शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

अवघे २६ हजार क्विंटल बियाणे उपलब्ध

By admin | Updated: May 31, 2016 23:28 IST

उस्मानाबाद : जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून सुमारे ४ लाख ४८ हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणीसाठी प्रस्तावित करण्यात आले आहे.

उस्मानाबाद : जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून सुमारे ४ लाख ४८ हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणीसाठी प्रस्तावित करण्यात आले आहे. त्यासाठी बी-बियाणे तसेच खताची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. सर्वाधिक पेरा होणाऱ्या सोयाबीन, तूर, उडीद आणि खरीप ज्वारीचे मिळून ८३ हजार ६६ क्विंटल बिण्याची मागणी नोंदविण्यात आली असता आजघडील केवळ २५ हजार ५२५ क्विंटल एवढेच बियाणे उपलब्ध झाले आहे. गतवर्षी शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरणीवर भर दिला होता. परंतु, पावसाने दगा दिल्यामुळे साधा उत्पादन खर्चही निघाला नाही. यंदाही शेतकरी सोयाबीनवर भर देतील, असा कृषी विभागाचा अंदाज आहे. सोयाबीनचे सर्वसाधारण क्षेत्र ४८ हजार हेक्टर एवढे असले तरी प्रत्यक्ष १ लाख ४० हजार हेक्टरवर पेरणी होईल, असे कृषी विभाभागाचे म्हणणे आहे. यासाठी महाबीज तसेच राष्ट्रीय बियाणे निगम यांच्याकडून सुमारे ७२ हजार ८०० क्विंटल बियाणाची मागणी करण्यात आली आहे. आजवर केवळ २३ हजार १८४ क्विंटल म्हणजेच पन्नास टक्केही बियाणे उपलब्ध झालेले नाही. अशीच अवस्था तुरीच्या बियाण्याबाबत आहे. ८४ हजार ४०० हेक्टर एवढे सर्वसाधारण क्षेत्र आहे. प्रत्यक्षात ९८ हजार हेक्टर एवढ्या क्षेत्रावर पेरणी होईल. तसे कृषी विभागाकडून प्रस्तावित करण्यात आले आहे. ४ हजार ११६ क्ंिवटल बियाणे मंजूर असतना सद्यस्थितीत अवघे ५०४ क्विंटल बियाणे उपलब्ध झाले आहे. भूम, वाशीसह आदी तालुक्यांतील शेतकरी नगदी पीक म्हणून ओळख असलेल्या उडीद पेरणीवर भर देताता. सर्वसाधारण क्षेत्र ४३ हजार ५०० हेक्टर एवढे आहे. प्रत्यक्षात ५० हजार हेक्टवर पेरणी होईल, असे कृषी विभागाचे म्हणणे आहे. त्यानुसार ३ हजार ९०० क्विंटल बियाणे पुरविण्यास शासनाने मंजुरी दिली असली तरी प्रत्यक्षात १ हजार ४०७ क्विंटल बियाणेच उपलब्ध झाले आहे. खरीप ज्वारी पिकाखालील सर्वसाधारण क्षेत्र ६६ हजार हेक्टर एवढे आहे. प्रत्यक्षात ४० हजार हेक्टर क्षेत्रावरील पेरणीचे कृषी विभागाकडून नियोजन करण्यात आली आहे. यासाठी २ हजार २५० क्विंटल बियाण्याची मागणी करण्यात आली असता प्रत्यक्षात अवघे ४३० क्विंटल बियाणे उपलब्ध झाले आहे. (प्रतिनिधी)