शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
3
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
4
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
5
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
6
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
7
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
8
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
9
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
10
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
11
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
12
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
13
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
14
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
15
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
16
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
17
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
18
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
19
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
20
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी

अवघे १२ फुटावर लागले पाणी

By admin | Updated: May 25, 2015 00:26 IST

शिराढोण : जलयुक्त शिवार अभियानादरम्यान शिराढोण (ताक़ळंब) शिवारातील दाहिऱ्या परिसरातील ढोरी नदीपात्रात खोलीकरणाचे काम सुरू असताना केवळ

शिराढोण : जलयुक्त शिवार अभियानादरम्यान शिराढोण (ताक़ळंब) शिवारातील दाहिऱ्या परिसरातील ढोरी नदीपात्रात खोलीकरणाचे काम सुरू असताना केवळ १२ फुटावर पाणी लागले आहे़ या खड्ड्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून, हे पाणी पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे़अल्प पावसामुळे मागील तीन-चार वर्षापासून शिराढोण व परिसरात सातत्याने दुष्काळी स्थिती निर्माण होत आहे़ या दुष्काळी स्थितीवर मात करण्यासाठी आ़ राणाजगजितसिंह पाटील यांच्या पुढाकारातून जलयुक्त शिवार अभियानाचे काम सुरू करण्यात आले आहे़ यासाठी आ़ पाटील यांनी दोन लाख रूपयांचा निधी दिला होता़ शिवाय शेतकरी, ग्रामस्थांना लोकवाटा जमा करण्याचे आवाहन केले होते़ या अनुषंगाने कैलास पाटील, पद्माकर पाटील, किरण पाटील यांनी काही दिवसातच एक लाख रूपयांचा लोकवाटा जमा केला होता़ त्यानंतर मागील दीड महिन्यापासून ढोरी नदीच्या पात्रात खोलीकरण- रूंदीकरणाचे काम सुरू होते़ हे काम सुरू असताना दाहिरा शेताच्या शिवारातील नदीपात्रात केवळ १२ फुटावर पाणी लागले आहे़ ही घटना परिसरात कळताच शेतकऱ्यांसह ग्रामस्थांनी या पाणी लागलेल्या दाहिरा नदीपात्राकडे धाव घेतली़ दुष्काळी स्थितीत केवळ १२ फुटावर लागलेले पाणी पाहता अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले़ या पाण्यात बच्चे कंपनी पोहण्याचा आनंद लूटत आहेत़ या परिसरातील अनेक जलस्त्रोत अटले असून, जनावरांच्या पिण्याचे पाणीही उपलब्ध नाही़ अशा परिस्थितीत हे पाणी लागल्याने हा विषय कुतूहलाचा, चर्चेचा बनला आहे़ त्यामुळे निसर्गाची करणी आणि ढोरी नदीत पाणी, अशी चर्चाही होत आहे़ (वार्ताहर)दाहिरा हे शेत शिराढोण गावापासून केवळ ४० मीटर अंतरावर आहे़ पूर्वीच्या काळात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत होता़ तेव्हा उन्हाळ्यात गावातील आड- बारव यातील पाण्याने तळ गाठल्यानंतर ग्रामस्थांना दाहिऱ्याच्या शेतातील नदीवर लहान दगडाच्या चिऱ्याने बांधलेल्या विहिरीचा आधार मिळत होता़ या विहिरीचे पाणी पिण्यासाठी नागरिक आणत होते़ नदीपात्रातील पाणी हे सांडपाणी म्हणून वापरले जात असल्याचे गावातील ज्येष्ठ नागरिक देविदास गाडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले़शिराढोण येथे सुरू असलेले नदी रूंदीकरण व खोलीकरणाचे काम उत्कृष्ठ प्रकारे सुरू आहे़ या कामाचा आदर्श घेवून इतर गावांनीही जलसंधारणाची कामे करून गावचा परिसर जलयुक्त करावा, असे आवाहन आ़ राणाजगजितसिंह पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना केले़जलसंधारणाचे काम करणाऱ्या दोन आॅपरेटरसह दहा ट्रॅक्टर चालकांना दररोज १५० ते २०० लीटर पिण्याचे पाणी लागत होते़ मात्र, या परिसरात पाणी नसल्याने त्यांना एक ते दीड किलोमीटर भटकंती करावी लागत असे़ शेतात लाईट नसल्याने पाणी उपलब्ध करणे मुश्किल होत होते़ मात्र, या नदीपात्रात पाणी लागल्याने चालकांची सोय झाली असल्याचे जलसंधारणाचे नियोजक किरण पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले़