शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
2
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
3
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
4
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
5
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
6
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
7
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
8
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
9
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
10
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
11
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?
12
'एक गरिबांचा, तर दुसरा श्रीमंतांचा; दोन देश निर्माण केले', राहुल गांधींचा PM मोदींवर निशाणा
13
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी घसरण, Silver ₹३५०० तर Gold किती रुपयांनी झालं स्वस्त?
14
DSP Rishikant Shukla: दहा वर्षांच्या सेवेतच जमवली १०० कोटींची माया; एक दोन नव्हे, तब्बल १२ भूखंड, ११ दुकाने अन्...
15
पत्नीने दिला जुळ्यां मुलांना जन्म, पती म्हणाला, ही माझी मुलंच नाहीत, जोरदार राडा, अखेरीस समोर आलं वेगळंच सत्य
16
बाजारात खळबळ! Hyundai ने ₹७.९० लाखात लाँच केली नवीन 'व्हेन्यू २०२५'; जबरदस्त फीचर्स आणि ADAS सह एंट्री
17
अरे व्वा! पांढरे केस हे वाढलेल्या वयाचं लक्षण नाही, ही तर आहे शरीरासाठी संरक्षण ढाल
18
दीड वर्षांपूर्वीच्या पल्लेदार कौशल हत्येचा पर्दाफाश! बायकोच्या 'डबल गेम'ने पोलीसही हादरले
19
मैदान गाजवले, आता ब्रँड व्हॅल्यूही वाढली! महिला क्रिकेटपटूंच्या कमाईत दुप्पट वाढ; सर्वाधिक फी कोणाची?
20
पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात मोठा स्फोट! इस्लामाबादमध्ये खळबळ; बेसमेंटमध्ये झालेल्या ब्लास्टने इमारतीला हादरवले

१३ हजारपैकी १० हजार लसी संपल्या, नागरिकांचा संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:02 IST

औरंगाबाद : शासनाने महापालिकेला रविवारी रात्री १३ हजार लसी दिल्या होत्या. सोमवारी शहरातील ५६ केंद्रांवर नागरिकांना १० हजार ३०४ ...

औरंगाबाद : शासनाने महापालिकेला रविवारी रात्री १३ हजार लसी दिल्या होत्या. सोमवारी शहरातील ५६ केंद्रांवर नागरिकांना १० हजार ३०४ डोस देण्यात आले. दुपारनंतर अनेक केंद्रांवर लस संपली. नागरिकांना लस न मिळताच माघारी फिरावे लागल्यामुळे त्यांनी संताप व्यक्त केला.

४५ वर्षांवरील नागरिकांना दुसरा डोस देण्याकरिता रविवारी रात्री उशिरा मनपाला १३ हजार लसी प्राप्त झाल्या. त्यासोबतच १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी ४ हजार ३५० लसी मिळाल्या. त्यामुळे मनपाच्या आरोग्य विभागाने सोमवारी ५६ केंद्रांवर लसीकरण केले जाणार असल्याचे जाहीर केले. लस आल्याचे कळताच नागरिकांनी सकाळपासूनच केंद्रांवर गर्दी केली. प्रत्येक केंद्रावर ५० किंवा १०० लसी देण्यात आल्या. नागरिकांची संख्या अडीचशे ते तीनशे असताना, लसीचा पुरवठा कमी झाल्याने अनेक नागरिकांना लस मिळाली नाही. सकाळपासून ताटकळत बसलेल्या अनेक नागरिकांना लस न घेताच माघारी फिरावे लागल्यामुळे त्यांनी संताप व्यक्त केला. आता महापालिकेकडे फक्त तीन हजार लसी शिल्लक आहेत. मंगळवारी सकाळी अवघ्या एक ते दीड तासामध्ये हा साठा संपणार आहे. २१ ठिकाणी लसीकरण करण्यात येणार आहे. नागरिकांची गर्दी होत असल्यामुळे मिळालेली लस देण्यासाठी टोकन पध्दत राबवली जात आहे. रांगेत बसलेल्या नागरिकांना टोकन देऊन त्यांचे लसीकरण करण्यात आले.

१८ ते ४४ वयोगटातील ६०० जणांना लस

शहरात १८ ते ४४ वयोगटासाठी सहा आरोग्य केंद्रांवर लसीकरण सुरू करण्यात आलेले आहे. नोंदणी करूनच लसीकरण केंद्रावर प्रवेश दिला जात आहे. त्यामुळे प्रत्येक केंद्रावर २०० पेक्षा अधिक नागरिकांना लस मिळत नाही. त्यामुळे दिवसभर ६०० नागरिकांनाच लस देण्यात आली.