शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

ंचार महिन्यांत अवघे नऊ प्रस्ताव

By admin | Updated: March 24, 2016 00:43 IST

उस्मानाबाद : शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास अथवा अपंगत्व आल्यास त्याच्या कुटुंबियास आर्थिक आधार मिळावा, यासाठी शासनाच्या वतीने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात

उस्मानाबाद : शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास अथवा अपंगत्व आल्यास त्याच्या कुटुंबियास आर्थिक आधार मिळावा, यासाठी शासनाच्या वतीने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करण्यात आले. परंतु, या योजनेच्या बाबतीत प्रचार-प्रसिद्धीकडे अपेक्षित प्रमाणात लक्ष न दिल्यामुळे मागील चार महिन्यांत अवघे नऊ प्रस्ताव दाखल झाले आहेत. रस्ता अथवा रेल्वे अपघात, पाण्यात बुडून, विषबाधा, विजेचा धक्का, वीज पडणे, सर्पदंश, प्राणीदंश, खून, जंगली जनावरांचा हल्ला, दंगल, उंचावरून पडणे आदी कारणांमुळे शेतकऱ्याचा मृत्यू अथवा अपंगत्व आल्यानंतर संबंधित कुटुंब उघड्यावर येते. अशा परिस्थतीत शेतकऱ्याच्या कुटुंबाला आधार मिळावा, यासाठी युती शासनाच्या वतीने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना सुरू केली. सातत्याने उद्भवणारी दुष्काळी परिस्थिती लक्षात घेवून विमा संरक्षणाची रक्कमही दुप्पट करण्यात आली. या पूर्वीच्या योजनेअंतर्गत शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर अवघे एक लाख रूपये मिळत असत. परंतु, आता दोन लाख रूपये मिळणार आहेत. पूर्वी एखादा अवयव निकामी झाल्यास ५० हजार रूपये मिळत असत. आता ही रक्कम दुप्पट म्हणजेच एक लाख रूपये एवढी करण्यात आली आहे. दोन डोळे, दोन अवयव अथवा एक डोळा व एक अवयव निकामी झाल्यानंतरही दोन लाख रूपये दिले जाणार आहेत. शासनाकडून विमा संरक्षणाची रक्कम दुप्पट केल्यानंतर चांगला प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा होती. परंतु, तुर्तास तरी फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे प्राप्त प्रस्तावांवरून लक्षात येते. या योजनेच्या अंमलबजावणीला सुरूवात झाल्यापासून ते आजतागायत म्हणजेच मागील चार महिन्यात अवघे ९ प्रस्ताव दाखल झाले आहेत. दरम्यान, ग्रामीण भागात फेरफटका मारला असता, अनेक शेतकऱ्यांना सदरील योजनेबाबत विस्तृत माहिती नाही. योजनेच्या अटी काय आहेत? कुठल्या प्रकारच्या अपघाताला विमा मिळतो? त्यासाठी कोणकोणी कागदपत्रे लागतात? याबाबतही शेतकरी अनभिज्ञ आहेत. ही बाब लक्षात घेवून तरी कृषी विभागाने योजनेच्या जनजागृतीवर भर देण्याची गरज आहे. (प्रतिनिधी)