शहरं
Join us  
Trending Stories
1
Donald Trump Tariffs: 'चीनवरील टॅरिफ कमी करण्यास तयार, कारण...'; डोनाल्ड ट्रम्प यांची अचानक नरमाईची भूमिका
2
Video: चीनी फॅक्टरीत रोबोट अचानक झाला हिंसक; कर्मचाऱ्यांवर केला जीवघेणा हल्ला, मग...
3
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
4
अनैतिक संबंधातून वाद, जळगावात भररस्त्यात घडला थरार; पाठलाग करत युवकाला कायमचं संपवलं
5
...म्हणून बाबिलने अर्जुन कपूर, अनन्या पांडेचं नाव घेतलं; अभिनेत्याच्या 'त्या' व्हिडिओनंतर टीमकडून स्पष्टीकरण
6
दूत पाठवले म्हणून अजितदादांची शिंदेंवर नाराजी, पुढे काय?
7
India Pakistan: युद्धाचे ढग गडद होताच मध्यस्थीसाठी मुस्लिम देश आला पुढे, 'हा' नेता येणार भारत दौऱ्यावर
8
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
9
जातीनिहाय जनगणनेची फार वर्षे वाट पाहिली, अखेर निर्णय झाला!
10
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: या व्यक्तींची लग्न जुळू शकतात; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
11
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
12
संपादकीय: ...शिक्षा शेतकरी भावाला! घोटाळा सरकारनेच मान्य केला हे बरे झाले...
13
छोटा दत्तू आला! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता झाला बाबा, लग्नानंतर २ वर्षांनी दिली गुडन्यूज
14
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
15
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
16
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
17
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
18
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
19
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
20
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी विरोधकांचा आज यल्गार..!

By admin | Updated: April 2, 2017 00:15 IST

उस्मानाबाद :संघर्षयात्रा रविवारी उस्मानाबादेत दाखल होत आहे. यानिमित्त सभेचेही आयोजन करण्यात आले आहे.

उस्मानाबाद : जिल्ह्याने मागील तीन ते चार वर्षात भीषण दुष्काळी परिस्थिती अनुभवली. या संकटामुळे शेती व्यवसाय अक्षरश: मोडून पडला. शेतकरी कर्जबाजारी झाला. कर्जाचा डोंगर असह्य होत असल्याने जगाचा पोशिंंदा असलेला बळीराजा मृत्यूला जवळ करु लागला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे, या प्रमुख मागणीसाठी विरोधकांच्या वतीने संघर्षयात्रा काढण्यात आली आहे. ही संघर्षयात्रा रविवारी उस्मानाबादेत दाखल होत आहे. यानिमित्त सभेचेही आयोजन करण्यात आले आहे.कधी गारपीट तर कधी भीषण दुष्काळ यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. अशा संकटामुळे शेती व्यवसाय आतबट्याचा ठरत आहे. परिणामी कर्जाचा डोंगर वाढत असल्याने शेतकरी आपली जीवनयात्रा संपवित आहेत. आजवर जिल्हाभरातील थोडेथोडक्या नव्हे तर तब्बल ४३७ शेतकऱ्यांनी मृत्यूला जवळ केले. लोकसंख्येच्या दृष्टीकोनातून आत्महत्येचे प्रमाण विचारात घेता, सर्वाधिक आत्महत्या या उस्मानाबाद जिल्ह्यात झाल्या आहेत. दोन वर्षापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्हा दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सुमारे साडेपाचशे कोटीच्या पॅकेजची घोषणा केली होती. परंतु अद्यापही पॅकेजची अपेक्षित अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे आत्महत्यांचे सत्र काही थांबण्याचे नाव घेत नाही. राष्ट्रवादी काँगे्रसच्या वतीने जिल्ह्यातील अधिकांश आत्महत्याग्रस्त शेतकरी कुंटुंबाच्या भेटी घेवून परिस्थिती जाणून घेतली असता, जवळपास सर्वच आत्महत्या या आर्थिक अडचण आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून झाल्याचे समोर आले आहे. आत्महत्यांची संख्या लक्षात घेता शासनाने शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कर्जाचा डोंगर दूर करण्याची गरज आहे. याच प्रमुख मागणीसाठी विरोधकांच्या वतीने २९ मार्चपासून चंद्रपूर येथून संघर्षयात्रा काढण्यात आली आहे. ही संघर्षयात्रा रविवारी उस्मानाबाद तालुक्यातील बेंबळी येथे सकाळी ११ वाजता दाखल होर्ईल. याठिकाणी शेतकऱ्यांच्या वतीने संघर्षयात्रेचे स्वागत केले जाईल. त्यानंतर सकाळी ११.३० वाजता छायादीप मंगल कार्यालय येथे संघर्षयात्रेतील नेते सभेच्या माध्यूमातून शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. या सभेला शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन राकाँ जिल्हाध्यक्ष आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे. (प्रतिनिधी)