शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

२० दिवसांत आरटीईचे केवळ ८५० प्रवेश निश्चित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:03 IST

--- औरंगाबाद : पालकांनी शाळेत जाऊन आरटीईतून प्रवेश निश्चितीसाठी ९ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. गुरुवारी सायंकाळपर्यंत केवळ ...

---

औरंगाबाद : पालकांनी शाळेत जाऊन आरटीईतून प्रवेश निश्चितीसाठी ९ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. गुरुवारी सायंकाळपर्यंत केवळ ८५० प्रवेश निश्चित झाले असून ११२८ प्रोव्हीजनल प्रवेश झाले. तर उर्वरित सुमारे दीड हजार पालकांनी प्रवेश प्रक्रियेला प्रतिसाद दिलेला नाही. त्यामागची कारणे शोधण्याची गरज असून आरटीई प्रवेश प्रक्रियेला गतिमान करून शाळांकडून पालकांची होणारी अडवणूक थांबविण्याची मागणी आरटीई पालक संघाने केली आहे.

जिल्ह्यात ६०३ शाळांत ३६२५ आरटीई जागांसाठी ३४७० विद्यार्थ्यांची सोडतीतून निवड करण्यात आली. त्यासाठी पालकांना ११ ते ३० जूनपर्यंत शाळेत जाऊन प्रवेश निश्चिती करायची होती. त्याला ९ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. आतापर्यंत ११२८ प्रोव्हिजन प्रवेश करण्यात आले. २० दिवसांत केवळ ८५० प्रवेश निश्चित झाले.

जात वैधता प्रमाणपत्राची मागणी यासह शाळा चालकांकडून शासन परिपूर्ती देत नाही म्हणून पालकांची अडवणूक करुन शुल्काची मागणी केली जाते. आर्थिकदृष्ट्या वंचित घटकातील विद्यार्थ्यांना परत कसे वंचित ठेवता येईल अशाप्रकारे शिक्षणाच्या अधिकार कायद्याची अंमलबजावणी सुरू आहे. त्यामुळे आरटीई प्रवेश करतांना विनाअनुदानित, इंग्रजी शाळांकडून अडवणूक सुरू असल्याचा आरोप आरटीई पालक संघाचे अध्यक्ष प्रशांत साठे यांनी केला आहे.