शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

प्रकृती स्थिर करून कोरोनाग्रस्तांना रेफर केले, तरच मृत्यू कमी होतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:02 IST

औरंगाबाद : घाटी रुग्णालय हे ट्रॅशेरी केअर आहे. त्यामुळे येथील कोरोना रुग्णांचा मृत्यूदर स्वीकार करण्यासारखा आहे. मात्र, याठिकाणी ग्रामीण ...

औरंगाबाद : घाटी रुग्णालय हे ट्रॅशेरी केअर आहे. त्यामुळे येथील कोरोना रुग्णांचा मृत्यूदर स्वीकार करण्यासारखा आहे. मात्र, याठिकाणी ग्रामीण भागातून, अन्य जिल्ह्यांतून रुग्णांना रेफर करण्याचे प्रमाण अधिक आहे. कोणत्याही रुग्णाला रेफर करण्यापूर्वी त्याला ऑक्सिजन, इंजेक्शन, सलाइन दिले पाहिजे. आला रुग्ण, की रुग्णवाहिकेतून सरळ रेफर करा, हा प्रकार थांबला पाहिजे. यासाठी संबंधित यंत्रणेच्या प्रमुखांनी योग्य पाऊल उचलण्याच्या सूचना केंद्रीय पथकाने केल्या.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात दाखल झालेल्या केंद्रीय पथकाने शनिवारी घाटी रुग्णालयाचा आढावा घेतला. यावेळी अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, डॉ. सुधीर चौधरी, डॉ. सुरेश हरबडे, डॉ. वर्षा रोटे, डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य, डॉ. प्रभाकर जिरवणकर, डॉ. ज्योती इरावणे- बजाज आदी उपस्थित होते. पथकाने घाटीत कोरोनाग्रस्तांसाठी किती खाटा आहेत, आयसीयू, व्हेंटिलेटर बेड आहेत, याची माहिती घेतली. ऑक्सिजच्या व्यवस्थेचाही आढावा घेतला. रेमडेसिवीर इंजेक्शनच्या उपलब्धतेचीही माहिती घेतली. या सोयी-सुविधांविषयी पथकाने समाधान व्यक्त केले. घाटीतील विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेच्या (व्हीआरडीएल) कामाचेही पथकाने कौतुक केले; परंतु घाटीत मृत्यू पावणाऱ्या रुग्णांची संख्या पाहून रेफर होणाऱ्या रुग्णांविषयी पथकाने चिंता व्यक्त केली. तालुका पातळीवरील रुग्णांना प्राथमिक उपचार दिल्यानंतरच रेफर करण्याची गरज आहे. त्यासाठी काही तरी करावे, अशी सूचना पथकाने केली. यापूर्वी घाटीने ग्रामीण भागात प्रशिक्षण दिल्याची माहिती पथकाला देण्यात आली.

१० लिटर प्रतिमिनिट ऑक्सिजन मिळावा

ग्रामीण भागातील कोरोना उपचार केंद्रात, रुग्णालयात रुग्ण दाखल झाल्यानंतर त्याला कोणत्या गोष्टीची गरज आहे, त्याची तातडीने पूर्तता केली पाहिजे. एखाद्या रुग्णाला रेफर करायचे असेल, तर त्यापूर्वी किमान २ तास १० लिटर प्रतिमिनिट ऑक्सिजन दिला पाहिजे. त्यानंतर रुग्ण रेफर करावा, असे सांगण्यात आले.

फोटो ओळ

घाटीत शनिवारी केंद्रीय पथकाने आढावा घेतला. यावेळी उपस्थितीत घाटीतील डॉक्टर्स.