शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

कर्जमाफीची यादी मागणा-या मूर्खांनी आॅनलाईन यादी तपासावी -दानवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 01:29 IST

कर्जमाफी मिळालेल्या शेतक-यांची यादी सरकारला मागणा-या मूर्खांनो, मोबाईलचे बटन दाबा व कर्जमाफी मिळालेल्या शेतक-यांची आॅनलाईन यादी पाहा, अशी जाहीर टीका खा. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी अंबड तालुक्यातील जामखेड येथे रविवारी झालेल्या कार्यक्रमात केली.

लोकमत न्यूज नेटवर्कअंबड : कर्जमाफी मिळालेल्या शेतक-यांची यादी सरकारला मागणा-या मूर्खांनो, मोबाईलचे बटन दाबा व कर्जमाफी मिळालेल्या शेतक-यांची आॅनलाईन यादी पाहा, अशी जाहीर टीका खा. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी अंबड तालुक्यातील जामखेड येथे रविवारी झालेल्या कार्यक्रमात केली. लोकसभा निवडणुकीला अद्याप दीड वर्षांचा कालावधी बाकी असताना काही जणांना कावीळ झाल्याप्रमाणे लोकसभा निवडणुकीचे डोहाळे लागले आहेत, अशा शब्दात भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी मित्रपक्ष शिवसेनेवर जाहीर टीका केली. अंबड तालुक्यातील जामखेड येथे रविवारी सायंकाळी भाजपच्या नवनिर्वाचित सरपंचांच्या सत्कार समारंभात बोलताना खा. दानवे यांनी ही टीका केली. यावेळी भाजपचे आ. नारायण कुचे यांनी शिवसेना हा दलालांचा पक्ष असून कुठेही मॅनेज होणारा पक्ष असल्याने शिवसेनेची आज अशी गत झाल्याची टीका खा. दानवे यांच्या उपस्थितीत केल्याने आगामी काळात भाजपचा क्रमांक एकचा शत्रूपक्ष शिवसेनाच राहणार असल्याचे स्पष्ट झाले.केंद्र व राज्यातील भाजप सरकार शेतकºयांच्या हिताशी पूर्णपणे बांधील असून आम्ही केलेली कर्जमाफी ही योग्य शेतक-यांना लाभ मिळवून देणारी खरी कर्जमाफी आहे. पूर्वीच्या सरकारने ६० हजार कोटी रुपयांची जाहीर केलेली कर्जमाफी ही फसवी होती, या कर्जमाफीमुळे शेतक-यांचा नव्हे तर बुडीत निघणा-या बँकांचा फायदा झाला. आम्ही दिलेल्या कर्जमाफीची रक्कम थेट शेतक-यांच्या खात्यात जमा होणार असून सर्वसामान्य शेतकºयांनाच या कर्जमाफीचा लाभ होणार असल्याने विरोधकांबरोबरच मित्रपक्षात पोटशूळ उठला आह, असे दानवे म्हणाले.आ. नारायण कुचे म्हणाले की, शिवसेना हा दलालांचा पक्ष आहे. शिवसेनेचे नेते सकाळी एक, दुपारी एक तर सायंकाळी एक बोलतात. शिवसेनेचे नेते विकले जात असल्यानेच शिवसेनेची आज दुरवस्था झाली आहे. राज्यातील भाजपा सरकार शेतकरी, कष्टकरी, गरिबांच्या हिताच्या अनेक विकास योजना राबवित आहे. मात्र सत्तेत असलेला मित्रपक्ष विकास कामांमध्ये अडथळा आणण्याचे पाप करत आहे.