शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
3
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
4
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
5
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
6
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
7
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
8
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
9
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
10
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
11
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
12
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
13
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
14
IPL 2025: आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकणारे ५ कॅरेबियन खेळाडू, पाहा फोटो
15
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
16
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
17
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
18
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
19
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
20
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले

चार दिवसांचाच रक्तसाठा शिल्लक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 00:06 IST

येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात रक्तसाठ्यामध्ये मोठी घट झाली असून केवळ चार दिवसांचाच रक्तसाठा शिल्लक आहे. या रक्तसाठ्यात वेळीच वाढ केली नाही तर रुग्णांना गैरसोयीचा सामना करावा लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात रक्तसाठ्यामध्ये मोठी घट झाली असून केवळ चार दिवसांचाच रक्तसाठा शिल्लक आहे. या रक्तसाठ्यात वेळीच वाढ केली नाही तर रुग्णांना गैरसोयीचा सामना करावा लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.येथील जिल्हा सामान्य रुग्णालय हे मराठवाड्यात सर्वात मोठे रुग्णालय आहे. जिल्ह्यातील हजारो रुग्ण दररोज या ठिकाणी उपचार घेतात. या रुग्णांवर उपचार करताना पदोपदी रक्ताची आवश्यकता भासते. ही गरज लक्षात घेऊन जिल्हा रुग्णालयात सुरुवातीला रक्तपेढी, त्यानंतर रक्त विघटन केंद्र आणि आता मेट्रो ब्लड बँक स्थापन करण्यात आली आहे. या सुविधा निर्माण केल्या जात असल्या तरी प्रत्यक्षात मात्र त्या राबविताना कुठे तरी निष्काळजीपणा होत असल्याचेच दिसत आहे. जिल्हा रुग्णालयात किमान १ महिन्याचा रक्तसाठा उपलब्ध असणे आवश्यक असताना तो चार दिवसांपर्र्यत कमी झाला आहे. पाच महिन्यांपासून ही स्थिती निर्माण झाली आहे. एवढा रक्तसाठा कमी होईपर्यंत प्रशासनाने साठ्यात वाढ करण्यासाठी प्रयत्न केले की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.आरोग्य सेवेसारख्या अत्यावश्यक सेवेत रक्ताचा तुटवडा होत असेल तर हा रुग्णांच्या आरोग्याशीच खेळ होत असल्याचे दिसत आहे. काही दिवसांपूर्वी तर हा रक्तसाठा मोठ्या प्रमाणात घटला होता. त्यामुळे रुग्णांना रक्त हवे असल्यास एखादा नातेवाईक रक्तदानासाठी तयार करुन तातडीने रक्त उपलब्ध करुन द्यावे लागत आहे. यामध्ये विलंब झाला तर रुग्णाच्या जिवितास धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्हा रुग्णालयात रक्तसाठा कमी होत असताना प्रशासनाचे प्रयत्न मात्र तोकडे पडत असल्याचे दिसत आहेत. केवळ कागदोपत्री रक्तदानाचे आवाहन केले जाते. परंतु, रक्तदान शिबिरे आयोजनासाठी पुढाकार घेतला जात नाही किंवा सामाजिक संस्थांकडे तसा पाठपुरावाही कमी पडत असल्याचे दिसत आहे.जिल्ह्यातील हजारो रुग्ण जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी येतात ही बाब लक्षात घेऊन रक्तसाठा वाढविण्यासाठी प्रशासनाने गांभीर्याने प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली आहे.