शहरं
Join us  
Trending Stories
1
कारमध्ये बसून आमदार मोजत होता रोकड; ACB च्या पथकानं रंगेहाथ पकडले, काय आहे प्रकरण?
2
Maharashtra HSC Result 2025: कोकण पुन्हा नंबर 'वन'! बारावीचा निकाल जाहीर; मुलींचीच बाजी, जाणून घ्या निकाल
3
विश्वास बसला नसता...! युक्रेनने समुद्री ड्रोनद्वारे रशियाचे सुखोई फायटरजेट पाडले; अमेरिकेसह सर्व देशांच्या सैन्यांना धक्का
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवाद्यांचा आणखी एक कट उघड; गुप्तचर विभागाची माहिती, अलर्ट जारी
5
पहलगाम नरसंहाराला देशाचे गृहमंत्री अमित शाह जबाबदार; संजय राऊतांचा हल्लाबोल
6
Video - रेस्टॉरंटमध्ये टेबल न मिळाल्याने संतापले मंत्री; रातोरात बोलावली फूड सेफ्टी टीम अन्...
7
धक्कादायक! पुण्यात नऊ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार; तरुणाविरोधात गुन्हा दाखल
8
Crime News: पंखा दाखवा म्हणाले अन् दुकानदारावर गोळी झाडून निघून गेले; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
9
निवेदिता सराफ यांच्याकडून घडलेली 'ती' चूक, अशोक सराफ यांनी पत्नीला चांगलंच सुनावलं
10
"मी पाकिस्तानात राहणाऱ्या मामे बहिणीशी लग्न केलं कारण..."; जवानाने उघड केलं मोठं रहस्य
11
"हिला पण गोळी मारायला हवी"; मुस्लिमांच्या विरोधात जाऊ नका म्हणणाऱ्या सैनिकाच्या पत्नीला केलं ट्रोल
12
भारत-पाकिस्तान तणावावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक; बंद खोलीत चर्चेची मागणी
13
"पाकिस्तानवाल्यांनो मी तुमच्या सोबत, जय पाकिस्तान!" राखी सावंतचा व्हिडीओ पाहून संतापले नेटकरी
14
मोठी बातमी! पहलगाम नंतर पूंछ होते निशाण्यावर, दहशतवाद्यांचा मोठा कट फसला; ५ आयईडी जप्त
15
उदय कोटक यांचा रियल इस्टेट क्षेत्रात धमाका, केली देशातील सर्वात महागडी ४०० कोटींची प्रॉपर्टी डील
16
VIDEO: दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या तरुणाने पोलिसांपासून वाचण्यासाठी नदीत उडी मारली; इम्तियाजचा मृतदेह सापडल्याने खळबळ
17
लोकप्रिय 'पंचायत' सीरिजला सचिवजी देणार होते नकार? जितेंद्र कुमार म्हणाला, "मला वाटलं..."
18
"बॉलिवूड चोर आहे!" नवाजुद्दीन सिद्दीकीचं मोठं विधान, म्हणाला- "लोक या गोष्टींना कंटाळतात..."
19
Samsung ला ४४००००००००० रुपयांचा टॅक्स भरण्याचे आदेश; कंपनीने लावला Reliance Jio वर आरोप, प्रकरण काय?
20
Stock Market Today: १६० अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला, TATA Motors चा शेअर सुस्साट; ऑटो-आयटी क्षेत्रात तेजी

आजपासून अवैध वाहतुकीवर कारवाईं

By admin | Updated: July 25, 2016 01:07 IST

औरंगाबाद : गिरिजा नदीच्या पुलावरून कोसळलेल्या टेम्पोच्या अपघातानंतर २५ जुलैपासून अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे.

शेताला तळ्याचे स्वरूप : राळेगाव तालुक्यात शनिवारी ५० मिमी. पाऊस राळेगाव : परिसरात शनिवारी झालेल्या पावसामुळे २०० हेक्टर क्षेत्रातील पिकांना धोका निर्माण झाला आहे. नाल्याचे पाणी शिरल्याने काही शेतांना तळ्याचे स्वरूप आले आहे. एकाच दिवसाच्या पावसाची नोंद ५० मिमी एवढी करण्यात आली आहे. शेताचे बांध फोडून पाणी बाहेर निघाल्याचे प्रकारही परिसरात घडले आहे. तालुक्यात मागील १५ दिवसांपासून पाऊस सुरू आहे. थोड्याफार विश्रांतीनंतर पावसाला सुरुवात होत आहे. परिसरातील नाले भरून वाहात आहे. शनिवारी झालेल्या जोरदार पावसामुळे यात भर पडली आहे. दुपारपासून सुरू झालेला पाऊस संध्याकाळपर्यंत सुरू होता. नाल्याचे पाणी शेतात शिरले. जवळपास २०० हेक्टर क्षेत्राला याचा फटका बसल्याचा अंदाज आहे. केनाडी नाल्याला आलेल्या पुरामुळे वाऱ्हा, मेंगापूर, बोरी, आष्टा, संगम या पाच गावांचा राळेगावशी संपर्क तुटला होता. पाच तास पर्यंत नाल्यावर पूर कायम राहिल्याने राळेगाव येथून आपल्या गावी जाण्यासाठी निघालेले नागरिक अडकून पडले होते. पुराचे पाणी शिरल्याने दिलीप अराडे, कवडू राऊत, मंगला गिरी, अन्नाजी फाळके, सुरेश जुनघरे, योगेश रोकडे, पांडुरंग निवल, दिलीप उरकुडे, संजय इंगळे, सुखाराम लोहकरे, दिगांबर भूत यांच्या शेताला तळ्याचे स्वरूप आले आहे. पीक पाण्याखाली आल्याने उत्पन्नाची शक्यता मावळली आहे. (प्रतिनिधी) नवीन रस्त्यावरील डांबर उखडले पावसामुळे परिसराच्या अनेक भागातील रस्त्यावरील डांबर उखडले आहे. आधीच असलेल्या खड्ड्यांचा पसारा वाढला आहे. जवळपास एक किलोमीटर अंतरातील रस्त्याची भीषण अवस्था झाली आहे. यातून मार्ग काढण्यासाठी चांगल्या भागाचा शोध घ्यावा लागतो. पुराचे पाणी असलेल्या भागातील रस्त्यांचीही दयनीय अवस्था झाली आहे. सध्यातरी या रस्त्याच्या दुरुस्तीची कुठलेही चिन्ह नाही. राळेगावातील प्रमुख अधिकारी बाहेरगावी पूरपरिस्थिती लक्षात घेता अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मुख्यालय सोडू नये, असे जिल्हा प्रशासनाचे आदेश आहे. शनिवारी परिसरात गंभीर स्थिती निर्माण झाली होती. परंतु विभाग आणि तालुक्याचे कुठलेही प्रमुख अधिकारी मुख्यालयी नव्हते. उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार हे पुणे येथे यशदाच्या मिटींगला होते, असे सांगण्यात आले. तहसीलदार हेमंत गांगुर्डे अमरावती येथे असल्याची माहिती देण्यात आली. कुठलाही जबाबदार अधिकारी उपस्थित नसल्याने परिसरातील नागरिकांनी रोष व्यक्त केला. मंडळ अधिकारी, तलाठ्यांनाच मोर्चा सांभाळावा लागला. पंचनामा आदी कारवाई त्यांनी पार पाडली.