींना शुभ काळ, सूर्यकृपेने दुप्पट लाभ; पद-पैसा वाढ, धनुसंक्रांती ठरेल खास!
7
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
8
कोट-पँट घालून फिरलात तर अटक अटळ! शिक्षा लेखी नाही, पण चाबकाचे फटकारे अन्...
9
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
10
क्रिकेटवेड्या देशाने मेस्सीवर जीव टाकला... पुढे? भारतीय फुटबॉलच्या विकासासाठी काय?
11
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
12
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
13
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
14
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
15
शत्रूला दिसणारच नाही भारताचे लढाऊ विमान, जळगावच्या बहिणाबाई विद्यापीठाचे संशोधन
16
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
17
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
18
आचारसंहितेच्या आधीच निधीचे जीआर, उद्घाटने अन् भूमिपूजनाचा सपाटा; आयोगाची करडी नजर
19
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
20
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
Daily Top 2Weekly Top 5

‘बॅडपॅच’मधून बाहेर !

By admin | Updated: October 21, 2014 00:58 IST

संजय तिपाले , बीड ऐंशीच्या दशकात गेवराई व आष्टी मतदारसंघातील राजकीय वर्तुळ गाजविणारे माधवराव पवार, भीमराव धोंडे या तगड्या पहेलवानांना मधल्या काही वर्षांत ‘बॅडपॅच’ मधून जावे लागले़

संजय तिपाले , बीडऐंशीच्या दशकात गेवराई व आष्टी मतदारसंघातील राजकीय वर्तुळ गाजविणारे माधवराव पवार, भीमराव धोंडे या तगड्या पहेलवानांना मधल्या काही वर्षांत ‘बॅडपॅच’ मधून जावे लागले़ तब्बल दोन तप ही घराणी राजकीय विजनवासात होती; परंतु यावेळी या घराण्यांचा ‘राजयोग’ आला़ प्रस्थापितांना जोराचे हादरे देत माधवराव पवार यांचे पुत्र अ‍ॅड़ लक्ष्मण पवार व भीमराव धोंडे यांनी विधानसभेत दणदणीत ‘एंट्री’ करतानाच नव्या ‘इनिंग’लाही सुरुवात केली़ धोंडे चौथ्यांदा विधानसभेत पोहचले तर अ‍ॅड़ पवार यांनी पहिल्याच प्रयत्नात आमदारकीचा गुलाल लावला़माधवराव पवार अन् भीमराव धांडे यांचे नेतृत्व एकाचवेळी उदयाला आले़ पवार यांना वडील शाहूराव पवार यांचा राजकीय वारसा होता तर धोंडे हे सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आले़ शिवाजीराव पंडित यांच्या सत्तेला सुरुंग लावत १९९० मध्ये माधवराव पवार पहिल्यांदा विधासनसभेत निवडून गेले़ पवार एस काँग्रेस तर पंडित इंदिरा काँग्रेसकडून लढले होते़ १९८५ मध्येही या दोघांमध्येच सामना झाला; परंतु पवार इंदिरा काँग्रेसचे तर पंडित एस काँगे्रसचे उमेदवार होते़ या लढतीत पंडित यांनी पवारांना चित करुन ‘हिशेब’ पूर्ण केला होता़ त्यानंतर पवार यांनी पुन्हा नशीब आजमावले़ मात्र, पंडित यांच्यापुढे त्यांचा निभाव लागला नाही़ नंतरच्या काळात माधवराव पवार यांना फक्त गेवराई शहरापुरतेच जखडून ठेवत पंडितांनी मतदारसंघात हुकूमत गाजवली़ अडीच वर्र्षांपूर्वी माधवराव पवार यांचे चिरंजीव अ‍ॅड़ लक्ष्मण पवार यांनी भाजपात प्रवेश केला़ दोन पंडित राष्ट्रवादीत तर एकटे पवार भाजपात असे नवे समीकरण बनले़ लोकसभा निवडणुकीत पवारांनी मतदारसंघ ढवळून काढत सराव केला होता़ काल दोन पंडितांशी एकाकी झुंज देताना अ‍ॅड़ पवार यांची कसोटी लागली होती़ पंडितांच्या एकीने झालेली ‘रिअ‍ॅक्शन’ पवारांच्या पथ्यावर पडली़ पंडितविरोधी लाट ‘कॅश’ करताना पवारांनी बदामरावांना ‘क्लिनबोल्ड’ केले़चुरशीच्या लढतीत धोंडेच ‘संघर्षनायक’!१९७८ मध्ये आष्टी तालुक्यात शेतकरी संघटनेच्या माध्यमातून भीमराव धोंडे यांचे नेतृत्व फुलले़ १९७८ मध्ये ते अपक्ष मैदानात होते; पण त्यांचा पराभव झाला़ १९८० मध्ये दुसऱ्या प्रयत्नात अपक्ष नशीब आजमावणारे धोंडे विजयी झाले़ पुढे १९८५, १९९० मध्ये त्यांनी काँग्रेसकडून विधानसभावारी केली़ १९९५ मध्ये त्यांना साहेबराव दरेकर यांनी धक्का दिला होता़ १९९९, २००४ मध्ये धोंडेंची निराशा झाली़ नंतर त्यांनी भाजपाचा आश्रय घेतला़ २००९ मध्ये भाजपाने बाळासाहेब आजबेंना उमेदवारी दिली़ त्यामुळे धोंडेंनी बंडाचे निशाण फडकावत राष्ट्रवादीत उडी घेतली़ लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ते पुन्हा भाजपात परतले आणि आजबेंऐवजी त्यांना संधी मिळाली़ या संधीचे सोने करत त्यांनी धस यांच्या पंधरा वर्षांच्या सत्तेला सुरुंग लावला़ २० वर्षांपासून सत्तेबाहेर राहिलेल्या भीमराव धोंडे यांनी मधल्या काळात ‘बंदा’ या चित्रपटात भूमिका साकारली़ ‘आई’ मालिकेतही त्यांनी काम केले़ ‘संघर्ष’ व ‘तहान’ या चित्रपटांची निर्मितीही त्यांनी केली़ राजकारणाबरोबरच अभिनयाचे अंग जपताना त्यांनी वास्तवातही मोठ्या संघर्षातून विधानसभा गाठत ‘नायक’ असल्याचे सिध्द केले़