शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
2
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वक्फ कायद्याला अभय; बोर्डात ३ गैर मुस्लीम सदस्य बनू शकतात, परंतु...
3
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
4
पाकिस्तान फायनलमध्ये हवीय...! प्लीज भारताने पुढला सामना बॉयकॉट करावा; पाकिस्तानी चाहत्यांची मागणी
5
"...तर माझ्या वडिलांचा जीव वाचला असता"; नवजोत सिंग यांच्या मुलाने केला गंभीर आरोप
6
ITR भरण्याची अंतिम मुदत वाढणार? सोशल मीडियावर चर्चा; आयकर विभागाने केलं स्पष्ट
7
"आपण कधी काळी तोडले गेलो, पण तेही परत मिळवू"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान
8
टीम इंडियाने हस्तांदोलन नाकारल्याने पाकिस्तानचा तीळपापड, पत्रक जारी करत नोंदवला निषेध
9
बाबाचं लक्ष फोनमध्ये, आई चेंजिंगरूममध्ये; स्विमिंग पूलमध्ये पडलेल्या ४ वर्षांच्या मुलीकडे कुणी पाहिलच नाही अन्...
10
Ameesha Patel : "९० टक्के सेलिब्रिटी पैसे देऊन..."; अमिषा पटेलने उलगडलं बॉलिवूड इंडस्ट्रीचं गुपित, सांगितलं 'ते' सत्य
11
शेवटी आईच ती! स्वत:ला झोकून दिले आणि लेकीला मगरीच्या जबड्यातून सोडवले, पण... 
12
४ महिन्यापूर्वी लग्न झालेल्या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; हुंड्यासाठी छळ करून केली हत्या? 
13
यह नया भारत है..., टीम इंडियाने पाकिस्तानला नमवल्यानंतर भाजपाने विरोधकांना डिवचले  
14
२२ सप्टेंबरपासून टीव्ही, फ्रीज, एसीसह इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होणार; किती रुपयांची बचत होईल?
15
Cloudburst In Maharashtra: अहिल्यानगर जिल्ह्यात ढगफुटी, अनेक गावांना फटका; छोटा तलाव फुटला
16
कहानी में ट्विस्ट! नवऱ्याने बायकोचं बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं, आता 'त्याचं' भलतंच सत्य समोर आलं
17
सचिनला तुम्ही सीनिअर आहात?, मिश्कील प्रश्नावर दिलीप प्रभावळकरांना आलं हसू; मग म्हणाले...
18
दबावाखाली बाजार: ऑक्टोबर ‘ब्रेकआउट’ देईल की ‘ब्रेक’ घ्यावा लागेल?
19
झारखंडमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई; तीन माओवादी ठार, एकावर एक कोटी रुपयांचे बक्षीस
20
अहिल्यानगरमध्ये भूकंपाचे धक्के! बोटा, घारगाव परिसर हादरला; लोकांमध्ये भीतीचे वातावरण

शहराच्या दिमतीला केवळ २१ शहर बस

By admin | Updated: May 31, 2014 01:24 IST

साहेबराव हिवराळे, औरंगाबाद मेट्रोसिटीकडे वाटचाल करणार्‍या औरंगाबाद शहरांतर्गत वाहतुकीची जबाबदारी फक्त २१ शहर बसवर अवलंबून असून,

साहेबराव हिवराळे, औरंगाबाद मेट्रोसिटीकडे वाटचाल करणार्‍या औरंगाबाद शहरांतर्गत वाहतुकीची जबाबदारी फक्त २१ शहर बसवर अवलंबून असून, सिडको स्थानकातून वाळूज, चिकलठाणा आणि औरंगपुरा, रेल्वेस्टेशन वगळता इतर भागांत शहर बस फिरकताना दिसत नाहीत. खाजगी वाहनांच्या भरवशावरच प्रवाशांना अवलंबून राहावे लागत आहे. मुंबई, पुणे या ठिकाणी प्रवाशांची प्रचंड वर्दळ आहे. त्याखालोखाल औरंगाबादेतही वर्दळ वाढती आहे. येथे जागतिक क्षेत्रात नावलौकिक असलेल्या अजिंठा, वेरूळ लेण्या, दौलताबाद किल्ला, मकबरा, पाणचक्की व शहराचा दर्जा वाढविणारे मॉल, सिनेमा थिएटर्स, कारखाने आहेत. पर्यटक शहरात आकर्षिले जात आहेत; परंतु येथील शहर वाहतूक सेवा अत्यंत तोकडी असल्याने खाजगी वाहनांनी प्रवास करण्याशिवाय सामान्य नागरिकांना पर्यायच उरत नाही. याविषयी शहरातील कामगार, पालक, नागरिकांत तीव्र नाराजीचा सूर आहे. रिंगरूट बससेवा हवी दहा वर्षांपूर्वी चिकलठाणा ते रेल्वेस्टेशन, बाबा पेट्रोल पंप ते सिडको हडको, पुन्हा चिकलठाणा अशी रिंगरूट बससेवा चालू होती. शाळकरी मुलांपासून ते नोकरवर्गासह सामान्य व्यक्तीही जेमतेम पैशांत दररोज शहरभर फिरत होते; परंतु आता खाजगी वाहनांचा आर्थिक भुर्दंड सहन करीत प्रवास करण्याशिवाय पर्यायच राहिलेला नाही. -राजू साबळे सामान्यांचा विचार व्हावा सामान्य कामगारांना खाजगी वाहनाने ये-जा करणे परवडत नाही. शहर बसची संख्या वाढविल्यास प्रवाशांच्या खिशाला आर्थिक झळ कमी बसेल. खेड्यातून शहरात येणार्‍या नातेवाईकांना तुम्ही शहर बसने सरळ घरी या, असे म्हणताच येत नाही. कारण रस्त्यावर बसेसची संख्या अंत्यंत कमी आहे. -किशोर जाधव याविषयी एसटी महामंडळाचे अधिकारी सुपेकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, सध्या ज्या बस सुरू आहेत, त्यात काही बदल नाही, शाळा व कामगारांचा आम्ही अजून विचार केलेला नाही. सतत मागणी होत असली तरी सातारा, शेंद्र्यासाठी किंवा रिंगरूट बससेवेविषयीही वरिष्ठांच्या होकाराशिवाय काही नियोजनच नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. मजुरांची होतेय गैरसोय हंगामी मजुराला वाळूज, पडेगाव, शेंद्रा तसेच सातारा इत्यादी भागात कामासाठी जावे लागते, त्यांना खाजगी वाहनाने ये-जा करावी लागते. प्रवासासाठी ठेकेदाराला दररोज अधिकचे पैसे द्यावेच लागतात किंवा खाजगी वाहनने त्यांची दररोज ने-आण करावी लागते. झपाट्याने वाढणार्‍या शहराला शहर बसच्या जाळ्याने का जोडले जात नाही. -अण्णासाहेब खरात