शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
4
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
5
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
6
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
7
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
8
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
9
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
10
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
11
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
12
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
13
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
14
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
15
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
16
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
17
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
18
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
19
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक

कांदा रोपाचे भाव वधारले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:33 IST

वैजापूर : जिल्ह्यातील सर्वाधिक कांदा उत्पादक शेतकरी वैजापूर तालुक्यात आहेत. तालुक्यात २ हजार २०० हेक्टर कांदा लागवड झाली आहे. ...

वैजापूर : जिल्ह्यातील सर्वाधिक कांदा उत्पादक शेतकरी वैजापूर तालुक्यात आहेत. तालुक्यात २ हजार २०० हेक्टर कांदा लागवड झाली आहे. परतीच्या पावसाने उन्हाळी कांदा रोपांचे नुकसान झाल्याने उर्वरित कांद्याच्या रोपांना चांगला भाव आला आहे. सध्या कांदा बियाण्याच्या एका पायलीला म्हणजे साडेतीन किलो कांदा रोपाला सात ते आठ हजारांचा भाव मि‌ळू लागला आहे. एका पायलीत साधारणत: पावणे दोन एकरात कांदा लागवड केली जाते.

यावर्षी उन्हाळी कांद्याला चांगल्यापैकी भाव असल्याने शेतकऱ्यांनी सप्टेंबर महिन्यात उन्हाळी व रांगडा कांद्याचे बियाणे टाकले होते. कांद्याचे रोप चांगल्यापैकी उगवलेही होते. परंतु ऑक्टोबर महिन्यात परतीच्या पावसामुळे जे काही कांद्याचे बियाणे टाकले होते. ते अतिवृष्टीने जागीच खराब झाले. जे रोप उरले होते. त्यावर मर रोगाचा प्रादुर्भाव वाढला होता. अखेर शेतकऱ्यांनी नव्याने पुन्हा नवीन जमीन तयार करून दुबार उन्हाळी व रांगडा कांद्याचे बियाणे टाकले. त्यात अवकाळी व संततधार पावसाने उरलेल्या कांदा रोपांचेही नुकसान झाले. रोपांच्या वाफ्यात पाणी साचल्याने कांद्याची रोपे सडून गेली.

आता उन्हाळी कांद्याने बारा हजार किमतीचा टप्पा पार केला असला तरी आता शेतकऱ्याकडे उन्हाळी कांदा शिल्लक नाही. अगदी बोटांवर मोजता येणाऱ्या शेतकऱ्यांकडे कांदा शिल्लक आहे. भावही चांगला मिळत आहे. त्यामुळे हे भाव पाहून कांद्याचे रोप मिळेल आणि निदान कांद्याला पुढे चांगला भाव मिळेल. या आशेने शेतकरी कांदा लागवड करीत आहेत. शेतकऱ्यांनी आठ हजार रुपये किमतीने पायलीभर बियाणे विकत घेतली आहेत.

------

नुकसान भरपाईची मागणी

आठ हजार रुपये किंमत देऊन साडेतीन किलो कांदा बियाणे शेतकऱ्यांनी घेतली. लागवड करून कांद्याची रोपटी तयार केली आहेत. एका वाफ्याची किंमत तब्बल अडीच हजार ते तीन हजार रुपयांवर गेली. परंतु तिही मिळत नाही. परंतु त्याचीही किंमत मिळत नाही. या आशेने रोप कोठे मिळते का म्हणून फिरताना दिसून येत आहेत. तर कांद्याच्या रोपांना सोन्याचा भाव आला आहे. कांदा तोट्यात विकावा लागला असल्याने सरकारने नुकसान भरपाई देणे गरजेचे आहे. उत्पादन खर्चही निघाला नाही. चाळीत साठविलेला कांदा सडला. सरकारने कांद्याबाबतचे धरसोडीचे धोरण शेतकऱ्यांना मारक ठरले. नवीन लागवड करण्याशिवाय पर्यायही नव्हता, अशी प्रतिक्रिया प्रगतशील शेतकरी सीताराम पाटील वैद्य त्यांनी व्यक्त केली.

------

कांदा रोपांचा तुटवडा

कांद्याला जीवनावश्यक वस्तू कायद्यामधून काढण्यात आले. त्यात खानावळी, हॉटेल सुरू होत असून येणाऱ्या काळात कांद्याची वाढती मागणी लक्षात घेता भविष्यात चांगला भाव मिळेल, या आशेने शेतकरी सरसावले आहेत. त्यामुळे कांदा रोपांचा तुटवडा जाणवत आहे. तसेच कांदा लागवड परवडत नाही. एकरी पन्नास हजार रूपये खर्च होत असून दर वाढवून राहतील की नाही हा देखील वैजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांपुढे प्रश्न आहे. तर काही शेतकरी लागवड करून खर्च करण्यापेक्षा रोपे विकून दोन पैसे मिळवित आहेत.

-------

फोटो -