शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

‘सिव्हिल’मध्ये अवघे ४ बालरोगतज्ज्ञ, तिसऱ्या लाटेचा कसा करणार मुकाबला?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:04 IST

औरंगाबाद : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत बालकांना सर्वाधिक धोका असल्याचे सांगितले जात आहे. त्यानुसार आरोग्य यंत्रणा अलर्ट होऊन खबरदारी ...

औरंगाबाद : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत बालकांना सर्वाधिक धोका असल्याचे सांगितले जात आहे. त्यानुसार आरोग्य यंत्रणा अलर्ट होऊन खबरदारी घेत आहे. पण जिल्हा सामान्य रुग्णालयात केवळ ४ बालरोगतज्ज्ञ आहेत. त्यामुळे जिल्हा रुग्णालय तिसऱ्या लाटेचा मुकाबला कसा करणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनची मागणी वाढली. रोज ऑक्सिजन येत होता आणि संपत होता, अशी स्थिती होती. जिल्हा रुग्णालयात लिक्विड ऑक्सिजन टँकचे काम हाती घेण्यात आले. परंतु दुसऱ्या लाटेत या ऑक्सिजन टँकचा वापरच झाला नाही. आता ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पही उभा करण्यात आला आहे. ऑक्सिजनच्या दृष्टीने रुग्णालय सक्षम झाले आहे. पण याशिवाय जिल्हा रुग्णालयात तिसऱ्या लाटेच्या दृष्टीने अद्याप काहीही कामे झालेली नाहीत. केवळ कागदोपत्री नियोजन झालेले आहे. याठिकाणी बालकांच्या उपचारासाठी ५० आयसीयू बेड, व्हेंटिलेटरचे नियोजन करण्यात आले आहे. पण उपचार करणाऱ्या तज्ज्ञांचा मोठा प्रश्न आहे. कारण जिल्हा रुग्णालयात केवळ ४ बालरोगतज्ज्ञ आहेत. त्यामुळे बालकांच्या उपचारासाठी तज्ज्ञांच्या कमतरतेला रुग्णालयाला सामोरे जावे लागणार आहे. तज्ज्ञ डाॅक्टर मिळणेही अवघड असल्याने गंभीर प्रकृती होणाऱ्या बालकांच्या उपचाराचा भार घाटीवरच पडण्याची स्थिती नाकारता येत नाही. त्यामुळे जिल्हा रुग्णालयात बालकांच्या उपचाराची व्यवस्था सक्षम करण्याची मागणी तज्ज्ञांकडून होत आहे.

नियोजन सुरु, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

जिल्हा रुग्णालयात ४ बालरोगतज्ज्ञ आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बालकांवर उपचार करण्यात आलेले आहे. तिसऱ्या लाटेच्या दृष्टीने नव्या बालरोगतज्ज्ञांची नियुक्ती केली जाणार आहे. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना आवश्यक ते प्रशिक्षणही दिले जात आहे. लहान मुलांच्या उपचारासाठी आयसीयू बेडचे, व्हेंटिलेटरचेही नियोजन करण्यात आले आहे.

- डाॅ. कमलाकर मुदखेडकर, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक