शहरं
Join us  
Trending Stories
1
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना
2
GT ला मोठा धक्का! CSK वर पहिल्यांदाच आली तळाला राहण्याची वेळ; पण जाता जाता त्यांनी MI ला दिलं गिफ्ट
3
त्या निवेदनातून माझे नाव वगळा, दुसरे नाव टाका;पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल
4
निरा डावा कालव्याला भगदाड..! बारामती परिसरात नागरिकांच्या घरात-शेतात पाणीच पाणी
5
धक्कादायक! चेंजिंग रूममध्ये कॅमेरा बसवला होता, महिलांचे कपडे बदलतानाचे व्हिडीओ व्हायरल
6
'...तर तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही', जरांगे पाटलांचा मुख्यमंत्री फडणवीसांना थेट इशारा
7
"मी एका खोलीच्या घरात राहतो, कर्जबाजारी..."; सीबीआयच्या आरोपपत्रावर सत्यपाल मलिक म्हणाले,...
8
पीएम मोदींचा पाकिस्तान दौरा अन् 2016 चा पठाणकोट हल्ला..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
9
ऑपरेशन सिंदूरमधील नामुष्कीनंतर पाकिस्तान सुधरेना, अण्वस्त्रांबाबत रचतोय भयंकर डाव, अमेरिकेच्या अहवालातून गौप्यस्फोट
10
दुसरी मुलगी झाली म्हणून टोमणे; अमरावतीत ‘सीएचओ’ची आत्महत्या
11
व्लादिमीर पुतीन यांच्या हेलिकॉप्टरवर युक्रेनकडून ड्रोन हल्ला, बालंबाल बचावल्याचं वृत्त   
12
Monsoon Update : आनंदाची बातमी! या राज्यांमध्ये मान्सूनचे दमदार आगमन; मुसळधार पावसाचा इशारा, महाराष्ट्रात कधी येणार?
13
GT चं काही खरं नाही; तळाला असलेल्या CSK च्या बॅटर्संनी केला मोठा धमाका
14
रशियाने युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला केला, ३६७ ड्रोन, क्षेपणास्त्रे डागली
15
Tejashwi Yadav : “मला हे आवडत नाही आणि मी ते सहनही करू शकत नाही”; तेजस्वी यादव यांनी स्पष्टच सांगितलं
16
मोदींच्या नेतृत्वात एनडीएचे जोरदार शक्तीप्रदर्शन; २० मुख्यमंत्री, १७ उपमुख्यमंत्री बैठकीला हजर...
17
'आमच्या 24 कोटी लोकांचे जीवन...', पाकिस्तानची सिंधू पाणी करारासाठी UN मध्ये धाव
18
सोन्याच्या तेजीचा फायदा घ्यायचाय? दागिन्यांऐवजी नाणे खरेदी करा; 'हे' आहेत ८ मोठे फायदे
19
'जोपर्यंत हिंदू स्वतः मजबूत होत नाही, तोपर्यंत...', RSS प्रमुख मोहन भागवत यांची स्पष्टोक्ती
20
...ती पोस्ट नडली, तेजप्रताप यादव यांची RJDमधून हकालपट्टी, वडील लालूप्रसाद यादव यांनी केली कारवाई

‘जुई’त केवळ २० टक्के पाणीसाठा

By admin | Updated: February 2, 2016 00:23 IST

दानापूर : भोकरदन तालुक्यातील दानापूर येथील जुई धरणात केवळ २० टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. यामुळे उन्हाळ्यापूर्वीच पाणीटंचाईचे सावट परिसरात निर्माण झाले आहे.

दानापूर : भोकरदन तालुक्यातील दानापूर येथील जुई धरणात केवळ २० टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. यामुळे उन्हाळ्यापूर्वीच पाणीटंचाईचे सावट परिसरात निर्माण झाले आहे. या धरणातील पाणीपातळीत झपाट्याने घट होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.या धरणात २० गावांना पाणीसाठा राखीव ठेवण्यात आलेला आहे. भोकरदन शहरासह दानापूर, देहेड, मुर्तड, पिंपळगाव रेणुकाई, सुरंगळी, कठोरा बाजार, करजगाव, कल्याणी, दगडवाडी, मनापूर, भायडी, तळणी, सिपोरा बाजार, बाभुळगाव, विरेगाव आदी गावांसाठी या धरणात पिण्यासाठी पाणी राखीव ठेवलेले आहे. परंतु सध्या राखीव पाणीसाठा ठेवूनही धरणाजवळील शेतकऱ्यांच्या विहिरीवरील विद्युत पंपाचा वीजपुरवठा अद्यापही खंडित केलेला दिसून येत नाही. सध्या धरणात केवळ २० टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. अद्याप पाच ते सहा महिने पावसाळा बाकी आहे. तोपर्यंत या वीस गावांना पाणी पुरणे शक्य होणार नाही, असे चित्र दिसून येत आहे.धरणाची पाणीपातळी दिवसेंदिवस झपाट्याने खालावत आहे. धरणालगत खाजगी विहिरींना आळा घालण्याची आजरोजी खरी गरज आहे. विहिरींची संख्या दिवसेंदिवस दिवस वाढत असल्यामुळे धरणातील पाणीही या विहिरीत पाझरत आहे. त्यामुळे धरणाची पाणीपातळी झपाट्याने खालावत आहे. या बाबीकडे पाटबंधारे विभागाचेही दुर्लक्ष होत आहे. तालुक्यातील केवळ एकमेव मोठे धरण होय. या धरणात यावर्षी परतीच्या पावसाने दिलासा दिल्याने १२ फुट जलसाठा झाला होता. धरणात असलेल्या पाण्याची निगराणी ठेवण्याची गरज असून, धरण परिसरात विहिरींवर सुरू असलेल्या विद्युत पंपांचाही वीजपुरवठा खंडित करणे गरजेचे आहे. शिवाय नवीन विहिरी परिसरात घेण्यासही मज्जाव करावा, जेणेकरून पाणीपातळीत आणखी घट होणार नाही व परिसरातील २० गावांना उन्हाळ्यातही पाणी पुरेल, अशी अपेक्षा ग्रामस्थांतून व्यक्त होत आहे. धरणापासून दूर असलेल्या विहिरींनी आजरोजीच तळ गाठले आहे. त्यामुळे येथील जनावरे, शेळ्या व राजस्थानी लोकांचे जनावरे या धरणावर पाण्यासाठी आणतात. (वार्ताहर)