शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed Crime News : परळीत तरुणाला बेदम मारहाण! छातीवर बसला, सभोवती कडं केलं, काठ्यांनी बेदम मारहाण, व्हिडीओ व्हायरल
2
गौप्यस्फोट! अटकेआधी संजय राऊतांचा अमित शाहांना फोन; संतापून म्हणाले, "मला अटक करा..."
3
पाकिस्तानची तिसऱ्या देशाच्या मदतीने भारतात माल निर्यात करण्याची तयारी; सरकारने घेतली दखल
4
"भाजपाशी अनैतिक संबंध तोडावेत, जसं 'वर्षा'वर हक्कानं जाता, तसं 'मातोश्री'वर यावं" 
5
पुढच्या वर्षी बंद होणार Vodafone Idea? सरकारकडे मागितली मदत; म्हटलं, 'काम करणं कठीण...'
6
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
7
आयुष्याचं ‘सुरक्षा चक्र' आहेत या ३ स्कीम्स, कठीण काळात साथ; कमी कमाई असणारेही करू शकतात गुंतवणूक
8
भारताच्या हल्ल्यात नूर खानसह अनेक एअरबेस उद्ध्वस्त; पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांचा कबुलीनामा
9
अफगाणिस्तानला भारताचा मदतीचा हात! अटारी मार्गे केली विशेष मदत; पाकिस्तानला दाखवून दिले
10
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
11
सुटीत गावी आलेल्या न्यायाधीशांनी स्वत: कापले गावातील मुलांचे केस; नेमकं घडलं काय?
12
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
13
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती
14
भारत आता पाकिस्तानवर ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ करणार; ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती जगात पोहोचवणार
15
आगळीक करू नका, ‘ऑपरेशन सिंदूर’ हा फक्त ट्रेलर, गरज पडल्यास पूर्ण ‘पिक्चर’ दाखवू: राजनाथ सिंह
16
अफगाणिस्तानातून पाकची जलकोंडी होण्याची शक्यता; शाहतूत धरणास भारताचे आर्थिक, तांत्रिक सहकार्य
17
‘८६४७’ म्हणजे थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा संदेश? जेम्स कॉमी यांच्या पोस्टमुळे खळबळ
18
मध्य प्रदेशच्या मंत्र्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांचेही विधान चर्चेत; काँग्रेसची भाजपावर टीका
19
पाक समर्थक तुर्की, अझरबैजानशी  कोणताही व्यापार, पर्यटन नाही; भारतीय व्यापाऱ्यांचा बहिष्कार
20
मुंबईत तळ ठोकून असणाऱ्या २५० बांगलादेशींना घरचा रस्ता; २ दिवसांत पोलिसांची मोठी धडक कारवाई

विधानसभेसाठी केवळ २५ महिलांचे अर्ज

By admin | Updated: September 29, 2014 00:42 IST

शिरीष शिंदे , बीड विधानसभा निवडणुकीसाठीची रणधुमाळी रंगाल आली असून जिल्ह्यातील सहा मतदार संघात १७८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. यापैकी केवळ २५ महिला उमेदवार असल्याची

शिरीष शिंदे , बीडविधानसभा निवडणुकीसाठीची रणधुमाळी रंगाल आली असून जिल्ह्यातील सहा मतदार संघात १७८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. यापैकी केवळ २५ महिला उमेदवार असल्याची धक्कादायकबाब समोर आली आहे, अशी परिस्थिती राहिली तर वर्षानुवर्ष स्त्रिया राजकारणात फार काळ सक्रीय राहू शकणार नाहीत. महिलांना संसद व स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये ३३ टक्के आरक्षण देण्याचा ऐतीहासिक निर्णय मार्च २०१० मध्ये घेण्यात आला. महिलांना विधान सभा निवडणुकांमध्ये आरक्षण देण्याचा निर्णय जाहीर झाला नसला तरी होऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये सहभाग घेण्यास अनुत्सुकता दाखविली असल्याचे उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार समोर आले आहे. विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच शनिवारी दुपारी तीन वाजेपर्यंत जिल्ह्यात १७८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. यापैकी केवळ २५ महिला उमेदवार असून बहुतांश महिला या अपक्ष असल्याचे यादीवरुन स्पष्ट झाले आहे. गेवराईत २, माजलगावात ३, बीडमध्ये ४, केजमध्ये ९ तर परळीत ४ महिलांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. २८ सप्टेंबरपासून अर्ज छाणणीला सुरुवात होणार आहे. त्यात कागदपत्र व इतर बाबींमध्ये किती महिला उमेदवारांचे अर्ज बाद ठरतील हे आताच सांगता येत नाही. त्यानंतर १ आॅक्टोबर रोजी अर्ज मागे घेण्याची तारीख असल्याने अपक्ष महिला अर्ज मागे घेतात हेही अद्याप स्पष्ट नाही. अर्ज दाखल केलेल्या महिलांमध्ये मुख्य लढतीत केवळ चारच महिला उमेदवार सक्षम असून त्यांची इतर उमेदवारांसह थेट लढत होईल. यामुळे इतर महिला आपला अर्ज मागे घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल केलेल्या महिलांमध्ये बहुतांश महिला यांनी डमी अर्ज दाखल केला आहे. महिलांचे निवडणुका लढण्याचे प्रमाण अत्यल्प राहिले तर राजकारणात पुरुषांचे वर्चस्व किमान शंभर वर्षतरी कोणिही मिटवु शकणार नाहीत. ज्या महिला उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत ते एकतर डमी उमेदवार किंवा मुख्य लढतीत उमेदवार असल्याचे यादीवरुन दिसुन येत आहे. त्यामुळे १ आॅक्टोबर रोजी किती महिला उमेदवार आपला अपक्ष उमेदवारीचा अर्ज मागे घेतात हे त्या दिवशी स्पष्ट होईल. महिला राजकारणात उतरल्या नाहीत तर त्यांचे विधानसभेत आपले वजन त्यांना निर्माण करता येणार नाही. एका बाजुला महिला पन्नास टक्के आरक्षण मागत आहे. त्यांना संसंद व स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये आरक्षणही देण्यात आले आहे मात्र निवडणुकांमध्ये त्याचा सहभाग अत्यल्प असल्याचे दिसून येत आहे. महिलांनी राजकारणात आल्या तरच पुरुष-स्त्री समानता उदयाला येऊ शकेल, असा विश्वास आहे. गेवराई- पंडित गिरीका, गीता बाळराजे (अपक्ष), माजलगाव-कुंदाबाई देशमुख (अपक्ष),रेखा फड (अपक्ष), राजूबाई डोंगरे (अपक्ष), बीड- अर्चना जगताप, स्मिता धांडे (अपक्ष), कमल निंबाळकर (अपक्ष), आष्टी-मीनाक्षी पांडुळे (काँग्रेस), कमल तरटे (अपक्ष), सत्यभामा बांगर (अपक्ष), शोभा शेलार (अपक्ष), केज- नमिता मुंदडा (राकाँ), शीतल पवार (अपक्ष), अलका सरवदे (अपक्ष), संगीता तुपसागर (अपक्ष), सुनीता जगताप, कल्पना नरहिरे (शिवसेना), अंजली घाडगे (काँग्रेस), संगीता ठोंबरे (भाजप), जनाबाई वेडे (अपक्ष), परळी: पंकजा मुंडे (भाजप),कल्पना सिरसाट (अपक्ष), राजश्री मुंडे (अपक्ष), डॉ. महालक्ष्मी केदार (अपक्ष).