शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! कोट्यवधींचे महाघोटाळे, बोगस भरतीही; शनि शिंगणापूर मंदिर ट्रस्ट बरखास्त
2
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - १२ जुलै २०२५; नशिबाची उत्तम साथ; यश व कीर्ती लाभेल, आनंदवार्ता मिळेल
3
शिंदेसेना वादात, विरोधकांना संधी; आमदारांच्या व्हायरल व्हिडिओमुळे एकनाथ शिंदेंची पंचाईत
4
होमिओपॅथीची नोंद एमएमसीमध्ये करायची की नाही?; तज्ज्ञ समिती करणार अभ्यास
5
बीकेसी ते शिळफाट्यादरम्यान बुलेट ट्रेनसाठीचा बोगदा पूर्ण; प्रकल्पाला मिळणार गती
6
अखेर ६ दिवसांनी बोया सापडला पण सर्च ऑपरेशनमध्ये आढळल्या ९२४ बेकायदा मच्छीमार बोटी
7
कुजबुज! उपमुख्यमंत्र्यांच्या कपाटात दडलं काय?; आमदारांचे PA, कार्यकर्त्यांचे लक्ष वेधले
8
कॅनडावरील टॅरिफ वाढवून केला ३५%; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
9
मतदार याद्यातील घोळ, घुसखोरी आणि गोंधळ; घोळ निस्तरणे निवडणूक आयोगाला शक्य होत नाही
10
...तर गो बॅक टू द थर्ड वर्ल्ड; न्यू यॉर्कमध्ये हाताने बिर्याणी खाल्ली, काय बिघडले?
11
फास्टॅग नीट न लावल्यास चालक ब्लॅकलिस्टमध्ये; तुम्हीही वाहन चालवताना करता का 'ही' चूक?
12
Video : शिवाजीनगर येथे पीएमटी बसला आग;नागरिकांच्या तत्परतेने टळली जीवितहानी
13
Wimbledon 2025: अल्काराझनं सलग तिसऱ्यांदा गाठली फायनल! नदालनंतर अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा
14
दोन भिन्न वंशावळी न्यायालयात का सादर केल्या गेल्या? सात्यकी सावरकर यांनी याचा खुलासा करावा
15
नवऱ्याने रागाच्या भरात बायकोच्या नाकाचा घेतला चावा, झाले दोन तुकडे... नेमकं घडलं तरी काय?
16
"जनसुरक्षा विधेयका'चं नाव 'भाजप सुरक्षा विधेयक' करायला हवं"; मिसा, टाडाचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
17
"नोटांनी भरलेली बॅग मी आल्याबरोबर कपाटात..."; खळबळ उडवणाऱ्या व्हिडीओवर संजय शिरसाटांनी सोडलं मौन
18
Video: तुफान राडा ! आधी 'कॅप्टन' गिल पंचांशी भांडला, मग सिराजचाही पारा चढला, काय घडलं?
19
“नव्या कायद्याची गरज का? जनतेच्या मनातील संभ्रम...”; जनसुरक्षा विधेयकाला काँग्रेसचा विरोध
20
“आम्ही राज्यपालांना जनसुरक्षा विधेयक मंजूर करू नये ही विनंती करणार”; ठाकरे गटाचा निर्धार

‘नांमका’त पाणी सोडण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 01:14 IST

वैजापूर : नांदूर-मधमेश्वर जलद कालवा लाभक्षेत्रातील वैजापूर, गंगापूर आणि कोपरगाव तालुक्यात खरीप सिंचनासाठी दीड टीएमसी पाणी आवर्तन सोडण्याचा निर्णय घेण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कवैजापूर : तब्बल एक महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने खरीप क्षेत्र संकटात आले आहे. त्यामुळे कालव्यात पाणी सोडण्यासाठी लोकप्रतिनिधींसह शेतकऱ्यांचा पंधरा दिवसांपासून संघर्ष सुरु होता. अखेर नांदूर-मधमेश्वर जलद कालवा लाभक्षेत्रातील वैजापूर, गंगापूर आणि कोपरगाव तालुक्यात खरीप सिंचनासाठी दीड टीएमसी पाणी आवर्तन सोडण्याचा निर्णय पाटबंधारे अधिकाऱ्यांच्या मंत्रालयात बुधवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला.गुरूवारी सकाळी सात वाजता कालव्यात ‘टेल टू हेड’ या धोरणानुसार पाणी आवर्तन तिन्ही तालुक्यांसाठी सोडण्यात आले.नाशिक पाटबंधारे विभागाने कालव्यात ‘ओव्हरफ्लो’ चे पाणी सोडण्यास विरोध दर्शविल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली होती. काही शेतकऱ्यांनी थेट नाशिक येथे जाऊन पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांची भेट घेऊन पाणी सोडण्याची मागणी केली. तसेच तालुक्यातील २९ ग्रामसभेचे ठराव शेतकऱ्यांनी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांच्याकडे दिले होते. त्यानुसार औरंगाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांनीही पाटबंधारे विभागाच्या सचिवांना पत्र पाठवून पाणी सोडण्याबाबत कळवले होते. शेतकऱ्यांमधील संतापाची भावना लक्षात घेऊन नांदूर -मधमेश्वर कालवा विभागानेही पाणी सोडण्याबाबत प्रस्ताव पाठवला होता. त्यामुळे कालव्यातून पाणी कधी सोडले जाणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले होते. मंत्रालयात बुधवारी वैजापूर येथील नांदूर-मधमेश्वर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता पी. ए. पाटील, उपअभियंता प्रशांत वनगुजरे व अभियंता युसूफ पठाण यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे सचिव डॉ. निशिकांत देशपांडे यांची भेट घेऊन तालुक्यातील खरीप क्षेत्राच्या बिकट परिस्थितीबाबत लक्ष देऊन कालव्यात पाणी सोडण्याची मागणी केली. त्यामुळे सचिव देशपांडे यांनी गुरुवारपासून वैजापूर, गंगापूर व कोपरगाव तालुक्यासाठी दीड टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश नाशिक पाटबंधारे विभागाला दिले. सध्या नाशिक जिल्ह्यातील मुकणे धरणात (२८.७५) टक्के पाणी साठा आहे. भावली धरणात (९६.५७) टक्के व वाकी धरणात (२४.८८) टक्के पाणी आहे. या तिन्ही धरणातून गुरुवारी सकाळी सात वाजता ३०० ते ७५० क्युसेक्सने पाणी सोडण्यात आले आहे. हे पाणी जलदगती कालव्यातून पाणी सोडण्यात आले असून साधारणपणे वीस दिवसांच्या आवर्तनातून दीड टीएमसी पाणी तिन्ही तालुक्यांना मिळणार आहे.