शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Chawl Collapsed: वांद्र्यात तीन मजली चाळ कोसळली, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले, बचावकार्य सुरू
2
Mumbai: मालवणी परिसरातून अपहरण झालेल्या तीन मुलींची सुखरूप सुटका
3
Share Market Today: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी घसरण
4
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
5
तुमची मुलगी बनेल लखपती; महिन्याला वाचवा १००० रुपये, २१ व्या वर्षी मिळतील ₹५.५ लाख
6
Padalkar Awhad: विधान भवनात देशमुखांना मारहाण, पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले कोण?
7
दूध गरम करताना सिलेंडर फुटला, २० घरांची राखरांगोळी; महिलेचा होरपळून मृत्यू
8
पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकेने ‘TRF’बद्दल घेतला मोठा निर्णय; पाकिस्तानच्या कुरापतींना चाप बसणार!
9
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
10
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
11
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
12
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
13
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
14
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
15
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
16
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
17
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
18
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
19
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
20
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय

औरंगाबादेत वेतनवाढ रोखण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 00:17 IST

शहरी भागातील शाळांमध्ये राबविण्यात येणाºया धान्यादी मालांच्या खरेदीची पडताळणी करण्याच्या सूचना दिल्यानंतरही त्याकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे आर्दड यांनी शालेय पोषण विभागाचे सर्व तालुका अधीक्षक, गटशिक्षणाधिकारी, कर्मचाºयांच्या एक वर्षाची वेतनवाढ रोखण्याचे आदेश दिले आहेत.

ठळक मुद्देकर्तव्यात कसूर : शालेय पोषण आहाराच्या धान्यादी मालाची खरेदी

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरी भागातील शाळांमध्ये राबविण्यात येणाºया धान्यादी मालांच्या खरेदीची पडताळणी करण्याच्या सूचना दिल्यानंतरही त्याकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे आर्दड यांनी शालेय पोषण विभागाचे सर्व तालुका अधीक्षक, गटशिक्षणाधिकारी, कर्मचाºयांच्या एक वर्षाची वेतनवाढ रोखण्याचे आदेश दिले आहेत.जून, जुलै व आॅगस्ट या तीन महिन्यांचे धान्यादी मालाचे २ कोटी ७३ लाख रुपयांचे बिल अदा करण्यासाठी आॅक्टोबर महिन्यात संचिका सादर करण्यात आली होती. ही बिले प्रामुख्याने महापालिका व नगरपालिका कार्यक्षेत्रातील शाळांची आहेत. तथापि, आॅक्टोबर महिन्यात मुख्य कार्यकारी अधिकारी आर्दड यांनी सदरील धान्यादी माल खरेदीची पडताळणी कोण करते, पडताळणी केली असल्यास त्यामध्ये कोणत्या त्रुटी निघाल्या त्या कळविणे, अशा सूचना देऊन बिलांची संचिका परत केली होती. त्यानंतर ते मसुरी येथे एक महिन्याच्या प्रशिक्षणासाठी गेले. तेथून परत आल्यानंतर शिक्षण विभागामार्फत पुन्हा ती संचिका आर्दड यांच्यासमोर सादर झाली. तेव्हा शिक्षणाधिकारी अश्विनी लाठकर यांनी त्या संचिकेद्वारे खुलासा केला की, शहरी भागात धान्यादी मालाची खरेदी ही शाळास्तरावरच केली जाते. त्याची पडताळणी ही मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समितीकडून केली जाते. खाजगी अनुदानित शाळा असतील, तर तिथे संबंधित संस्थाचालक अथवा बचत गटांकडून केली जाते.शिक्षणाधिकारी लाठकर यांनी दुसºयांदा आर्दड यांच्यासमोर ही संचिका सादर करताना त्यात नमूद केले की, शालेय पोषण आहार विभागाचे तालुका अधीक्षक हे खातरजमा करूनच धान्यादी मालाची बिले सादर करीत असतात. संचिकेसोबत प्रत्यक्ष माल खरेदीच्या पावत्याही जोडलेल्या असतात. शिक्षणाधिकाºयांचा हा अभिप्राय वाचून मुख्य कार्यकारी अधिकारी आर्दड हे संतप्त झाले. त्यांनी तुमच्या जबाबदारीवर सदरील बिले अदा करावीत, असे नमूद करून ती संचिका परत करत शिक्षणाधिकारी लाठकर यांच्यावर ताशेरे ओढले.शिक्षण संस्थाचालक संघटनेचा आग्रह४यासंदर्भात शिक्षण संस्थाचालक संघटनेचे एस. पी. जवळकर, मिर्झा सलीम बेग, प्रा. शेख मन्सूर, यशवंत पवार यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी आर्दड यांची गुरुवारी सायंकाळी भेट घेतली. मागील आठ महिन्यांपासून धान्यादी मालाचे बिल अदा न केल्यामुळे खिचडी शिजविणारे बचत गट अडचणीत आले आहेत. बचत गटांमध्ये सामान्य कुटुंबातील महिला कार्यरत आहेत. त्यांना वेळेवर पैसे मिळाले नाही, तर त्या खिचडी शिजविण्याचे काम करू शकत नाही. त्यामुळे लवकरात लवकर धान्यादी मालाचे बिल निकाली काढण्यात यावे. यासंदर्भात मुख्याध्यापक संघानेही आर्दड यांची भेट घेऊन हीच मागणी केली होती.