शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
3
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
4
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
5
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
6
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
7
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
8
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
9
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
10
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
11
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
12
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
13
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
14
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
15
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
16
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
17
नळजोडण्या दिल्या; मात्र पाण्याचा  एक थेंबही मिळेनासा झाला...
18
ए. आर. रहमान यांच्या लाइव्ह कॉन्सर्टमुळे नेरूळकरांची कोंडी
19
ऐकणारेही चकित... भारतीयांनी वर्षभरात ओटीटीवर पाहिले ३० लाख तासांचे कंटेंट 
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

शेतीमाल आवक केवळ २५ टक्के

By admin | Updated: November 8, 2015 23:44 IST

रमेश शिंदे , औसा पावसाअभावी यंदा शेतकरी संकटात सापडले आहेत़ त्यामुळे शेतीवर अवलंबून असलेले व्यवसायही संकटात सापडले आहेत़ पाऊस नसल्याचा फटका

रमेश शिंदे , औसा पावसाअभावी यंदा शेतकरी संकटात सापडले आहेत़ त्यामुळे शेतीवर अवलंबून असलेले व्यवसायही संकटात सापडले आहेत़ पाऊस नसल्याचा फटका जसा शेतकऱ्यांना बसला तसा तो आडत बाजारासही बसला आहे़ दिवाळीच्या पूर्वसंध्येला येथील कृषी उत्पन्न बाजार समिती सुनसान असल्याचे शुक्रवारी पहावयास मिळाले़ दिवसभरात केवळ ४१० क्विंटल शेतीमालाची आवक झाली होती़ मागील आठ-दहा वर्षांपासून औसा कृषी उत्पन्न बाजार समिती नावारूपाला आली आहे़ या बाजार समितीत महिन्याला हजारो क्विंटल आवक राहायची़ पण यावर्षी मात्र ही आवक २५ टक्क्यांवरच आली आहे़ मागील वर्षी आॅक्टोबर महिन्यात १८ हजार क्विंटल सोयाबीनची आवक होती़ ती यावर्षी केवळ ६ हजार ५०० क्विंटलवर आली आहे़ मागील वर्षी दिवाळीच्या पूर्वसंध्येला सर्व प्रकारच्या शेतीमालाची आवक ३ हजार ५०० क्विंटलची होती़ ती आज केवळ ४१० क्विंटल आहे़ शुक्रवारी औशाच्या आडत बाजारात केवळ ४१० क्विंटल मालाची आवक होती़ यामध्ये सोयाबीन ३३५, हरभरा ३, हायब्रीड ४३, पिवळी २४, करडी २, सूर्यफूल ३ क्विंटल अशी आवक होती़ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये ५४ आडत दुकाने आहेत़ विशेष म्हणजे मालाची आवकच नसल्याने काही आडत दुकाने बंद असल्याचे विदारक चित्र पहायला मिळाले़ हजारो क्विंटल आवक असणाऱ्या या बाजार समितीमधीलआवक सध्या मात्र शेकड्यात आली आहे़ यासंदर्भात बाजार समितीचे सचिव शाम कुलकर्णी म्हणाले, मागील काही वर्षांपासून आमच्या बाजार समितीत हजारो क्विंटल शेतीमालाची आवक होत होती़ ती आता शेकड्यावर आली आहे़ त्यामुळे यावर्षी ३५ ते ४० टक्केही उत्पन्न होते की नाही, अशी शंका आहे़ त्यामुळे आर्थिक उलाढाल थंडावली आहे़ दुष्काळी परिस्थितीचा हा परिणाम आहे़