शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’साठी अजित पवार यांनी आभाळातून पैसे आणायचे का? मंत्री मुश्रीफ यांचा टोला
2
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
3
लक्षात ठेवा, नापास झाल्याने आयुष्य संपत नाही ! सचिन तेंडुलकर, नागराज मंजुळे झाले होते नापास
4
Sensex २९५ आणि Nifty ११४ अंकांच्या तेजीसह बंद; 'या' शेअर्समध्ये मोठा चढ-उतार
5
रशियाचा भारताला पाठिंबा! 'पहलगामच्या गुन्हेगारांना सोडता कामा नये'; पुतिन यांचा पीएम मोदींना फोन
6
मोदी सरकार देतंय ₹५ लाख लिमिट असलेलं क्रेडिट कार्ड; कसा मिळेल फायदा, जाणून घ्या
7
"ऋषभ पंतला पुन्हा फॉर्मात यायचे असेल तर त्याने धोनीला फोन करावा"; दिग्गज फलंदाजाचा सल्ला
8
Nashik Crime: तिन्ही कोयत्यांवर जाधव बंधूंच्या रक्ताचे डाग आहेत तसेच; महाजनच्या घरात सापडली शस्त्रे
9
Ather Energy IPO चं अलॉटमेंट 'असं' करा चेक, ग्रे मार्केट प्रीमिअम काय देतोय संकेत?
10
POK नाही तर 'लाहोर'वरही भारताचा ताबा होता; UNSC च्या मध्यस्थीनं कसा वाचला पाकिस्तान?
11
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
12
Mumbai: केतकीपाडा, फिल्मसिटी, दामूनगर येथील झोपड्यांवरील कारवाईला आठ दिवसांची मुदतवाढ
13
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...
14
शाब्बास पोरी! ३ वेळा नापास होऊनही मानली नाही हार, मजुराची लेक झाली IAS अधिकारी
15
PF Account मधून किती रक्कम तुम्ही काढू शकता? काय आहेत नियम आणि अटी
16
परीक्षेत नापास, आयुष्यात पास! दहावीत मुलगा ६ विषयांत झाला फेल तरी पालकांनी कापला केक, कारण...
17
गायीच्या शेणापासून बनवलेल्या रंगानेच सरकारी कार्यालये रंगवा; CM योगी आदित्यनाथ यांचे आदेश 
18
खळबळजनक! मनाविरुद्ध लग्न होताच काढला पतीचा काटा; बॉयफ्रेंडसह ७ जणांना अटक
19
'गँग्ज ऑफ वासेपूर', 'दबंग' फेम प्रसिद्ध कलाकाराचं दुःखद निधन, बॉलिवूडवर पसरली शोककळा
20
"पाकिस्तानी आर्मी तिथल्या तरुणांना आवडत नाही", बॉलिवूड सिंगरचा दावा, म्हणाला- "ते म्हणाले की तुम्ही भाग्यवान..."

...अन् विद्यार्थी, शिक्षक बालंबाल बचावले

By admin | Updated: June 24, 2017 00:35 IST

दुधड : वादळी वाऱ्यामुळे दुधड येथील जिल्हा परिषद शाळेवरील पत्रे उडाल्यामुळे मोठे नुकसान झाल्याची घटना गुरुवारी (दि.२२) दुपारी ४ वाजता घडली

लोकमत न्यूज नेटवर्कदुधड : वादळी वाऱ्यामुळे दुधड येथील जिल्हा परिषद शाळेवरील पत्रे उडाल्यामुळे मोठे नुकसान झाल्याची घटना गुरुवारी (दि.२२) दुपारी ४ वाजता घडली. सुदैवाने पत्रे उडालेतेव्हा शाळा सुटली होती. नसता अनर्थ घडला असता. या घटनेनंतर शालेय समितीने शुक्रवारी (दि.२३) शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.याबाबत अधिक महिती अशी की, दुधड येथील जि.प. शाळेत १ ली ते ८ वी वर्ग आहेत. गुरुवारी नेहमीप्रमाणे शाळा भरली होती. दुपारी ४ वाजता शाळा सुटल्यानंतर सर्व विद्यार्थी, तसेच शिक्षक आपापल्या घरी रवाना झाले. दरम्यान, याच वेळी आलेल्या जोरदार वादळामुळे येथील जि.प. शाळेच्या तीन खोल्यांवरील पत्रे उडाले. त्यामुळे शाळेच्या भिंती, पत्रे, विद्युत वायर, फॅन, शालेय साहित्य याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नागरिकांनी सांगितले की, ही घटना जर १० ते १५ मिनिटे आधी झाली असती तर विद्यार्थ्यांसह शिक्षकांना मोठी इजा झाली असती; मात्र सुदैवाने शाळा सुटल्यानंतर सदर घटना घडल्यामुळे अनेक पालकांसह शिक्षकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. गुरुवारी झालेल्या या घटनेमुळे शिक्षकांसह, पालक, विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे शालेय व्यवस्थापन समितीने शुक्रवारी (दि.२३) शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.विशेष म्हणजे गत आठवड्यातही वादळी वाऱ्यामुळे शाळेच्या पाच वर्गखोल्यांवरील पत्रे उडाले होते. यानंतर मुख्याध्यापक व शालेय समितीने उडालेले पत्रे दुरुस्त करून घेतले होते; मात्र गुरुवारी मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वादळाच्या भीतीने विद्यार्थी शाळेत जाण्यास तयार नसल्याने शुक्र वारी शाळा बंद होती. दरम्यान, शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष पांडुरंग चौधरी यांनी सांगितले की, एकाच आठवड्यात दोनदा शाळेचे पत्रे उडाल्यामुळे विद्यार्थ्यांत भीतीचे वातावरण पसरले असून, विद्यार्थी शाळेत येण्यास तयार नाहीत. मागील आठवड्यात उडालेल्या पत्राच्या खोलीचा पंचनामा केलेला आहे; परंतु अद्यापही कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही.