शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

ंचार महिन्यांत अवघे नऊ प्रस्ताव

By admin | Updated: March 24, 2016 00:43 IST

उस्मानाबाद : शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास अथवा अपंगत्व आल्यास त्याच्या कुटुंबियास आर्थिक आधार मिळावा, यासाठी शासनाच्या वतीने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात

उस्मानाबाद : शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास अथवा अपंगत्व आल्यास त्याच्या कुटुंबियास आर्थिक आधार मिळावा, यासाठी शासनाच्या वतीने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करण्यात आले. परंतु, या योजनेच्या बाबतीत प्रचार-प्रसिद्धीकडे अपेक्षित प्रमाणात लक्ष न दिल्यामुळे मागील चार महिन्यांत अवघे नऊ प्रस्ताव दाखल झाले आहेत. रस्ता अथवा रेल्वे अपघात, पाण्यात बुडून, विषबाधा, विजेचा धक्का, वीज पडणे, सर्पदंश, प्राणीदंश, खून, जंगली जनावरांचा हल्ला, दंगल, उंचावरून पडणे आदी कारणांमुळे शेतकऱ्याचा मृत्यू अथवा अपंगत्व आल्यानंतर संबंधित कुटुंब उघड्यावर येते. अशा परिस्थतीत शेतकऱ्याच्या कुटुंबाला आधार मिळावा, यासाठी युती शासनाच्या वतीने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना सुरू केली. सातत्याने उद्भवणारी दुष्काळी परिस्थिती लक्षात घेवून विमा संरक्षणाची रक्कमही दुप्पट करण्यात आली. या पूर्वीच्या योजनेअंतर्गत शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर अवघे एक लाख रूपये मिळत असत. परंतु, आता दोन लाख रूपये मिळणार आहेत. पूर्वी एखादा अवयव निकामी झाल्यास ५० हजार रूपये मिळत असत. आता ही रक्कम दुप्पट म्हणजेच एक लाख रूपये एवढी करण्यात आली आहे. दोन डोळे, दोन अवयव अथवा एक डोळा व एक अवयव निकामी झाल्यानंतरही दोन लाख रूपये दिले जाणार आहेत. शासनाकडून विमा संरक्षणाची रक्कम दुप्पट केल्यानंतर चांगला प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा होती. परंतु, तुर्तास तरी फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे प्राप्त प्रस्तावांवरून लक्षात येते. या योजनेच्या अंमलबजावणीला सुरूवात झाल्यापासून ते आजतागायत म्हणजेच मागील चार महिन्यात अवघे ९ प्रस्ताव दाखल झाले आहेत. दरम्यान, ग्रामीण भागात फेरफटका मारला असता, अनेक शेतकऱ्यांना सदरील योजनेबाबत विस्तृत माहिती नाही. योजनेच्या अटी काय आहेत? कुठल्या प्रकारच्या अपघाताला विमा मिळतो? त्यासाठी कोणकोणी कागदपत्रे लागतात? याबाबतही शेतकरी अनभिज्ञ आहेत. ही बाब लक्षात घेवून तरी कृषी विभागाने योजनेच्या जनजागृतीवर भर देण्याची गरज आहे. (प्रतिनिधी)