शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
2
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! वेटिंग-RAC तिकिटाची स्थिती आता १० तास आधी कळणार
3
कर्जदारांना 'अच्छे दिन'! भारतीय अर्थव्यवस्था 'गोल्डीलॉक्स' स्थितीत; गव्हर्नर मल्होत्रा म्हणाले...
4
काँग्रेसची कार्यकर्ती, वरपर्यंत ओळख असल्याचं सांगून आणायची प्रेमासाठी दबाव, त्रस्त पोलीस इन्स्पेक्टरची महिलेविरोधात तक्रार
5
मुंबई इंडियन्सची 'ती गोष्ट 'जितेंद्र भाटवडेकर'च्या मनाला लागली? रोहितसोबतचा फोटो शेअर करत म्हणाला...
6
‘टॅरिफला आता हत्यार बनवले जातेय’, निर्मला सीतारमण यांनी सांगितला 'ट्रम्प टॅरिफ'मागील खेळ...
7
वंदे भारत की राजधानी, कोणत्या ट्रेनच्या लोको पायलटला सर्वाधिक पगार मिळतो? आकडा पाहून व्हाल थक्क
8
ICICI Prudential AMC IPO Allotment: कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस? जीएमपीमध्येही जोरदार तेजी
9
गणवेशावरून चिडवलं, घरी येताच चौथीत शिकणाऱ्या प्रशांतने...; आईवडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली
10
“काँग्रेसचे पाक प्रेम उतू चाललेय, ऑपरेशन सिंदूरचा हिशोब विचारणारे देशद्रोही”: एकनाथ शिंदे
11
Meesho च्या शेअरला अपर सर्किट; इश्यू प्राईजच्या दुप्पट झाली किंमत, सह-संस्थापक बनले अब्जाधीश
12
ढाका येथील भारतीय उच्चायुक्तालयाला धमकी, सरकारने बांगलादेशी अधिकाऱ्याला समन्स बजावले
13
विराट-अनुष्काने घेतली प्रेमानंद महाराजांकडून दीक्षा, गळ्यात तुळशी माळ; जाणून घ्या त्याचे महत्व
14
Payal Gaming: कोण आहे पायल गेमिंग? १.२० मिनटांचा MMS लीक झाल्यानंतर आली चर्चेत!
15
Video: BJP आमदाराच्या मुलाचा शाही विवाह सोहळा; तब्बल ७० लाखांच्या फटाक्यांची केली आतषबाजी
16
ओला-उबरला टक्कर! १ जानेवारीपासून 'भारत टॅक्सी' ॲप होणार लाँच; प्रवाशांना स्वस्त प्रवास आणि ड्रायव्हर्सची होणार जास्त कमाई
17
लग्नानंतर एका वर्षात शोभिता धुलिपाला देणार गुडन्यूज? सासरे नागार्जुन म्हणाले, "योग्य वेळ..."
18
भारतीय बाजारात उद्याच स्वस्तातली सात सीटर कार लाँच होणार; अर्टिगा, ट्रायबरला मिळणार टक्कर...
19
स्वस्त 'पर्सनल लोन'च्या शोधात आहात? 'या' ५ बँकांमध्ये मिळतोय सर्वात कमी व्याजदर; १२ लाखांचा EMI किती?
20
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

महिनाभर पुरेल एवढेच पाणी

By admin | Updated: February 4, 2016 00:36 IST

व्यंकटेश वैष्णव , बीड फेब्रुवारी महिना सुरू होताच टंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. महिनाभर पुरेल एवढाच पाणीसाठा जिल्हयात उपलब्ध असल्याने प्रशासनासमोर जनतेला पाणी पुरवायचे कसे असा

व्यंकटेश वैष्णव , बीडफेब्रुवारी महिना सुरू होताच टंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. महिनाभर पुरेल एवढाच पाणीसाठा जिल्हयात उपलब्ध असल्याने प्रशासनासमोर जनतेला पाणी पुरवायचे कसे असा, पेच निर्माण झाला आहे. आज घडीला जिल्हयात २ टक्केच पाणीसाठा असल्याचे लाभक्षेत्र विकास प्रधिकरणाच्या अहवालानुसार समोर आले आहे.सातत्याने दुष्काळ पडत असल्याने सिंचन प्रकल्पांत गतवर्षी पाणीच साचले नाही. जिल्हयात लघु, मध्यम व मोठे असे एकूण १४२ सिंचन प्रकल्प आहेत. यातील बोटावर मोजण्या इतक्याच प्रकल्पांमध्ये ज्योत्याच्या खाली पाणी आहे.अशा बिकट परिस्थितीतून बीड जिल्हा जात आहे. उन्हाळ्याचे अजून चार महिने बाकी आहेत. अशा स्थितीत पिण्याचे पाणी आणायचे कोठून असा प्रश्न जिल्हा प्रशासना समोर निर्माण झाला आहे.वडवणी, अंबाजोगाई या दोन तालुक्यातील मध्यम व लघु प्रकल्पांमध्ये पन्नास टक्के पेक्षा कमी पाणीसाठा आहे. यामुळे भविष्यात जिल्ह्याला प्रचंड टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. गावागावात पाणी पोहचविण्यासाठी प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे. नागरिकांनीही पाणी जपून वापरणे आवश्यक आहे.