शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
2
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
3
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
4
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
5
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
6
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
7
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
8
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
9
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
10
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
11
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
12
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
13
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
14
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
15
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
16
सलग ४३ व्या दिवशी 'या' शेअरला अपर सर्किट; किंमत ₹१०० पेक्षाही कमी, २ महिन्यांत केलं मालामाल
17
Aja Eakadashi 2025: श्रावणातले अजा एकादशीचे लाभदायी व्रत; का आणि कसे करावे? वाचा!
18
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
19
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
20
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये दिसणारी अभिनेत्री कोण? सनी देओलशी आहे कनेक्शन

साडेतीनशे एकरांसाठी केवळ १५ कर्मचारी

By admin | Updated: June 24, 2014 01:08 IST

गजानन दिवाण , औरंगाबाद तब्बल ३५० एकरावर विस्तारलेल्या ऐतिहासिक हिमायत बागेत वसंतराव नाईक कृषी विद्यापीठातर्फे फळ संशोधन केंद्र चालविले जाते.

गजानन दिवाण , औरंगाबादतब्बल ३५० एकरावर विस्तारलेल्या ऐतिहासिक हिमायत बागेत वसंतराव नाईक कृषी विद्यापीठातर्फे फळ संशोधन केंद्र चालविले जाते. मात्र, येथील कर्मचारी संशोधनाशिवाय वेगळ्याच कामात गुंतले आहेत. रिकामटेकड्या लोकांवर नियंत्रण ठेवणे, त्यांची घुसखोरी थांबविणे, अतिक्रमणाला आळा घालणे, कोणी जबरदस्ती करीत असतील तर कोर्टात खेचणे, अशी ही कामे करताना मनुष्यबळाचीही मारामार. त्यामुळे ना फळ संशोधन व्यवस्थित होते ना बागेची देखभाल. साऱ्याच बाबतीत आनंदीआनंद आहे. ‘लोकमत’मध्ये दोन दिवसांपासून हिमायत बागेतील सुरक्षेचा मुद्दा मांडला जात आहे. बाहेरील लोकांना मिळालेले अतिस्वातंत्र्य हेच या बागेच्या जीवावर उठले आहे. मॉर्निंग वॉकला येणारे लोक वेगळे. दुपारी आरामासाठी येणारे वेगळे. गुंड-बदमाश, मैत्रिणीला घेऊन येणारे वेगळेच, अशा रिकामटेकड्यांची मोठी फौज हिमायत बागेला आणि तेथील पक्ष्यांना संपविण्याच्या मार्गावर आहे. बागेच्या सुरक्षा भिंतीला अनेक ठिकाणी छिद्र पाडून घुसखोरी सुरू आहे. केवळ माणसेच नव्हे, तर जनावरांच्या चराईसाठीदेखील या बागेचा वापर केला जात आहे. संशोधनासोबतच या रिकामटेकड्यांना आवरण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ त्यांच्याकडे उपलब्ध नाही. अशा रिक्त जागांची यादीच विद्यापीठाकडे ३० मे रोजी पाठविण्यात आली असल्याची माहिती फळ संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. टी. बी. तांबे यांनी ‘लोकमत’ला दिली. एवढ्या मोठ्या परिसरात विस्तारलेल्या या बागेचा डोलारा केवळ ९५ माणसांवर चालायचा. त्यातलेही जवळपास ५० टक्के लोक दुसऱ्याच कार्यालयात आहेत. उपलब्ध मनुष्यबळात ५० टक्के पन्नाशी ओलांडलेले आहेत. म्हणजे कोण कोणाची काळजी घेणार? साधारण १५ लोकांच्या भरोशावर या बागेचा कारभार चालत आहे. प्रचंड संख्येने येणाऱ्या रिकामटेकड्या माणसांना अवघे १५ जण कसे आवरू शकणार, असा प्रश्न संशोधन केंद्रातील एका अधिकाऱ्याने उपस्थित केला. काही वार्षांपूर्वी अतिक्रमण थांबविण्याचा प्रयत्न झाला. कार्यालयावरच हल्ला झाला. तोडफोडही झाली. लोकांना असे करू नका, म्हणण्याची सोय राहिली नाही. त्यामुळे बागेचे नुकसान होत असूनही काही करू शकत नसल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले. हे असेच सुरू राहिले, तर बाग नामशेष व्हायला वेळ लागणार नाही, ही शक्यतादेखील या अधिकाऱ्याने बोलून दाखविली.बागेची भिंत तोडून चार ठिकाणी अतिक्रमण झाले आहे. हे प्रकरण न्यायालयात सुरू आहे. बागेत जवळपास १८ विहिरी आहेत. सर्वच ठिकाणी पाणी आहे. शक्कर बावडीचे पाणी तर कधीच आटले नाही. येथे पोहायला येणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे. त्यांना येऊ नका म्हणता येत नाही, अशा इतर कामावरच कर्मचाऱ्यांचा वेळ जातो. त्यामुळे फळ संशोधनावर म्हणावे तसे काम करता येत नाही, अशी खंत या अधिकाऱ्याने बोलून दाखविली. बोर्डाच्या नियुक्तीनंतर होणार भरतीहिमायत बागेतील कर्मचाऱ्यांच्या कमतरतेबाबत पत्र मिळाले आहे. तशी यादीदेखील मिळाली आहे. पूर्वीप्रमाणे आता विद्यापीठस्तरावर भरती करता येत नाही. राज्यातील चारही कृषी विद्यापीठांच्या भरतीसाठी पुण्यात एक बोर्ड नियुक्त केले जाते. त्यानंतरच भरती केली जाते. या बोर्डाच्या नियुक्तीची आम्ही वाट पाहत असल्याची माहिती वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. व्यंकटेश्वरलू यांनी ‘लोकमत’ला दिली. (समाप्त)काय करणार ?कर्मचाऱ्यांची मागणी पूर्ण होताच बागेच्या सर्व बाजूची संरक्षक भिंत चांगल्या पद्धतीने बांधली जाईल. नव्याने अतिक्रमण होणार नाही याची काळजी घेतली जाईल. बागेत प्रवेश करण्यासाठी ठराविक गेट उपलब्ध करून दिले जातील. याद्वारे ठराविक वेळेत मॉर्निंग वॉकला परवानगी दिली जाईल.भविष्यात त्यावरही नाममात्र शुल्क आकारले जाऊ शकते. मात्र यासाठी स्थानिक नागरिकांच्या मदतीची गरज असल्याचेडॉ. टी.बी. तांबे यांनी सांगितले. बागेला, यातील पक्षी-प्राण्यांना वाचवायचे असेल, तर अशी कठोर पावले उचलावी लागतील, असे ते म्हणाले. सर्वसामान्यांना प्रवेशबंदी हवीबागेत येणाऱ्या लोकांवर आळा घालण्याची गरज आहे. मॉर्निंग वॉकसाठी शेजारी मजनू हिल आहे. जवळच स्वामी विवेकानंद बाग आहे. ऐतिहासिक हिमायत बाग वाचविण्यासाठी लोकांनी या पर्यायी जागांचा वापर करावा, असे आवाहन पक्षीतज्ज्ञ आणि पर्यावरणप्रेमी डॉ. किशोर पाठक यांनी केले. या बागेत सर्वसामान्यांना प्रवेश बंद केला, तर तेथील फळबाग संशोधनाला गती येईल. सोबतच तेथील पक्ष्यांचे जगणेही सोयीचे होईल, असे ते म्हणाले.