शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
Pune Crime: चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचा राग… हॉकी स्टिकने मारहाण करत युवकाची हत्या
3
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
4
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
5
२.५ लाखांपर्यंत पोहोचणार सोन्याचे दर? खरेदीदारांसाठी वाईट बातमी; ६ वर्षांत २००% झालीये वाढ
6
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
7
अमेरिकेतून मायदेशी परतत आहेत भारतीय; का वाटतेय हद्दपार करण्याची भीती?
8
आधी लाबूबू डॉल जाळली, आता तीच पुन्हा समोर आली; भारती सिंह म्हणाली, "ही माझा पिच्छाच..."
9
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
10
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
11
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
12
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
13
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
14
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
15
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
16
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
17
आधार कार्ड, मतदार ओळखपत्र नागरिकत्वाचा पुरावा नाहीत! मतदार यादीतून वगळण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच
18
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
19
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
20
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना

मराठवाड्याच्या रेल्वेसाठी अवघा १.४५ टक्के निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:02 IST

औरंगाबाद : दक्षिण मध्य रेल्वेला अर्थसंकल्पातून प्राप्त झालेल्या निधीपैकी मराठवाड्यातील रेल्वे विकासासाठी केवळ १.४५ टक्के निधी खर्च होणार आहे. ...

औरंगाबाद : दक्षिण मध्य रेल्वेला अर्थसंकल्पातून प्राप्त झालेल्या निधीपैकी मराठवाड्यातील रेल्वे विकासासाठी केवळ १.४५ टक्के निधी खर्च होणार आहे. उर्वरित निधी आंध्रप्रदेश आणि तेलंगणात दुहेरीकरण, तिहेरीकरण, विद्युतीकरणासह नव्या रेल्वे मार्गांसाठी खर्च होणार असल्याने रेल्वे संघटनांतून संताप व्यक्त होत आहे.

अर्थसंकल्पात मराठवाड्यात अनेक वर्षांपासून प्रतीक्षा केल्या जाणाऱ्या मनमाड - परभणी मार्गाचे दुहेरीकरण, औरंगाबाद - दौलताबाद - चाळीसगाव मार्ग, रोटेगाव - कोपरगाव मार्ग, जालना - खामगाव मार्ग, पूर्णा येथे लोको शेड, पूर्णा, परभणी, परळी वैजनाथ, लातूर रोड येथे बायपास लाईन, औरंगाबादेत पीटलाईन या मागण्यांचा विचारच करण्यात आला नाही. दक्षिण मध्य रेल्वेला मिळालेल्या एकूण निधीपैकी फक्त १.४५ टक्के निधी मराठवाड्यात यावर्षी खर्च होणार असल्याचे मराठवाडा रेल्वे कृती समितीचे अध्यक्ष अनंत बोरकर यांनी सांगितले. संपूर्ण झोनमध्ये दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या औरंगाबादच्या मागण्यांकडेही दुर्लक्ष करण्यात आले आहे.

मनमाड - मुदखेड - ढोणे मार्ग विद्युतीकरणासाठी १७५ कोटी

मनमाड - मुदखेड - ढोणे मार्गाच्या विद्युतीकरणासाठी १७५ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. ७८३ किलोमीटर मार्गाच्या विद्युतीकरणासाठी २०१५-१६मध्येच मंजुरी मिळाली आहे. ८६५ कोटी रुपयांच्या निधीतून या मार्गाचे विद्युतीकरण होणार आहे. पूर्णा - आकोला मार्गाच्या विद्युतीकरणासाठी ८५ कोटी मंजूर झाले आहेत.

सर्वेक्षणातच रेल्वे मार्ग

औरंगाबाद - दौलताबाद - चाळीसगाव मार्गाचा प्रस्ताव रेल्वे बाेर्डाने गुंडाळला आहे. मराठवाडा रेल्वे विकास समितीचे अध्यक्ष ओमप्रकाश वर्मा यांनी विचारलेल्या माहिती अधिकारातूनही ही बाब समोर आली. रोटेगाव - कोपरगाव हा प्रस्तावित मार्गही अद्याप सर्वेक्षणात आहे. जालना - खामगाव मार्गाच्या सर्वेक्षणासाठी निविदा प्रक्रिया सुरू आहे. सोलापूर - तुळजापूर - जालना हा मार्गही गुंडाळण्यात आला आहे, अशी माहिती ओमप्रकाश वर्मा यांनी दिली.