शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी विरोधकांचा आज यल्गार..!

By admin | Updated: April 2, 2017 00:15 IST

उस्मानाबाद :संघर्षयात्रा रविवारी उस्मानाबादेत दाखल होत आहे. यानिमित्त सभेचेही आयोजन करण्यात आले आहे.

उस्मानाबाद : जिल्ह्याने मागील तीन ते चार वर्षात भीषण दुष्काळी परिस्थिती अनुभवली. या संकटामुळे शेती व्यवसाय अक्षरश: मोडून पडला. शेतकरी कर्जबाजारी झाला. कर्जाचा डोंगर असह्य होत असल्याने जगाचा पोशिंंदा असलेला बळीराजा मृत्यूला जवळ करु लागला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे, या प्रमुख मागणीसाठी विरोधकांच्या वतीने संघर्षयात्रा काढण्यात आली आहे. ही संघर्षयात्रा रविवारी उस्मानाबादेत दाखल होत आहे. यानिमित्त सभेचेही आयोजन करण्यात आले आहे.कधी गारपीट तर कधी भीषण दुष्काळ यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. अशा संकटामुळे शेती व्यवसाय आतबट्याचा ठरत आहे. परिणामी कर्जाचा डोंगर वाढत असल्याने शेतकरी आपली जीवनयात्रा संपवित आहेत. आजवर जिल्हाभरातील थोडेथोडक्या नव्हे तर तब्बल ४३७ शेतकऱ्यांनी मृत्यूला जवळ केले. लोकसंख्येच्या दृष्टीकोनातून आत्महत्येचे प्रमाण विचारात घेता, सर्वाधिक आत्महत्या या उस्मानाबाद जिल्ह्यात झाल्या आहेत. दोन वर्षापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्हा दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सुमारे साडेपाचशे कोटीच्या पॅकेजची घोषणा केली होती. परंतु अद्यापही पॅकेजची अपेक्षित अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे आत्महत्यांचे सत्र काही थांबण्याचे नाव घेत नाही. राष्ट्रवादी काँगे्रसच्या वतीने जिल्ह्यातील अधिकांश आत्महत्याग्रस्त शेतकरी कुंटुंबाच्या भेटी घेवून परिस्थिती जाणून घेतली असता, जवळपास सर्वच आत्महत्या या आर्थिक अडचण आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून झाल्याचे समोर आले आहे. आत्महत्यांची संख्या लक्षात घेता शासनाने शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कर्जाचा डोंगर दूर करण्याची गरज आहे. याच प्रमुख मागणीसाठी विरोधकांच्या वतीने २९ मार्चपासून चंद्रपूर येथून संघर्षयात्रा काढण्यात आली आहे. ही संघर्षयात्रा रविवारी उस्मानाबाद तालुक्यातील बेंबळी येथे सकाळी ११ वाजता दाखल होर्ईल. याठिकाणी शेतकऱ्यांच्या वतीने संघर्षयात्रेचे स्वागत केले जाईल. त्यानंतर सकाळी ११.३० वाजता छायादीप मंगल कार्यालय येथे संघर्षयात्रेतील नेते सभेच्या माध्यूमातून शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. या सभेला शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन राकाँ जिल्हाध्यक्ष आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे. (प्रतिनिधी)