शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

वाटा भरा तरच अंबडकरांना पाणी

By admin | Updated: October 28, 2014 00:57 IST

जालना: जायकवाडी - जालना पाणीपुरवठा योजनेतून लोकवर्गणीचा पंधरा कोटी रुपयांचा वाटा अदा केल्याशिवाय अंबडकरांना पाणी देऊ दिले जाणार नाही, असा इशारा माजी आ. कैलास गोरंट्याल यांनी दिला.

जालना: जायकवाडी - जालना पाणीपुरवठा योजनेतून लोकवर्गणीचा पंधरा कोटी रुपयांचा वाटा अदा केल्याशिवाय अंबडकरांना पाणी देऊ दिले जाणार नाही, असा इशारा माजी आ. कैलास गोरंट्याल यांनी दिला. या योजनेतून जालन्यापर्यंत पाणी पोहचावे म्हणून आपल्यासह पालिकेने सर्वार्थाने प्रयत्न केले आहेत. विशेषत: अनंत अडचणी असताना सुद्धा पालिकेने लोकवर्गणीचा पन्नास कोटी रुपयांचा वाटा उचला. पाठोपाठ विजेची थकित बिले अदा केली. देखभाल दुरुस्तीचा खर्च सुद्धा उचलला. त्याचबरोबर या योजनेतून पाणी मिळावे म्हणून अंबड पालिकेने केलेल्या प्रयत्नांना आम्हीही सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यासाठी लोकवर्गणीचा अंबडने पंधरा कोटींचा लोक वाटा उचलावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. परंतु त्या संदर्भात अंबड पालिकेने एक छदामही रक्कम आदा केली नाही. अशी खंत गोरंट्याल यांनी व्यक्त केली. आता पाण्यासाठी अंबडकरांनी सुरु केलेल्या तोडफोडीसह संघर्षाची भाषा पूर्णत: गैर आहे. असे नमूद करीत पंधरा कोटींचा वाटा उचलावा. तेंव्हाच युटिलिटी कंपनीकडून व्यावसायिक दराद्वारे पाणी उपलब्ध केले जाईल असे ते म्हणाले. अंबड येथील जलशुद्धीकरण केंद्रातील शुद्धीकरणाच्या कामात कोणताही व्यत्यय येऊ नये किंवा जलवाहिनीची तोडफोड होऊन पाणी पळविले जाऊ नये म्हणून आपण जिल्हा पोलिस अधीक्षकांना एक निवेदन सादर करणार आहोत. त्याद्वारे केंद्रासह जलवाहिनीस संरक्षण मिळावे अशी मागणी करणार आहोत, असे ते म्हणाले. दरम्यान, विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सदोष झाल्याचा आरोप गोरंट्याल यांनी केला. प्रिंटेड मतपत्रिका कर्तव्यावर असणाऱ्यांना वेळेत वाटप करण्यात आल्या नाहीत. शिवाय ४ हजार मतदारांची नावे दुबार आली आहेत. मयतांची नावे वेळेत वगळण्यात आली नाहीत, असे ते म्हणाले. यावेळी नगराध्यक्षा पार्वताबाई रत्नपारखे, काँग्रेसचे शहराध्यक्ष अब्दुल हफिज, विनोद यादव, अरुण मगरे, राम सावंत आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)