शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
4
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
5
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
6
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
7
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
8
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
9
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
10
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
11
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
12
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
13
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
14
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
15
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
16
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
17
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
18
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
19
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं

कापसाची आवक केवळ १२ टक्केच

By admin | Updated: November 10, 2014 23:58 IST

पुरुषोत्तम करवा , माजलगाव गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी कमी पाऊस झाल्यामुळे पिकांना मोठा फटका बसला आहे.

पुरुषोत्तम करवा , माजलगावगतवर्षीच्या तुलनेत यावर्षी कमी पाऊस झाल्यामुळे पिकांना मोठा फटका बसला आहे. उत्पादनातही मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी कापसाची आवक खूपच कमी झाली असून, केवळ १२ टक्केच खरेदी झाली आहे. तर सोयाबीनची ४२ टक्के खरेदी माजलगाव कृउबा समितीने केली आहे.यावर्षी पाऊस कमी झाल्याने पेरण्या होतील की नाही? असे वाटत असतानाच थोड्याफार प्रमाणात पडलेल्या पावसाने पेरण्या झाल्या. मुगाची तर यावर्षी पेरणीच होऊ शकली नाही. तर सोयाबीन, कापूस, बाजरी याचा पेरा झाला तोपर्यंत वेळ निघून गेली होती. पेरण्या झालेल्या असल्या तरी आॅगस्ट महिन्यानंतर पाऊसच पडला नसल्यामुळे बहरात आलेली पिके वाळू लागली.माजलगाव तालुक्यात सोयाबीन व कापसाचा पेरा मोठ्या प्रमाणावर झाला होता. परंतु वेळेवर पेरण्या न झाल्याने व पावसाने पुन्हा दडी मारल्याने पिकांच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली. उत्पादनात घट झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला. तसेच शेतकऱ्यांसमोर पिकांवर केलेला खर्च काढायचा कसा? असा प्रश्नही पडला होता. मात्र हा प्रश्न अद्यापही सुटलेला नसल्याचे दिसून येत आहे.माजलगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत खरेदी करण्यात आलेला कापूस व सोयाबीन या उत्पादनात मोठी घट झाल्याचे दिसून आले. गतवर्षी ९ नोव्हेंबरपर्यंत ३८ हजार ४२२ क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली होती. त्यातून शेतकऱ्यांना १६ कोटी ७० लाख रुपये तर सोयाबीनची ४७ हजार ८०६ क्विंटल खरेदी करण्यात आली होती. यामधून १४ कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळाले होते. मात्र गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी सोयाबीनची ४२ टक्केच खरेदी झाली. २० हजार २७० क्विंटल खरेदी झाली असून, ६ कोटी २९ लाख रुपये शेतकऱ्यांना मिळाले तर कापसाची १२ टक्के खरेदी झाली. ४ हजार ५०० क्विंटल कापूस खरेदी केला असून, त्यातून १ कोटी ८५ लाख रुपये शेतकऱ्यांना मिळाले आहेत.गतवर्षी कापसाला ४३५० रु. प्रती क्विंटल भाव होता. तर यावर्षी ४०८० रुपये एवढा भाव दिला जात आहे. तर सोयाबीनला गतवर्षीच्या सरासरीत भाव मिळत आहे. पिकावर केलेल्या खर्चाच्या तुलनेत यावर्षीचा भाव खूपच कमी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.याबाबत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नितीन नाईकनवरे म्हणाले, गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी मोंढ्यामध्ये सोयाबीन व कापसाची आवक खूपच कमी आहे. यापुढे सुद्धा आवक वाढली नाही तर याचा फटका कृषी उत्पन्न बाजार समितीलाही बसू शकतो.भाव वाढवून देण्याची मागणीगतवर्षीच्या तुलनेत यावर्षी कापसाला ३०० ते ४०० रुपये कमी भाव दिला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमधून नाराजीचा सूर निघत आहे. हा भाव वाढवून देण्यात यावा, अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांतून होत आहे.