शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

मुलाच्या लग्नाला अवघे पाच दिवस राहिले असताना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:02 IST

करोडी फाट्याजवळ भीषण अपघात : लग्नाचे आमंत्रण देण्यासाठी नातेवाईकांकडे जात होते; चेंदामेंदा झाल्याने खोऱ्याने उचलावे लागले मृतदेह औरंगाबाद ...

करोडी फाट्याजवळ भीषण अपघात : लग्नाचे आमंत्रण देण्यासाठी नातेवाईकांकडे जात होते; चेंदामेंदा झाल्याने खोऱ्याने उचलावे लागले मृतदेह

औरंगाबाद : मुलाच्या लग्नाला अवघे पाच दिवस शिल्लक राहिले असताना त्याच्या लग्नाचे आमंत्रण देण्यासाठी जाणाऱ्या वर मायबापाला शुक्रवारी करोडी फाट्याजवळ सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास भरधाव ट्रकने चिरडल्याने दोघेही जागीच ठार झाले. हा अपघात एवढा भीषण होता की, दुचाकीस्वार दांपत्याच्या अंगावरून ट्रकचे चाक गेल्याने त्यांच्या शरीराचा चेंदामेंदा झाला. यामुळे हे प्रेत उचलण्यासाठी पोलिसांना खोऱ्याचा वापर करावा लागला.

संजय पूनमसिंग छानवाल (५१) आणि मीना संजय छानवाल (४६ , दोघे. रा. परसोडा, ता. वैजापूर) अशी मृत पती-पत्नीची नावे आहेत. प्राप्त माहितीनुसार मयत दांपत्याचा लहान मुलगा गणेशचा विवाह औरंगाबाद तालुक्यातील शामवाडी येथे ७ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला आहे. मीना यांचे माहेर राजेवाडी (ता. बदनापूर) आहे. तेथे राहणाऱ्या भावाला (नवरदेवाचा मामा) ओवाळून त्या लग्नाचे रीतसर निमंत्रण देण्याकरिता पती संजय यांच्यासोबत मोटारसायकलने (एमएच २० - डीएक्स ३१७९) आज सकाळी घरून निघाल्या होत्या. औरंगाबादमार्गे त्यांना राजेवाडीला जायचे होते. धुळे-सोलापूर महामार्गावर समृद्धी महामार्गाचे काम आणि उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. याच पुलाखालून जात असताना समोरून भरधाव आलेल्या ट्रकने त्यांना जोराची धडक दिली. या घटनेत दुचाकीसह छानवाल पती-पत्नी ट्रकच्या समोरच्या चाकाखाली आले. या ट्रकने त्यांना काही फूट फरपटत नेल्याने त्यांच्या शरीरांचा चेंदामेंदा होऊन दोघेही ठार झाले. संजय आणि मीना यांच्या शरीराच्या रक्तामासाचा सडाच रस्त्यावर पडला होता. कोणता मृतदेह कुणाचा हे ओळखता येत नव्हते.

हा अपघात घडल्यावर ट्रकचालक आणि क्लीनर घटनास्थळावरून पळून गेले. या अपघाताची माहिती स्थानिकांनी दौलताबाद पोलिसांना कळविली. यानंतर पोलीस निरीक्षक राजेश्री आडे आणि अन्य अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनस्थळी धाव घेतली.

चौकट..

खोऱ्याने उचलावी लागली प्रेतं

घटनास्थळी दोघांच्या शरीराचा चेंदामेंदा झालेला, त्यांचे अवयव एकमेकांत मिसळले होते. यामुळे कोणते प्रेत कुणाचे हे ओळखता येत नव्हते. ही प्रेतं उचलण्यासाठी पोलिसांना खोऱ्याचा वापर करावा लागला. घटनास्थळावरील दृष्ये अंगाचा थरकाप उडविणारी आणि विचलित करणारी होती. हे पाहून पोलिसांनी तातडीने पंचनामा करीत मीना आणि संजय यांचे प्रेत घाटी रुग्णालयात हलविले.

चौकट...

उद्या परत येऊ असे सांगून गेले अन्‌ ...

संजय आणि मीना छानवाल यांनी घरून निघताना राजेवाडी येथे आज रात्री मुक्काम करू आणि उद्या (शनिवार) दुपारपर्यंत घरी परत येऊ, असे मुलगी राधा आणि नवरदेव गणेश यांना सांगितले होते. मात्र, आजच्या घटनेने ते कधीच घरी परतणार नाहीत. त्यांच्या मृत्यूमुळे छानवाल कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. त्यांच्या मागे विवाहित मुलगा अनिल, अविवाहित गणेश आणि विवाहित मुलगी राधा असा परिवार आहे. या घटनेमुळे परसोडा गाव सुन्न झाले.

==============

(फोटोसह )