शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

मुलाच्या लग्नाला अवघे पाच दिवस राहिले असताना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:02 IST

करोडी फाट्याजवळ भीषण अपघात : लग्नाचे आमंत्रण देण्यासाठी नातेवाईकांकडे जात होते; चेंदामेंदा झाल्याने खोऱ्याने उचलावे लागले मृतदेह औरंगाबाद ...

करोडी फाट्याजवळ भीषण अपघात : लग्नाचे आमंत्रण देण्यासाठी नातेवाईकांकडे जात होते; चेंदामेंदा झाल्याने खोऱ्याने उचलावे लागले मृतदेह

औरंगाबाद : मुलाच्या लग्नाला अवघे पाच दिवस शिल्लक राहिले असताना त्याच्या लग्नाचे आमंत्रण देण्यासाठी जाणाऱ्या वर मायबापाला शुक्रवारी करोडी फाट्याजवळ सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास भरधाव ट्रकने चिरडल्याने दोघेही जागीच ठार झाले. हा अपघात एवढा भीषण होता की, दुचाकीस्वार दांपत्याच्या अंगावरून ट्रकचे चाक गेल्याने त्यांच्या शरीराचा चेंदामेंदा झाला. यामुळे हे प्रेत उचलण्यासाठी पोलिसांना खोऱ्याचा वापर करावा लागला.

संजय पूनमसिंग छानवाल (५१) आणि मीना संजय छानवाल (४६ , दोघे. रा. परसोडा, ता. वैजापूर) अशी मृत पती-पत्नीची नावे आहेत. प्राप्त माहितीनुसार मयत दांपत्याचा लहान मुलगा गणेशचा विवाह औरंगाबाद तालुक्यातील शामवाडी येथे ७ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला आहे. मीना यांचे माहेर राजेवाडी (ता. बदनापूर) आहे. तेथे राहणाऱ्या भावाला (नवरदेवाचा मामा) ओवाळून त्या लग्नाचे रीतसर निमंत्रण देण्याकरिता पती संजय यांच्यासोबत मोटारसायकलने (एमएच २० - डीएक्स ३१७९) आज सकाळी घरून निघाल्या होत्या. औरंगाबादमार्गे त्यांना राजेवाडीला जायचे होते. धुळे-सोलापूर महामार्गावर समृद्धी महामार्गाचे काम आणि उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. याच पुलाखालून जात असताना समोरून भरधाव आलेल्या ट्रकने त्यांना जोराची धडक दिली. या घटनेत दुचाकीसह छानवाल पती-पत्नी ट्रकच्या समोरच्या चाकाखाली आले. या ट्रकने त्यांना काही फूट फरपटत नेल्याने त्यांच्या शरीरांचा चेंदामेंदा होऊन दोघेही ठार झाले. संजय आणि मीना यांच्या शरीराच्या रक्तामासाचा सडाच रस्त्यावर पडला होता. कोणता मृतदेह कुणाचा हे ओळखता येत नव्हते.

हा अपघात घडल्यावर ट्रकचालक आणि क्लीनर घटनास्थळावरून पळून गेले. या अपघाताची माहिती स्थानिकांनी दौलताबाद पोलिसांना कळविली. यानंतर पोलीस निरीक्षक राजेश्री आडे आणि अन्य अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनस्थळी धाव घेतली.

चौकट..

खोऱ्याने उचलावी लागली प्रेतं

घटनास्थळी दोघांच्या शरीराचा चेंदामेंदा झालेला, त्यांचे अवयव एकमेकांत मिसळले होते. यामुळे कोणते प्रेत कुणाचे हे ओळखता येत नव्हते. ही प्रेतं उचलण्यासाठी पोलिसांना खोऱ्याचा वापर करावा लागला. घटनास्थळावरील दृष्ये अंगाचा थरकाप उडविणारी आणि विचलित करणारी होती. हे पाहून पोलिसांनी तातडीने पंचनामा करीत मीना आणि संजय यांचे प्रेत घाटी रुग्णालयात हलविले.

चौकट...

उद्या परत येऊ असे सांगून गेले अन्‌ ...

संजय आणि मीना छानवाल यांनी घरून निघताना राजेवाडी येथे आज रात्री मुक्काम करू आणि उद्या (शनिवार) दुपारपर्यंत घरी परत येऊ, असे मुलगी राधा आणि नवरदेव गणेश यांना सांगितले होते. मात्र, आजच्या घटनेने ते कधीच घरी परतणार नाहीत. त्यांच्या मृत्यूमुळे छानवाल कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. त्यांच्या मागे विवाहित मुलगा अनिल, अविवाहित गणेश आणि विवाहित मुलगी राधा असा परिवार आहे. या घटनेमुळे परसोडा गाव सुन्न झाले.

==============

(फोटोसह )