शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
3
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
5
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
6
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
7
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
8
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
9
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
10
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
11
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
12
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
13
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
14
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
15
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
16
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
17
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
19
आता लोकलच्या दारात लटकता येणार नाही; प्रयोग सुरु, कारण...
20
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी विरोधकांचा आज यल्गार..!

By admin | Updated: April 2, 2017 00:15 IST

उस्मानाबाद :संघर्षयात्रा रविवारी उस्मानाबादेत दाखल होत आहे. यानिमित्त सभेचेही आयोजन करण्यात आले आहे.

उस्मानाबाद : जिल्ह्याने मागील तीन ते चार वर्षात भीषण दुष्काळी परिस्थिती अनुभवली. या संकटामुळे शेती व्यवसाय अक्षरश: मोडून पडला. शेतकरी कर्जबाजारी झाला. कर्जाचा डोंगर असह्य होत असल्याने जगाचा पोशिंंदा असलेला बळीराजा मृत्यूला जवळ करु लागला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे, या प्रमुख मागणीसाठी विरोधकांच्या वतीने संघर्षयात्रा काढण्यात आली आहे. ही संघर्षयात्रा रविवारी उस्मानाबादेत दाखल होत आहे. यानिमित्त सभेचेही आयोजन करण्यात आले आहे.कधी गारपीट तर कधी भीषण दुष्काळ यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. अशा संकटामुळे शेती व्यवसाय आतबट्याचा ठरत आहे. परिणामी कर्जाचा डोंगर वाढत असल्याने शेतकरी आपली जीवनयात्रा संपवित आहेत. आजवर जिल्हाभरातील थोडेथोडक्या नव्हे तर तब्बल ४३७ शेतकऱ्यांनी मृत्यूला जवळ केले. लोकसंख्येच्या दृष्टीकोनातून आत्महत्येचे प्रमाण विचारात घेता, सर्वाधिक आत्महत्या या उस्मानाबाद जिल्ह्यात झाल्या आहेत. दोन वर्षापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्हा दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सुमारे साडेपाचशे कोटीच्या पॅकेजची घोषणा केली होती. परंतु अद्यापही पॅकेजची अपेक्षित अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे आत्महत्यांचे सत्र काही थांबण्याचे नाव घेत नाही. राष्ट्रवादी काँगे्रसच्या वतीने जिल्ह्यातील अधिकांश आत्महत्याग्रस्त शेतकरी कुंटुंबाच्या भेटी घेवून परिस्थिती जाणून घेतली असता, जवळपास सर्वच आत्महत्या या आर्थिक अडचण आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून झाल्याचे समोर आले आहे. आत्महत्यांची संख्या लक्षात घेता शासनाने शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कर्जाचा डोंगर दूर करण्याची गरज आहे. याच प्रमुख मागणीसाठी विरोधकांच्या वतीने २९ मार्चपासून चंद्रपूर येथून संघर्षयात्रा काढण्यात आली आहे. ही संघर्षयात्रा रविवारी उस्मानाबाद तालुक्यातील बेंबळी येथे सकाळी ११ वाजता दाखल होर्ईल. याठिकाणी शेतकऱ्यांच्या वतीने संघर्षयात्रेचे स्वागत केले जाईल. त्यानंतर सकाळी ११.३० वाजता छायादीप मंगल कार्यालय येथे संघर्षयात्रेतील नेते सभेच्या माध्यूमातून शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. या सभेला शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन राकाँ जिल्हाध्यक्ष आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे. (प्रतिनिधी)