शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन 'सिंदूर'नंतर 'ब्रह्मोस मिसाइल'ची मागणी वाढली, १४-१५ देश रांगा लावून उभे!
2
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
3
आधी हातोड्याने पतीवर वार केले, मग धारदार शस्त्र वापरून संपवून टाकलं! पत्नीचा क्रूरपणा ऐकून हादरून जाल
4
लठ्ठपणाविरोधात सरकार आखतंय नवा प्लॅन; खाद्यप्रेमींसाठी IMP बातमी, समोसा, जिलेबी खाताय तर...
5
'जर तुम्ही रशियाकडे...', उत्तर कोरियाच्या किम जोंग यांचा अमेरिका, जपानला इशारा
6
पैसे बुडणार नाहीत, तर वाढतील; ‘हे’ आहेत गुंतवणूकीचे सुरक्षित पर्याय, गुंतवू शकता तुम्ही पैसा
7
निमिषा प्रियाचा जीव वाचू शकेल? फाशीला उरलेत अवघे २ दिवस! सुप्रीम कोर्टात आज होणार मोठी सुनावणी 
8
Pune Crime: पुण्यात तरुणाची हत्या; पानटपरीवर वाद, थेट कोयताच घातला डोक्यात, हाताची बोटेही तुटली 
9
कराड 'आरटीओ'ला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका, 'त्या' बुलेटचे रजिस्टर करण्याचे आदेश; नेमकं प्रकरण काय?
10
Air India Plane Crash : क्रॅश झालेल्या एअर इंडियाच्या विमानाचे टीसीएम दोनदा बदलले होते; इंधन नियंत्रण स्विच याचाच एक भाग
11
दुबई अन् नेपाळपर्यंत पसरलं होतं छांगुर बाबाचं जाळं; 'नीतू' करायची डील! कोण आहे 'ही' व्यक्ती?   
12
'दुआ में जरुर याद रखना' मृत्यूपूर्वी अभिनेत्रीचे अखेरचे शब्द; Voice Note पहिल्यांदाच समोर
13
...मग तेव्हा उद्धव ठाकरे २५ मिनिटं मोदीजींचे बूट चाटत होते का?; रामदास कदमांचा राऊतांवर हल्ला
14
बंगालच्या उपसागरात १६ दिवस चिनी जहाज लपून बसलेले; ओळख सांगणारी यंत्रणा चालू-बंद करत होते...
15
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
16
इकडे चौकशी सुरू; तिकडे बाळाने मिटले डोळे, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच रडलेले...
17
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
18
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
19
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
20
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार

आठ शहरांसाठी अवघे ५१६ सफाई कर्मचारी

By admin | Updated: November 30, 2014 00:55 IST

उस्मानाबाद : तीन ते साडेतीन लाख लोकसंख्या असलेल्या जिल्ह्यातील आठ शहरांतील स्वच्छतेची कामे करण्यासाठी केवळ ५१६ कर्मचारी कार्यरत आहेत़

उस्मानाबाद : तीन ते साडेतीन लाख लोकसंख्या असलेल्या जिल्ह्यातील आठ शहरांतील स्वच्छतेची कामे करण्यासाठी केवळ ५१६ कर्मचारी कार्यरत आहेत़ बहुतांश सर्वच पालिकांनी खासगी करार करून स्वच्छतेची कामे दिली आहेत़ मात्र, शहरातील मुख्य रस्त्यासह विविध विभागातील स्वच्छता नावालाच दिसत आहे़ नगर पालिकांकडे मनुष्यबळाचा अभाव असल्याने स्वच्छता मोहीम कागदावर राहत असून, ‘स्वच्छ शहर, सुंदर शहर’ संकल्पना प्रत्यक्षात राबविण्यासाठी सर्वसामान्यांचा पुढाकार गरजेचा आहे़संत गाडगेबाबांनी ‘स्वच्छते’चा संदेश देण्यात उभे आयुष्य घालविले़ त्यांच्या नावावर शासनाने राज्यभरात स्वच्छता मोहिमही राबविली़ त्यानंतर पंतप्रधानांनी हातात झाडू घेवून ‘स्वच्छ भारत अभियाना’स सुरूवात केली आहे़ जवळपास सव्वालाख लोकसंख्येच्या उस्मानाबाद शहरासह इतर सात शहरातील नगर पालिकांकडे स्वच्छता कर्मचाऱ्यांचा मोठा अभाव आहे़ हे कर्मचारी सकाळच्या सत्रात शहरातील बाजारपेठेसह मुख्य मार्गावरील साफसफाईची कामे करतात़ हे कर्मचारी शहराच्या बहुतांश भागात विशेषत: वाढीव हद्दीपर्यंत पोहचू शकत नाहीत़ त्यामुळे शहरातील मुख्य भागातील गटारी तुंबल्या असून, रस्त्याच्या कडेला, कचरा कुंडी परिसरातही मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरले आहे़ अस्वच्छतेमुळे साथरोगाचा धोका उद्भवत असून, डासांसह डुकरांचाही उच्छाद सर्वच शहरांमध्ये वाढला आहे़ पालिका प्रशासनही अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे स्वच्छता मोहिमेला मूर्त रूप देण्यात अपयशी ठरत आहे़ त्यामुळे शहरातील नागरिकांसह, व्यापाऱ्यांनी घर, दुकानाचा परिसर स्वच्छ ठेवल्यानंतर ‘स्वच्छ शहर, सुंदर शहर’ ही संकल्पना प्रत्यक्षात उतरेल़ (प्रतिनिधी)