शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
2
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
3
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
4
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
5
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
6
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
7
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
8
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा
9
बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही
10
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
11
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
12
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
13
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
14
Jara Hatke: चांदीचा वर्ख कसा तयार होतो माहितीय? वर्ख लावलेली मिठाई खावी की नाही? तुम्हीच ठरवा!
15
सोन्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा? SBI ची मोठी मागणी, म्हणाले घरांमध्ये पडून असलेलं सोनं..
16
मोठी बातमी! पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित
17
बिहार निवडणूक 2025: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
18
चारित्र्यावर संशय! रस्त्यात दुसऱ्या तरुणासोबत बोलली म्हणून संतापलेल्या पतीने ब्लेडने कापले पत्नीचे नाक
19
याला म्हणतात ऑफर...! Tata च्या इलेक्ट्रिक कारवर ₹1.30 लाखांपर्यंतची सूट, Curvv EV अन् Punch EV वर मोठा डिस्काउंट
20
तो प्रवास ठरला अखेरचा..; प्रसिद्ध ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर अनुनय सूदचे 32व्या वर्षी निधन

अवघे २६ हजार क्विंटल बियाणे उपलब्ध

By admin | Updated: May 31, 2016 23:28 IST

उस्मानाबाद : जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून सुमारे ४ लाख ४८ हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणीसाठी प्रस्तावित करण्यात आले आहे.

उस्मानाबाद : जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून सुमारे ४ लाख ४८ हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणीसाठी प्रस्तावित करण्यात आले आहे. त्यासाठी बी-बियाणे तसेच खताची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. सर्वाधिक पेरा होणाऱ्या सोयाबीन, तूर, उडीद आणि खरीप ज्वारीचे मिळून ८३ हजार ६६ क्विंटल बिण्याची मागणी नोंदविण्यात आली असता आजघडील केवळ २५ हजार ५२५ क्विंटल एवढेच बियाणे उपलब्ध झाले आहे. गतवर्षी शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरणीवर भर दिला होता. परंतु, पावसाने दगा दिल्यामुळे साधा उत्पादन खर्चही निघाला नाही. यंदाही शेतकरी सोयाबीनवर भर देतील, असा कृषी विभागाचा अंदाज आहे. सोयाबीनचे सर्वसाधारण क्षेत्र ४८ हजार हेक्टर एवढे असले तरी प्रत्यक्ष १ लाख ४० हजार हेक्टरवर पेरणी होईल, असे कृषी विभाभागाचे म्हणणे आहे. यासाठी महाबीज तसेच राष्ट्रीय बियाणे निगम यांच्याकडून सुमारे ७२ हजार ८०० क्विंटल बियाणाची मागणी करण्यात आली आहे. आजवर केवळ २३ हजार १८४ क्विंटल म्हणजेच पन्नास टक्केही बियाणे उपलब्ध झालेले नाही. अशीच अवस्था तुरीच्या बियाण्याबाबत आहे. ८४ हजार ४०० हेक्टर एवढे सर्वसाधारण क्षेत्र आहे. प्रत्यक्षात ९८ हजार हेक्टर एवढ्या क्षेत्रावर पेरणी होईल. तसे कृषी विभागाकडून प्रस्तावित करण्यात आले आहे. ४ हजार ११६ क्ंिवटल बियाणे मंजूर असतना सद्यस्थितीत अवघे ५०४ क्विंटल बियाणे उपलब्ध झाले आहे. भूम, वाशीसह आदी तालुक्यांतील शेतकरी नगदी पीक म्हणून ओळख असलेल्या उडीद पेरणीवर भर देताता. सर्वसाधारण क्षेत्र ४३ हजार ५०० हेक्टर एवढे आहे. प्रत्यक्षात ५० हजार हेक्टवर पेरणी होईल, असे कृषी विभागाचे म्हणणे आहे. त्यानुसार ३ हजार ९०० क्विंटल बियाणे पुरविण्यास शासनाने मंजुरी दिली असली तरी प्रत्यक्षात १ हजार ४०७ क्विंटल बियाणेच उपलब्ध झाले आहे. खरीप ज्वारी पिकाखालील सर्वसाधारण क्षेत्र ६६ हजार हेक्टर एवढे आहे. प्रत्यक्षात ४० हजार हेक्टर क्षेत्रावरील पेरणीचे कृषी विभागाकडून नियोजन करण्यात आली आहे. यासाठी २ हजार २५० क्विंटल बियाण्याची मागणी करण्यात आली असता प्रत्यक्षात अवघे ४३० क्विंटल बियाणे उपलब्ध झाले आहे. (प्रतिनिधी)