शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

१३ हजारपैकी १० हजार लसी संपल्या, नागरिकांचा संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:02 IST

औरंगाबाद : शासनाने महापालिकेला रविवारी रात्री १३ हजार लसी दिल्या होत्या. सोमवारी शहरातील ५६ केंद्रांवर नागरिकांना १० हजार ३०४ ...

औरंगाबाद : शासनाने महापालिकेला रविवारी रात्री १३ हजार लसी दिल्या होत्या. सोमवारी शहरातील ५६ केंद्रांवर नागरिकांना १० हजार ३०४ डोस देण्यात आले. दुपारनंतर अनेक केंद्रांवर लस संपली. नागरिकांना लस न मिळताच माघारी फिरावे लागल्यामुळे त्यांनी संताप व्यक्त केला.

४५ वर्षांवरील नागरिकांना दुसरा डोस देण्याकरिता रविवारी रात्री उशिरा मनपाला १३ हजार लसी प्राप्त झाल्या. त्यासोबतच १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी ४ हजार ३५० लसी मिळाल्या. त्यामुळे मनपाच्या आरोग्य विभागाने सोमवारी ५६ केंद्रांवर लसीकरण केले जाणार असल्याचे जाहीर केले. लस आल्याचे कळताच नागरिकांनी सकाळपासूनच केंद्रांवर गर्दी केली. प्रत्येक केंद्रावर ५० किंवा १०० लसी देण्यात आल्या. नागरिकांची संख्या अडीचशे ते तीनशे असताना, लसीचा पुरवठा कमी झाल्याने अनेक नागरिकांना लस मिळाली नाही. सकाळपासून ताटकळत बसलेल्या अनेक नागरिकांना लस न घेताच माघारी फिरावे लागल्यामुळे त्यांनी संताप व्यक्त केला. आता महापालिकेकडे फक्त तीन हजार लसी शिल्लक आहेत. मंगळवारी सकाळी अवघ्या एक ते दीड तासामध्ये हा साठा संपणार आहे. २१ ठिकाणी लसीकरण करण्यात येणार आहे. नागरिकांची गर्दी होत असल्यामुळे मिळालेली लस देण्यासाठी टोकन पध्दत राबवली जात आहे. रांगेत बसलेल्या नागरिकांना टोकन देऊन त्यांचे लसीकरण करण्यात आले.

१८ ते ४४ वयोगटातील ६०० जणांना लस

शहरात १८ ते ४४ वयोगटासाठी सहा आरोग्य केंद्रांवर लसीकरण सुरू करण्यात आलेले आहे. नोंदणी करूनच लसीकरण केंद्रावर प्रवेश दिला जात आहे. त्यामुळे प्रत्येक केंद्रावर २०० पेक्षा अधिक नागरिकांना लस मिळत नाही. त्यामुळे दिवसभर ६०० नागरिकांनाच लस देण्यात आली.