शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

आंदोलनाने उस्मानाबाद दणाणले

By admin | Updated: November 18, 2014 01:07 IST

उस्मानाबाद : जवखेडे (जि़अहमदनगर) येथील तिहेरी हत्याकांडातील आरोपीतांना अटक करून कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी डॉ़ बाबासाहेब आंबेडकर विचार संवर्धन

उस्मानाबाद : जवखेडे (जि़अहमदनगर) येथील तिहेरी हत्याकांडातील आरोपीतांना अटक करून कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी डॉ़ बाबासाहेब आंबेडकर विचार संवर्धन कृती समिती व सर्वपक्षीयांच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला़ या मोर्चातील सहभागी कार्यकर्त्यांच्या विविध घोषणांनी शहर दणाणून गेले.भीमनगर येथून मोर्चा निघून संत गाडगे महाराज चौक, डॉ़ बाबासाहेब आंबेडकर चौक, शिवाजी चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला़ येथे मोर्चाचे सभेत रूपांतर झाले़ उपस्थितांनी विविध मागण्या करीत दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली़ तसेच जवखेडे हत्याकांडातील आरोपींना अटक करून जलद गती न्यायालयात खटला चालवावा, अहमदनगरचे जिल्हाधिकारी व पाथर्डीचे तालुका दंडाधिकारी यांना बडतर्फ करून गुन्हे दाखल करावेत, अहमदनगर जिल्ह्यातील सर्व तंटामुक्त समित्या तत्काळ बरखास्त कराव्यात, अनु़जाती/ जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यात सुधारणा करून प्रभावी अंमलबजावणी करावी, हत्याकांडाबाबत सामाजिक लोकप्रतिनिधींची सत्यशोधन समिती तयार करून घटनेची सत्यता समोर आणावी, अहमदनगर जिल्हा दलित अत्याचारग्रस्त जाहीर करावा, आरोपींना पाठीशी घालणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना सहआरोपी करावे, अहमदनगर जिल्ह्यातील दलित अत्याचारात सहभागी असलेल्या आरोपींच्या मालमत्ता जप्त कराव्यात आदी मागण्या करण्यात आल्या आहेत़ या मोर्चात धनंजय शिंगाडे, माजी आ. दयानंद गायकवाड, कैलास शिंदे, नगरसेवक पृथ्वीराज चिलवंत, प्रा. संजय कांबळे, सुजीत ओव्हाळ, मिलिंद रोकडे, डी़ जे़ हौसलमल, सुनिल गायकवाड, रवी माळाळे, विशाल शिंगाडे, प्रज्ञावंत ओव्हाळ, यशवंत माळाळे, सागर चव्हाण, मेसा जानराव, प्रसेनजीत सरवदे, पृथ्वीराज मस्के, सिध्दार्थ सिरसाठ, सुजित ओव्हाळ, सिध्दार्थ सोनवणे, स्वप्नील शिंगाडे, अशोक कांबळे यांच्यासह नागरिक, महिला सहभागी झाल्या होत्या़ (प्रतिनिधी)उस्मानाबाद : मराठा - मुस्लिम समाजाच्या आरक्षणाला उच्च न्यायालयाकडून अंतरिम स्थगिती मिळाली आहे. सदर आरक्षण पूर्ववत ठेवावे या मागणीसाठी सोमवारी पुकारण्यात आलेल्या जिल्हा बंदला चांगला प्रतिसाद मिळाला़ उस्मानाबाद, परंडा, तुळजापूर, वाशी शहरात बंद पाळण्यात आला़ भूममध्ये निवेदन देवून निषेध नोंदविण्यात आला़ तसेच शहरासह जिल्ह्यातील काही शैक्षणिक संस्थांनीही बंदमध्ये सहभाग नोंदविला़ जिल्ह्यात बंद काळात कोणतीही अनुचित घटना होवू नये म्हणून पोलिस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता़राज्य शासनाने जुलै महिन्यात मराठा - मुस्लिम समाजाला नोकरी व शिक्षणामध्ये आरक्षण लागू केले होते़ मराठा समाजाला १६ टक्के तर मुस्लिम समाजाला ५ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय झाला होता़ मात्र, काहींनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या होत्या़ न्यायालयाने मराठा - मुस्लिम आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिली़ तर मुस्लिमांना शैक्षणिक आरक्षण ठेवण्याचे आदेशित केले आहे़ याच्या निषेधार्थ मराठा -मुस्लिम आरक्षण कृती समितीच्या वतीने सोमवारी जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती़ उस्मानाबाद शहरात या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला़ शहरातील व्यापाऱ्यांनी स्वत: दुकाने बंद ठेवून सहभाग नोंदविला होता़ तर कृती समितीच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले़ मराठा आरक्षण कृती समितीचे अध्यक्ष विजयकुमार पवार, माजी आमदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, डॉ़ चंद्रजित जाधव, मसुद शेख, समीयोद्दीन मशायक, धनंजय जाधव, संग्राम मुंडे, मुकुंद घाटगे, संतोष जाधव, इलियास पिरजादे, कादरखान पठाण, बिलाल तांबोळी, अयाज शेख, रवी निंबाळकर, भारत कोकाटे, बलराज रणदिवे, बालाजी साळुंके, बब्रुवान मादलापुरे, भारत इंगळे, सुरज साळुंके, अ‍ॅड़ संतोष शिंदे, मयुर काकडे, सुरेश बिराजदार आदी उपस्थित होते़ (प्रतिनिधी)