शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: आव्हाड-दानवे बोलत होते, रिपोर्टर रेकॉर्डिंग करत होता... आव्हाडांना राग आला... हात उचलला! बघा, काय घडलं!
2
१,२,३...२४ तासांत तीन मिसाईल टेस्ट! भारताची ऑपरेशन सिंदूरनंतर मोठी कामगिरी, लडाखमध्ये एक...
3
'लॅन्ड फॉर जॉब' घोटाळ्यात लालू यादव यांना मोठा धक्का! पण 'या' प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा
4
'...तेव्हा राज ठाकरे-उद्धव ठाकरेंना लोक आपटून आपटून मारतील'; भाजप खासदार निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
5
लेकीच्या जन्मानंतर दुसऱ्याच दिवशी गमावला दीड वर्षांचा मुलगा; कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर
6
"विधानभवनात आमदारांचे खून पडले तरी...", राज ठाकरे भडकले, महाराष्ट्रातील जनतेला संतप्त सवाल
7
विजेचा झटका दिला, गर्भपात करायला लावला; एका 'थार'साठी नवऱ्याने मनीषासोबत काय काय केलं? झाला मोठा खुलासा
8
पोस्ट ऑफिसच्या स्कीम्समध्ये महिलांना पुरुषांपेक्षा अधिक व्याज मिळतं का? चेक करा डिटेल्स
9
६ महिन्यात सोन्यात तब्बल २६% वाढ! आता अजून वाढणार? 'या' ५ मार्गांनी करू शकता गुंतवणूक
10
हृदयद्रावक! हिमाचल प्रदेशात निसर्ग कोपला, डोंगरावरून खाली आले दगड; आई-मुलाचा मृत्यू
11
आधी ९० तास काम करण्याचा दिलेला सल्ला; आता त्यांचाच पगार २५ कोटींनी वाढला, किती मिळणार पॅकेज
12
Cast Certificate: 'त्या' लोकांचे जातीचे प्रमाणपत्र रद्द होणार; विधान परिषदेत फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले...
13
पती निक जोनाससोबत प्रियांका चोप्राचं लिप-लॉक, समुद्रकिनाऱ्यावरच रोमँटिक झालं कपल; बघा लेटेस्ट VIDEO
14
नो फोटो प्लीज! सिद्धार्थ मल्होत्राची पापाराझींना विनंती; म्हणाला, "फक्त आशीर्वाद द्या..."
15
Mumbai: मालवणी परिसरातून अपहरण झालेल्या तीन मुलींची सुखरूप सुटका
16
'ही' आयटी कंपनी देणार २५०% लाभांश, तुमच्याकडे शेअर आहेत का? रेकॉर्ड डेट लगेच बघा!
17
५ वर्षांनंतर पाकिस्तानला यूके उड्डाणाची मुभा मिळाली! पण 'बनावट पायलट' घोटाळ्याचा शिक्का अजूनही कायम?
18
"नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे अभिनंदन...", विधानभवनात पडळकर-आव्हाडांचे कार्यकर्ते भिडल्यानंतर मराठी अभिनेत्याचा टोला
19
६ महिन्यांपूर्वी लग्न मोडलं, मुलीने दुसरीकडे स्थळ बघायला सुरुवात केली; रागाने तरुण ऑफिसमध्ये पोहोचला अन्...
20
Mumbai Chawl Collapsed: वांद्र्यात तीन मजली चाळ कोसळली, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले, बचावकार्य सुरू

जैन समाजातर्फे अभय महोत्सवाचे आयोजन

By admin | Updated: June 2, 2016 23:48 IST

औरंगाबाद : गुरू रामजन्म शताब्दी वर्षानिमित्त शहरात अभय महामहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

औरंगाबाद : गुरू रामजन्म शताब्दी वर्षानिमित्त शहरात अभय महामहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त गच्छाधिपती आचार्य विजय अभयदेव सुरिश्वरजी महाराज यांचे ५ जून रोजी शहरात आगमन होत आहे. १५ दिवसीय या महोत्सवात महाराजांचे प्रवचन, धार्मिक कार्यक्रम व आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना मदत करण्यात येणार आहे, अशी माहिती सकल जैन समाजाचे कार्याध्यक्ष व अभय महोत्सवाचे अध्यक्ष, आ.सुभाष झांबड यांनी दिली. यानिमित्ताने जोहरीवाडा येथे अरिहंत भवन येथे आयोजित पत्रपरिषदेत आ.झांबड यांनी सांगितले की, गुरू रामजन्म शताब्दी वर्षानिमित्त धर्मजागरण, विश्वशांती, संघशांती, मानवता धर्म संदेश समाजातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचविण्याच्या हेतूने अभय महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ५ जून रोजी सकाळी ६.३० वाजता आचार्य विजय अभयदेव सुरिश्वरजी महाराज यांचे आगमन होणार आहे. महावीर चौक येथील महावीर स्तंभ येथून स्वागतयात्रा निघणार आहे. कर्णपुरा येथील मुनिसुव्रत जैन मंदिर येथे स्वागतयात्रा पोहोचणार आहे. आचार्यश्रींसह पन्यास मोक्षरत्नविजयजी म. सा., साध्वी प्रज्ञाश्रीजी म. सा., पद्मरेखाश्रीजी म. सा. असे १७ साधू-साध्वींजी यांचे शहरात आगमन होत आहे. यानंतर प्रवचन व १० वाजता घंटाकर्ण महावीर पूजन करण्यात येणार आहे. ६ जून रोजी ज्येष्ठ मासानिमित्त महामांगलिकाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रारंभी सकाळी ६.३० वाजता मुनिसुव्रत जैन मंदिर येथे स्नात्र महोत्सव अनुष्ठान होणार आहे. सकल विश्वशांतीसाठी आचार्य विजय अभयदेव सुरिश्वरजी महाराज व पंन्यास मोक्षरत्नविजयजी म. सा. महामांगलिक देणार आहेत. यासाठी देश-विदेशातून दीड ते दोन हजार भाविक शहरात येणार आहेत. ८ जून रोजी जोहरीवाडा येथील गोडीजी पार्श्वनाथ जैन मंदिरात सकाळी आचार्यश्रींचे आगमन व प्रवचन होणार आहे. १० रोजी आचार्यश्रींच्या आचार्यपदाच्या ३२ वे वर्षप्रवेश व पंन्यासजी मोक्षरत्नजी म. सा. यांच्या पंन्यासपदनिमित्त महावीर भवन येथे सकल जैन महिला मंडळातर्फे मंगलगीताचा कार्यक्रम होईल. ११ रोजी जाधवमंडी येथील विमलनाथ जैन श्वेतांबर मंदिरात आचार्यश्रींचे प्रवचन होणार आहे. १२ रोजी पानदरिबा रोडवरील अग्रसेन भवन येथे सकाळी ९ वाजता आचार्यश्रींचे प्रवचन व आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदत केली जाईल. या कार्यक्रमांचे आयोजन आनंदजी- कल्याणजी जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्ट तसेच भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव समिती आणि सकल जैन समाजाच्या वतीने करण्यात आले आहे. पत्रपरिषदेत महावीर पाटणी, रतिलाल मुगदिया, संपतराज देवडा, कनकमल सुराणा, जव्हेरचंद डोसी, डॉ. प्रकाश झांबड, संजय संचेती उपस्थित होते.१४ रोजी आचार्यश्रींचे सिडको एन-३ येथील शंखेश्वर पार्श्वनाथ जैन जिनालयात आगमन होत आहे. केशरबाग मंगल कार्यालय येथे मांगलिक प्रवचन होणार आहे. १६ जूनपर्यंत आचार्यश्रींचे प्रवचन केशरबाग मंगल कार्यालयातच होणार आहे. १७ रोजी उल्कानगरीतील वर्धमान रेसिडेन्सी येथील संभवनाथ जैन मंदिर येथे प्रवचन होणार आहे. १८ रोजी आचार्यश्रींचे पुणे येथील चातुर्मासाकरिता तीसगावकडे प्रस्थान होणार आहे.