शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

वाटा भरा तरच अंबडकरांना पाणी

By admin | Updated: October 28, 2014 00:57 IST

जालना: जायकवाडी - जालना पाणीपुरवठा योजनेतून लोकवर्गणीचा पंधरा कोटी रुपयांचा वाटा अदा केल्याशिवाय अंबडकरांना पाणी देऊ दिले जाणार नाही, असा इशारा माजी आ. कैलास गोरंट्याल यांनी दिला.

जालना: जायकवाडी - जालना पाणीपुरवठा योजनेतून लोकवर्गणीचा पंधरा कोटी रुपयांचा वाटा अदा केल्याशिवाय अंबडकरांना पाणी देऊ दिले जाणार नाही, असा इशारा माजी आ. कैलास गोरंट्याल यांनी दिला. या योजनेतून जालन्यापर्यंत पाणी पोहचावे म्हणून आपल्यासह पालिकेने सर्वार्थाने प्रयत्न केले आहेत. विशेषत: अनंत अडचणी असताना सुद्धा पालिकेने लोकवर्गणीचा पन्नास कोटी रुपयांचा वाटा उचला. पाठोपाठ विजेची थकित बिले अदा केली. देखभाल दुरुस्तीचा खर्च सुद्धा उचलला. त्याचबरोबर या योजनेतून पाणी मिळावे म्हणून अंबड पालिकेने केलेल्या प्रयत्नांना आम्हीही सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यासाठी लोकवर्गणीचा अंबडने पंधरा कोटींचा लोक वाटा उचलावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. परंतु त्या संदर्भात अंबड पालिकेने एक छदामही रक्कम आदा केली नाही. अशी खंत गोरंट्याल यांनी व्यक्त केली. आता पाण्यासाठी अंबडकरांनी सुरु केलेल्या तोडफोडीसह संघर्षाची भाषा पूर्णत: गैर आहे. असे नमूद करीत पंधरा कोटींचा वाटा उचलावा. तेंव्हाच युटिलिटी कंपनीकडून व्यावसायिक दराद्वारे पाणी उपलब्ध केले जाईल असे ते म्हणाले. अंबड येथील जलशुद्धीकरण केंद्रातील शुद्धीकरणाच्या कामात कोणताही व्यत्यय येऊ नये किंवा जलवाहिनीची तोडफोड होऊन पाणी पळविले जाऊ नये म्हणून आपण जिल्हा पोलिस अधीक्षकांना एक निवेदन सादर करणार आहोत. त्याद्वारे केंद्रासह जलवाहिनीस संरक्षण मिळावे अशी मागणी करणार आहोत, असे ते म्हणाले. दरम्यान, विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सदोष झाल्याचा आरोप गोरंट्याल यांनी केला. प्रिंटेड मतपत्रिका कर्तव्यावर असणाऱ्यांना वेळेत वाटप करण्यात आल्या नाहीत. शिवाय ४ हजार मतदारांची नावे दुबार आली आहेत. मयतांची नावे वेळेत वगळण्यात आली नाहीत, असे ते म्हणाले. यावेळी नगराध्यक्षा पार्वताबाई रत्नपारखे, काँग्रेसचे शहराध्यक्ष अब्दुल हफिज, विनोद यादव, अरुण मगरे, राम सावंत आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)