शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
5
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
6
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
7
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
8
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
9
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
10
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
11
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
12
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
13
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
14
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
15
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
16
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
17
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
18
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
19
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
20
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
Daily Top 2Weekly Top 5

वाटा भरा तरच अंबडकरांना पाणी

By admin | Updated: October 28, 2014 00:57 IST

जालना: जायकवाडी - जालना पाणीपुरवठा योजनेतून लोकवर्गणीचा पंधरा कोटी रुपयांचा वाटा अदा केल्याशिवाय अंबडकरांना पाणी देऊ दिले जाणार नाही, असा इशारा माजी आ. कैलास गोरंट्याल यांनी दिला.

जालना: जायकवाडी - जालना पाणीपुरवठा योजनेतून लोकवर्गणीचा पंधरा कोटी रुपयांचा वाटा अदा केल्याशिवाय अंबडकरांना पाणी देऊ दिले जाणार नाही, असा इशारा माजी आ. कैलास गोरंट्याल यांनी दिला. या योजनेतून जालन्यापर्यंत पाणी पोहचावे म्हणून आपल्यासह पालिकेने सर्वार्थाने प्रयत्न केले आहेत. विशेषत: अनंत अडचणी असताना सुद्धा पालिकेने लोकवर्गणीचा पन्नास कोटी रुपयांचा वाटा उचला. पाठोपाठ विजेची थकित बिले अदा केली. देखभाल दुरुस्तीचा खर्च सुद्धा उचलला. त्याचबरोबर या योजनेतून पाणी मिळावे म्हणून अंबड पालिकेने केलेल्या प्रयत्नांना आम्हीही सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यासाठी लोकवर्गणीचा अंबडने पंधरा कोटींचा लोक वाटा उचलावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. परंतु त्या संदर्भात अंबड पालिकेने एक छदामही रक्कम आदा केली नाही. अशी खंत गोरंट्याल यांनी व्यक्त केली. आता पाण्यासाठी अंबडकरांनी सुरु केलेल्या तोडफोडीसह संघर्षाची भाषा पूर्णत: गैर आहे. असे नमूद करीत पंधरा कोटींचा वाटा उचलावा. तेंव्हाच युटिलिटी कंपनीकडून व्यावसायिक दराद्वारे पाणी उपलब्ध केले जाईल असे ते म्हणाले. अंबड येथील जलशुद्धीकरण केंद्रातील शुद्धीकरणाच्या कामात कोणताही व्यत्यय येऊ नये किंवा जलवाहिनीची तोडफोड होऊन पाणी पळविले जाऊ नये म्हणून आपण जिल्हा पोलिस अधीक्षकांना एक निवेदन सादर करणार आहोत. त्याद्वारे केंद्रासह जलवाहिनीस संरक्षण मिळावे अशी मागणी करणार आहोत, असे ते म्हणाले. दरम्यान, विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सदोष झाल्याचा आरोप गोरंट्याल यांनी केला. प्रिंटेड मतपत्रिका कर्तव्यावर असणाऱ्यांना वेळेत वाटप करण्यात आल्या नाहीत. शिवाय ४ हजार मतदारांची नावे दुबार आली आहेत. मयतांची नावे वेळेत वगळण्यात आली नाहीत, असे ते म्हणाले. यावेळी नगराध्यक्षा पार्वताबाई रत्नपारखे, काँग्रेसचे शहराध्यक्ष अब्दुल हफिज, विनोद यादव, अरुण मगरे, राम सावंत आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)