शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

राज्यमंत्र्यांना बाजू मांडण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2017 00:10 IST

अंबड : जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांनी अपात्र ठरवलेल्या भाजपाच्या दोन नगरसेविकांविषयी दहा आठवड्यांत अंतिम निर्णय देण्याचे आदेश खंठपीठाने नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांना दिले

लोकमत न्यूज नेटवर्क अंबड : जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांनी अपात्र ठरवलेल्या भाजपाच्या दोन नगरसेविकांविषयी दहा आठवड्यांत अंतिम निर्णय देण्याचे आदेश उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंठपीठाने नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांना दिले. तक्रारकर्र्त्यांना शुक्रवारी न्यायालयाच्या आदेशाची प्रत मिळाली. आता राज्यमंत्री अपात्र नगरसेविकांबाबत काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शहरातील भाजपच्या नगरसेविका अन्साबाई तात्याबा बाबर, मुक्ता विष्णू पुंड यांचे सदस्यत्त्व रद्द करण्याची मागणी राष्ट्रवादीच्या प्रभावती सुभाष कुरेवाड व सावित्री सुरेश गुडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. दोन्ही तक्रारींविषयी जिल्हाधिकारी जोंधळे यांच्यासमोर सुनावणी झाल्यानंतर २ जून रोजी अन्साबाई बाबर व मुक्ता पुंड यांना अपात्र ठरविले. दरम्यान, सात जून रोजी तक्रारदार प्रभावती कुरेवाड व सावित्री गुडे यांनी मंत्रालयात कॅव्हेट दाखल करुन या प्रकरणी आमची बाजू ऐकल्याशिवाय कोणताही निर्णय देण्यात येऊ नये, अशी विनंती केली. अपात्र ठरविण्यात आलेल्या बाबर व पुंड या नगरसेविकांनी १२ जून रोजी नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्याकडे जिल्हाधिकाऱ्यांच्या निकालाविरुध्द अपील केले. त्यानंतर नगरविकास राज्यमंत्री पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या अपात्रतेच्या आदेशाला तात्पुरती स्थगिती देण्याचे आदेश दिले. प्रभावती कुरेवाड व सावित्री गुडे यांनी राज्यमंत्र्यांनी दिलेली स्थगिती बेकायदेशीर असल्याची याचिका उच्च न्यायालयात दाखल केली. याचिकेत बाबर व पुंड या दोन सदस्यांबरोबर राज्यमंत्री पाटील, नगरविकास खात्याचे सचिव व जिल्हाधिकाऱ्यांना प्रतिवादी करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांनी भाजपच्या दोन नगरसेविकांना अपात्र ठरविण्याचा निकाल दिल्यानंतर याविषयी आम्ही मंत्रालयात कॅव्हेट दाखल केले होते. कॅव्हेट दाखल केलेले असल्यामुळे नगरविकास राज्यमंत्री डॉ पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या अपात्रतेच्या आदेशला स्थगिती देण्यापूर्वी आमची बाजू ऐकून घेणे आवश्यक होते. राज्यमंत्र्यांनी स्थगितीचा निकाल देताना कोणतेही कारण दिलेले नाही. तक्रारकर्ते म्हणून आम्हाला बाजू मांडण्याची संधी देणे गरजेचे होते. या सर्व बाबींचा विचार करता राज्यमंत्र्यांचा स्थगितीचा निकाल बेकायदेशीर असल्याचा युक्तिवाद तक्रारकर्त्यांचे वकील अ‍ॅड. संभाजी टोपे यांनी न्यायालयात केला.