शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

कर्जमाफीची यादी मागणा-या मूर्खांनी आॅनलाईन यादी तपासावी -दानवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 01:29 IST

कर्जमाफी मिळालेल्या शेतक-यांची यादी सरकारला मागणा-या मूर्खांनो, मोबाईलचे बटन दाबा व कर्जमाफी मिळालेल्या शेतक-यांची आॅनलाईन यादी पाहा, अशी जाहीर टीका खा. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी अंबड तालुक्यातील जामखेड येथे रविवारी झालेल्या कार्यक्रमात केली.

लोकमत न्यूज नेटवर्कअंबड : कर्जमाफी मिळालेल्या शेतक-यांची यादी सरकारला मागणा-या मूर्खांनो, मोबाईलचे बटन दाबा व कर्जमाफी मिळालेल्या शेतक-यांची आॅनलाईन यादी पाहा, अशी जाहीर टीका खा. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी अंबड तालुक्यातील जामखेड येथे रविवारी झालेल्या कार्यक्रमात केली. लोकसभा निवडणुकीला अद्याप दीड वर्षांचा कालावधी बाकी असताना काही जणांना कावीळ झाल्याप्रमाणे लोकसभा निवडणुकीचे डोहाळे लागले आहेत, अशा शब्दात भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी मित्रपक्ष शिवसेनेवर जाहीर टीका केली. अंबड तालुक्यातील जामखेड येथे रविवारी सायंकाळी भाजपच्या नवनिर्वाचित सरपंचांच्या सत्कार समारंभात बोलताना खा. दानवे यांनी ही टीका केली. यावेळी भाजपचे आ. नारायण कुचे यांनी शिवसेना हा दलालांचा पक्ष असून कुठेही मॅनेज होणारा पक्ष असल्याने शिवसेनेची आज अशी गत झाल्याची टीका खा. दानवे यांच्या उपस्थितीत केल्याने आगामी काळात भाजपचा क्रमांक एकचा शत्रूपक्ष शिवसेनाच राहणार असल्याचे स्पष्ट झाले.केंद्र व राज्यातील भाजप सरकार शेतकºयांच्या हिताशी पूर्णपणे बांधील असून आम्ही केलेली कर्जमाफी ही योग्य शेतक-यांना लाभ मिळवून देणारी खरी कर्जमाफी आहे. पूर्वीच्या सरकारने ६० हजार कोटी रुपयांची जाहीर केलेली कर्जमाफी ही फसवी होती, या कर्जमाफीमुळे शेतक-यांचा नव्हे तर बुडीत निघणा-या बँकांचा फायदा झाला. आम्ही दिलेल्या कर्जमाफीची रक्कम थेट शेतक-यांच्या खात्यात जमा होणार असून सर्वसामान्य शेतकºयांनाच या कर्जमाफीचा लाभ होणार असल्याने विरोधकांबरोबरच मित्रपक्षात पोटशूळ उठला आह, असे दानवे म्हणाले.आ. नारायण कुचे म्हणाले की, शिवसेना हा दलालांचा पक्ष आहे. शिवसेनेचे नेते सकाळी एक, दुपारी एक तर सायंकाळी एक बोलतात. शिवसेनेचे नेते विकले जात असल्यानेच शिवसेनेची आज दुरवस्था झाली आहे. राज्यातील भाजपा सरकार शेतकरी, कष्टकरी, गरिबांच्या हिताच्या अनेक विकास योजना राबवित आहे. मात्र सत्तेत असलेला मित्रपक्ष विकास कामांमध्ये अडथळा आणण्याचे पाप करत आहे.