शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही गरिबीत, तुमची मौज का? आणखी एका देशात लोक रस्त्यावर; जनतेच्या पैशाची लूट, पसरला असंतोष
2
आजपासून 'GST' उत्सव! मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा; खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार
3
युक्रेनचा रशियावर ड्रोन हल्ला! क्रिमिया रिसॉर्टवरील हल्ल्यात २ जणांचा मृत्यू, १५ जण गंभीर जखमी
4
Eknath Shinde: जीएसटी सुधारणांमुळे उत्पादन आणि रोजगार वाढेल- एकनाथ शिंदे
5
H-1B व्हिसाने हैराण झालेल्यांना चीनची ऑफर; भारतीयांसाठीही मोठी संधी! काय आहे नवा ‘के- व्हिसा’?
6
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले; ४० पेक्षा अधिक वेळा ट्रम्प यांचा दावा, आता तरी नोबेल द्या
7
France Gen-Z Protest: फ्रान्समध्ये Gen- Z चा संताप! लिमामध्ये DINA विरोधात बंड, दगडफेक आणि पोलिसांशी झटापट
8
...तर पतीच्या प्रेयसीकडून पत्नीला मिळेल भरपाई; हायकोर्टानं नोंदवली निरीक्षणे
9
आजचे राशीभविष्य- २२ सप्टेंबर २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास! आर्थिक लाभ होणार
10
ट्रम्प हे मित्र की शत्रू..अमेरिकेच्या २ निर्णयांनी भारताला बसला मोठा फटका; पुढे काय करायला हवं?
11
घोडबंदर भागातील धुमसता असंतोष राजकीय? शिंदेसेनेची कोंडी करण्यासाठी भाजपा घालतंय खतपाणी
12
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
13
IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं
14
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
15
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
16
पाकिस्तानी ‘खेळाडूंना’ जपानमध्ये अटक; परदेशात जाण्यासाठी वापरला वेगळाच अन् अफलातून फंडा
17
राज्य सहकारी बँकेत पती-पत्नीला एकत्र नोकरीला असेल बंदी; विवाहानंतर ६० दिवसांत राजीनामा बंधनकारक
18
जनाब, आपल्या पायाखाली काय जळते ते पाहा...अमेरिकेची चाल, भारताभोवती तयार होतोय धोकादायक त्रिकोण
19
विशिष्ट समुदायासाठी उभारली जाते इमारत; गृहनिर्माण संस्थांना सदस्य निवडीचा अधिकार आहे का?
20
धगधगत्या ज्वालेतून आली जगन्माता, भक्ती दाटते नाव घेता...; कुलस्वामिनीच्या उत्सवाचे विविध रंग

कांदा रोपाचे भाव वधारले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:33 IST

वैजापूर : जिल्ह्यातील सर्वाधिक कांदा उत्पादक शेतकरी वैजापूर तालुक्यात आहेत. तालुक्यात २ हजार २०० हेक्टर कांदा लागवड झाली आहे. ...

वैजापूर : जिल्ह्यातील सर्वाधिक कांदा उत्पादक शेतकरी वैजापूर तालुक्यात आहेत. तालुक्यात २ हजार २०० हेक्टर कांदा लागवड झाली आहे. परतीच्या पावसाने उन्हाळी कांदा रोपांचे नुकसान झाल्याने उर्वरित कांद्याच्या रोपांना चांगला भाव आला आहे. सध्या कांदा बियाण्याच्या एका पायलीला म्हणजे साडेतीन किलो कांदा रोपाला सात ते आठ हजारांचा भाव मि‌ळू लागला आहे. एका पायलीत साधारणत: पावणे दोन एकरात कांदा लागवड केली जाते.

यावर्षी उन्हाळी कांद्याला चांगल्यापैकी भाव असल्याने शेतकऱ्यांनी सप्टेंबर महिन्यात उन्हाळी व रांगडा कांद्याचे बियाणे टाकले होते. कांद्याचे रोप चांगल्यापैकी उगवलेही होते. परंतु ऑक्टोबर महिन्यात परतीच्या पावसामुळे जे काही कांद्याचे बियाणे टाकले होते. ते अतिवृष्टीने जागीच खराब झाले. जे रोप उरले होते. त्यावर मर रोगाचा प्रादुर्भाव वाढला होता. अखेर शेतकऱ्यांनी नव्याने पुन्हा नवीन जमीन तयार करून दुबार उन्हाळी व रांगडा कांद्याचे बियाणे टाकले. त्यात अवकाळी व संततधार पावसाने उरलेल्या कांदा रोपांचेही नुकसान झाले. रोपांच्या वाफ्यात पाणी साचल्याने कांद्याची रोपे सडून गेली.

आता उन्हाळी कांद्याने बारा हजार किमतीचा टप्पा पार केला असला तरी आता शेतकऱ्याकडे उन्हाळी कांदा शिल्लक नाही. अगदी बोटांवर मोजता येणाऱ्या शेतकऱ्यांकडे कांदा शिल्लक आहे. भावही चांगला मिळत आहे. त्यामुळे हे भाव पाहून कांद्याचे रोप मिळेल आणि निदान कांद्याला पुढे चांगला भाव मिळेल. या आशेने शेतकरी कांदा लागवड करीत आहेत. शेतकऱ्यांनी आठ हजार रुपये किमतीने पायलीभर बियाणे विकत घेतली आहेत.

------

नुकसान भरपाईची मागणी

आठ हजार रुपये किंमत देऊन साडेतीन किलो कांदा बियाणे शेतकऱ्यांनी घेतली. लागवड करून कांद्याची रोपटी तयार केली आहेत. एका वाफ्याची किंमत तब्बल अडीच हजार ते तीन हजार रुपयांवर गेली. परंतु तिही मिळत नाही. परंतु त्याचीही किंमत मिळत नाही. या आशेने रोप कोठे मिळते का म्हणून फिरताना दिसून येत आहेत. तर कांद्याच्या रोपांना सोन्याचा भाव आला आहे. कांदा तोट्यात विकावा लागला असल्याने सरकारने नुकसान भरपाई देणे गरजेचे आहे. उत्पादन खर्चही निघाला नाही. चाळीत साठविलेला कांदा सडला. सरकारने कांद्याबाबतचे धरसोडीचे धोरण शेतकऱ्यांना मारक ठरले. नवीन लागवड करण्याशिवाय पर्यायही नव्हता, अशी प्रतिक्रिया प्रगतशील शेतकरी सीताराम पाटील वैद्य त्यांनी व्यक्त केली.

------

कांदा रोपांचा तुटवडा

कांद्याला जीवनावश्यक वस्तू कायद्यामधून काढण्यात आले. त्यात खानावळी, हॉटेल सुरू होत असून येणाऱ्या काळात कांद्याची वाढती मागणी लक्षात घेता भविष्यात चांगला भाव मिळेल, या आशेने शेतकरी सरसावले आहेत. त्यामुळे कांदा रोपांचा तुटवडा जाणवत आहे. तसेच कांदा लागवड परवडत नाही. एकरी पन्नास हजार रूपये खर्च होत असून दर वाढवून राहतील की नाही हा देखील वैजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांपुढे प्रश्न आहे. तर काही शेतकरी लागवड करून खर्च करण्यापेक्षा रोपे विकून दोन पैसे मिळवित आहेत.

-------

फोटो -