शहरं
Join us  
Trending Stories
1
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
2
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
3
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
4
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
5
Navi Mumbai Rains: वाशी प्लाझा येथे नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
6
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
7
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! अंधेरी सबवे पाण्याखाली, समुद्रात ४ मीटर उंचीच्या लाटा
9
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
10
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
11
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
12
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
13
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
14
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
15
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
16
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
17
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?
18
सोनम आणि राज कुशवाह यांची नार्को टेस्ट होणार? राजा रघुवंशीच्या कुटुंबाच्या मागणीवर पोलीस म्हणाले..
19
विमानातील 'त्या' सीटची मागणी वाढली, अहमदाबादमधील अपघातानंतर '11A' साठी प्रवासी अधिक पैसे देण्यास तयार

पाच वर्षांत फक्त ६ टक्के घट

By admin | Updated: February 16, 2015 00:53 IST

संजय तिपाले, बीड जिल्ह्यात छकुली जन्माचा टक्का वाढत असताना अल्पवयीन मुलींच्या विवाहाचे प्रमाण मात्र काही केल्या कमी व्हायला तयार नाही

संजय तिपाले, बीडजिल्ह्यात छकुली जन्माचा टक्का वाढत असताना अल्पवयीन मुलींच्या विवाहाचे प्रमाण मात्र काही केल्या कमी व्हायला तयार नाही. १८ वर्षाच्या आत बोहल्यावर चढणाऱ्या लेकींचा ग्रामीण भागातील टक्का आजही २६ इतका असून शहरातील प्रमाण २७ टक्के इतके आहे. मागील पाच वर्षांत अल्पवयीन विवाहांमध्ये केवळ सहा टक्क्याने घट झाली. त्यामुळे बालविवाह प्रतिबंधक कायद्याची काटेकोर अंमलबजावणी होतच नाही, हे देखील स्पष्ट झाले आहे.स्त्री भू्रण हत्येत जिल्ह्याची प्रतिमा काळवंडली गेली. तेंव्हापासून जिल्ह्यावर केंद्र सरकारने अधिक लक्ष केंद्रीत केले आहे. केंद्रीय आरोग्य विभागानेच २०१३ मध्ये जिल्हा कुटुंबप्रमुख व सोयीसुविधा सर्वे केला होता. या सर्वेतून पुढे आलेली माहिती चिंताजनकच आहे. अल्पवयीन मुलींचे विवाह लावण्यात बीड जिल्हा राज्यात पहिल्या पाचमध्ये होता. हे प्रमाण खाली आणण्यासाठी जनजागृती, कायद्याची अंमलबजावणी असे प्रयत्न झाले; परंतु पाच वर्षांत अपेक्षेइतके यश मिळाले नाही. दरम्यान, अल्पवयातील विवाहांमुळे अवेळी मातृत्व लादले जाते. त्यामुळे मातांसोबतच बाळांच्या जीवालाही धोका निर्माण होण्याची शक्यता अधिक असते. महत्त्वाचे म्हणजे अल्पवयात संसाराचा भार खांद्यावर घेणाऱ्यांत मुलींप्रमाणेच मुलेही मागे नाहीत. त्यामुळे अशा प्रकारचे विवाह भविष्यात आरोग्यावर दुष्परिणाम करतात. त्यासाठी मुलीचे १८ तर मुलाचे २१ वर्षानंतर लग्न लावून देणे केंव्हाही आरोग्याच्या दृष्टीने फायद्याचे आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे.जनजागृतीवर भरजिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच. व्ही. वडगावे म्हणाले, बालविवाहाची कारणे अनेक आहेत. मात्र, जनजागृती करुनच बालविवाह रोखले जाऊ शकतात. त्यासाठी आरोग्य विभागामार्फत प्रयत्न सुरु आहेत. अल्पवयीन मुला- मुलींचे विवाह रोखण्याच्या कामाला चळवळीचे स्वरुप आले पाहिजे. कायद्याचीही कडक अंमलबजावणी झाली पाहिजे. तेंव्हाच बदल शक्य आहे, असे त्यांनी सांगितले.पालकांमध्ये असुरक्षिततेची भावनाचाईल्ड लाईनचे जिल्हा समन्वयक तत्वशिल कांबळे म्हणाले, अल्पवयातील विवाह रोखण्यासाठी कायद्याची अंमलबजावणी गरजेची आहे. आई- वडील व नातेवाईकच अशा विवाहांना प्रोत्साहन देत असतात. त्यामुळे जनजागृतीही गरजेची आहे. मात्र, पालकांमधील असुरक्षिततेची भावना आधी दूर करणे महत्त्वाचे आहे. मुलींच्या सुरक्षिततेवरुन अनेकदा तिचे लग्न लावून मोकळे होण्याकडे पालकांचा कल असतो. अल्पवयीन विवाह कुठे लावले जात असतील तर चाईल्ड लाईन तेथे धावून जाते, आजपर्यंत ६० पेक्षा अधिक बालविवाह रोखल्याचे कांबळे यांनी सांगितले.शाळा पडताळणीची गरजबालविवाहासंबंधी बोलताना सामाजिक कार्यकर्त्या मनीषा तोकले म्हणाल्या की, शहरी भागातील लोक मुलींना शिकवतात. परंतु ग्रामीण भागातील लोक मुलींचे लवकर लग्न करतात. मुलीचे वय १८ वर्षे होण्याची वाट न पाहताच त्यांचे लग्न लावण्याचे प्रकार यापूर्वी अनेक वेळा समोर आले आहेत. बालवयात लग्न झाले तरी उघडपणे कोणीही मान्य करीत नाही. कारण लग्न हे पवित्र गोष्ट असून त्याविषयी नकारात्मक बोलणे कोणीही पसंत करत नाही. त्यामुळे बालविवाहाचा खरा आकडा कधीही समोर येत नाही. जिल्हा प्रशासनानुसार बालविवाहाचे प्रमाण ३६ टक्के असल्याचे सांगितले जाते. मुळात ही आकडेवारी अधिक असू शकते. बालविवाहाचा खरा आकडा बाहेर काढायचा असल्यास शाळेतील पटपडताळणी करणे आवश्यक आहे. कारण मुली वयात येताच त्यांची लग्ने केली जातात. पटपडताळणी दरम्यान कोणत्या मुली शाळेतून गेल्या आहेत याची माहिती समोर येऊ शकते. त्यातून बालविवाहाचा आकडा समोर येऊ शकतो.नवीन मतदाराचा केला होता सत्कारबालविवाह होत असल्याची अनेक प्रकरणे यापूर्वी समोर आली आहेत. त्यामुळे बालविवाह किती झाले आहेत याची माहिती घेण्यासाठी गेल्या वर्षी मतदानादरम्यान एक उपक्रम राबविला होता. माहेरामध्ये येऊन पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या मुलींचा सत्कार करण्यात आला. प्रत्येक गावातून केवळ ३ ते ४ नविवाहित मुलीच समोर आल्या. यावरून बालविवाह होत असल्याचे स्पष्ट होते.