शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

औरंगाबादेत वेतनवाढ रोखण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 00:17 IST

शहरी भागातील शाळांमध्ये राबविण्यात येणाºया धान्यादी मालांच्या खरेदीची पडताळणी करण्याच्या सूचना दिल्यानंतरही त्याकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे आर्दड यांनी शालेय पोषण विभागाचे सर्व तालुका अधीक्षक, गटशिक्षणाधिकारी, कर्मचाºयांच्या एक वर्षाची वेतनवाढ रोखण्याचे आदेश दिले आहेत.

ठळक मुद्देकर्तव्यात कसूर : शालेय पोषण आहाराच्या धान्यादी मालाची खरेदी

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरी भागातील शाळांमध्ये राबविण्यात येणाºया धान्यादी मालांच्या खरेदीची पडताळणी करण्याच्या सूचना दिल्यानंतरही त्याकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे आर्दड यांनी शालेय पोषण विभागाचे सर्व तालुका अधीक्षक, गटशिक्षणाधिकारी, कर्मचाºयांच्या एक वर्षाची वेतनवाढ रोखण्याचे आदेश दिले आहेत.जून, जुलै व आॅगस्ट या तीन महिन्यांचे धान्यादी मालाचे २ कोटी ७३ लाख रुपयांचे बिल अदा करण्यासाठी आॅक्टोबर महिन्यात संचिका सादर करण्यात आली होती. ही बिले प्रामुख्याने महापालिका व नगरपालिका कार्यक्षेत्रातील शाळांची आहेत. तथापि, आॅक्टोबर महिन्यात मुख्य कार्यकारी अधिकारी आर्दड यांनी सदरील धान्यादी माल खरेदीची पडताळणी कोण करते, पडताळणी केली असल्यास त्यामध्ये कोणत्या त्रुटी निघाल्या त्या कळविणे, अशा सूचना देऊन बिलांची संचिका परत केली होती. त्यानंतर ते मसुरी येथे एक महिन्याच्या प्रशिक्षणासाठी गेले. तेथून परत आल्यानंतर शिक्षण विभागामार्फत पुन्हा ती संचिका आर्दड यांच्यासमोर सादर झाली. तेव्हा शिक्षणाधिकारी अश्विनी लाठकर यांनी त्या संचिकेद्वारे खुलासा केला की, शहरी भागात धान्यादी मालाची खरेदी ही शाळास्तरावरच केली जाते. त्याची पडताळणी ही मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समितीकडून केली जाते. खाजगी अनुदानित शाळा असतील, तर तिथे संबंधित संस्थाचालक अथवा बचत गटांकडून केली जाते.शिक्षणाधिकारी लाठकर यांनी दुसºयांदा आर्दड यांच्यासमोर ही संचिका सादर करताना त्यात नमूद केले की, शालेय पोषण आहार विभागाचे तालुका अधीक्षक हे खातरजमा करूनच धान्यादी मालाची बिले सादर करीत असतात. संचिकेसोबत प्रत्यक्ष माल खरेदीच्या पावत्याही जोडलेल्या असतात. शिक्षणाधिकाºयांचा हा अभिप्राय वाचून मुख्य कार्यकारी अधिकारी आर्दड हे संतप्त झाले. त्यांनी तुमच्या जबाबदारीवर सदरील बिले अदा करावीत, असे नमूद करून ती संचिका परत करत शिक्षणाधिकारी लाठकर यांच्यावर ताशेरे ओढले.शिक्षण संस्थाचालक संघटनेचा आग्रह४यासंदर्भात शिक्षण संस्थाचालक संघटनेचे एस. पी. जवळकर, मिर्झा सलीम बेग, प्रा. शेख मन्सूर, यशवंत पवार यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी आर्दड यांची गुरुवारी सायंकाळी भेट घेतली. मागील आठ महिन्यांपासून धान्यादी मालाचे बिल अदा न केल्यामुळे खिचडी शिजविणारे बचत गट अडचणीत आले आहेत. बचत गटांमध्ये सामान्य कुटुंबातील महिला कार्यरत आहेत. त्यांना वेळेवर पैसे मिळाले नाही, तर त्या खिचडी शिजविण्याचे काम करू शकत नाही. त्यामुळे लवकरात लवकर धान्यादी मालाचे बिल निकाली काढण्यात यावे. यासंदर्भात मुख्याध्यापक संघानेही आर्दड यांची भेट घेऊन हीच मागणी केली होती.